भारतीय नाविक बंड
भारतीय नाविक बंड (याला राॅयल इंडियन नेव्ही म्युटिनी (शाही भारतीय नौदलाचे बंड) किंवा मुंबईचे बंड किंवा नाविक उठाव या नावाने ओळखले जाते) हे ब्रिटिश भारतीय आरमारामध्ये झालेले बंड होते. याची सुरुवात १८ फेब्रुवारी, १९४६ रोजी जहाजांवर आणि किनाऱ्यावरील आस्थापनांमध्ये, शाही भारतीय नौदलातील नाविकांच्या संपाने झाली. त्यानंतर मुंबईमध्ये उघड बंडाची सुरुवात होऊन हे लोण कराची ते कोलकाता असे पूर्ण ब्रिटिश भारतात पसरले आणि तेथील नाविकांकडून त्याला पाठिंबा मिळाला. यात ७८ जहाजांमधील २०,००० पेक्षा जास्त नाविक आणि किनाऱ्यावरील आस्थापनांतील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.[१][२]
१९४६मधील ब्रिटिश भारतीय सरकारविरुद्धचा उठाव | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
ह्याचा भाग | भारताचा स्वातंत्रलढा | ||
---|---|---|---|
आरंभ वेळ | फेब्रुवारी १८, इ.स. १९४६ | ||
शेवट | फेब्रुवारी २३, इ.स. १९४६ | ||
| |||
ब्रिटिश सरकारने हे बंड ब्रिटिश सैनिक आणि शाही नौदलाच्या युद्धनौकांचा बळाचा वापर करून चिरडले. यात ८ जणांचा मृत्यू आणि ३३ जण जखमी झाले. काँग्रेस आणि मुस्लिम लीगने या संपाचा निषेध केला होता.
उठावाचा इतिहास
१८ फेब्रुवारी, १९४६रोजी शाही भारतीय नौसेनेच्या खलाशी व इतर खालच्या स्तरावर काम करणाऱ्या कामगारांनी कामाच्या परिस्थितींबाबत तक्रार करत बंद पुकारला. त्यांना मिळणारे राहाण्याच्या ठिकाणाचा आणि अन्नाचा निकृष्ट दर्जा हे या संपाचे तात्कालिक कारण होते.[३] १९ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत याचे नेतृत्व करण्यासाठी केंद्रीय समिती निवडण्यात आली. या समितीचे नेते म्हणून सिग्नलमॅन लेफ्टटनंट मोहम्मद शरिफ आणि पेटी ऑफिसर टेलिग्राफिस्ट मदन सिंग यांची प्रधान आणि उपप्रधान म्हणून एकमताने नेमणूक करण्यात आली[४] या बंदाला भारतीय जनतेमध्ये थोड्याफार प्रमाणात पाठिंबा मिळाला होता, परंतु बहुतांश राजकीय नेत्यांनी पाठिंबा देण्याचे टाळले हो.[५]
घटनाक्रम
दुसऱ्या महायुद्धात शाही भारतीय नौदलाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला. १९३९ ते १९४५ दरम्यान या दलाचा आकार दहा पटीने वाढला. युद्धपरिस्थितीमध्ये लष्करातील भरती लढवय्या जमातींमधून न करता मिळेल त्या विविध सामाजिक स्तरातील पुरुषांची केली गेली होती. १९४२ ते १९४५ दरम्यान भारतीय साम्यवादी पक्षाच्या नेत्यांनी नाझी जर्मनी विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिश भारतीय सेना आणि शाही भारतीय नौदलातील मोठ्या प्रमाणवरील भरती साठी मदत केली ज्यामध्ये प्रामुख्याने साम्यवादी कार्यकर्त्यांचा समावेश होता. पण युद्ध संपल्यानंतर, नव्याने भरती झालेले लोक ब्रिटिशांविरुद्ध उठले.[६]