बॉम्बे संस्थान

(मुंबई राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)

मुंबई राज्य हे इ.स.१९४७ ते इ.स.१९६० या दरम्यान अस्तित्वात असलेले भारताच्या एक घटक राज्य होते.

मुंबई राज्य
देशभारत
राजधानीमुंबई
क्षेत्रफळ४,९४,३५८ वर्ग किमी
लोकसंख्या48,264,622
जिल्हे२८
प्रमुख भाषामराठी, कन्नड, गुजराती
स्थापनाइ.स.१९४७
शेवटइ.स.१९६०
पहिले मुख्यमंत्रीबाळासाहेब खेर
शेवटचे मुख्यमंत्रीयशवंतराव चव्हाण
मुंबई राज्य

इतिहास

स्वातंत्रपूर्व काळात अस्तित्वात असलेला बॉम्बे प्रांताचा सिंध प्रदेश हा पाकिस्तानात गेला. कच्छ आणि सौराष्ट्र वगळता उर्वरित गुजरात, कोकण, खानदेश, देश, उत्तर कर्नाटक, त्याचप्रमाणे डेक्कन स्टेट्स एजन्सी, गुजरात स्टेट्स एजन्सी, कोल्हापूर संस्थान, बडोदा संस्थान यांचे मिळून मुंबई राज्य अस्तित्वात आले.

प्रशासक

मुख्यमंत्री

मुंबई राज्यात एकूण तीन मुख्यमंत्री झाले.

मुख्यमंत्रीकार्यकाळ
बाळासाहेब गंगाधरराव खेरइ.स.१९४७ ते इ.स.१९५२
मोरारजी देसाईइ.स.१९५२ ते इ.स.१९५६
यशवंतराव चव्हाणइ.स.१९५६ ते इ.स.१९६०

गवर्नर

मुंबई राज्यात एकूण चार गवर्नर झाले.

गवर्नरकार्यकाळ
राजा सर महाराज सिंहइ.स.१९४८ ते इ.स.१९५२
सर गिरीजा शंकर बाजपाईइ.स.१९५२ ते इ.स.१९५४
हरेकृष्ण महताबइ.स.१९५५ ते इ.स.१९५६
श्री प्रकाशइ.स.१९५६ ते इ.स.१९६२

जिल्हे

मुंबई राज्यात एकूण २८ जिल्हे होते.

१.अमरेली, २.बनासकांठा, ३.मेहसाना, ४.अहमदाबाद, ५.साबरकांठा, ६.खेडा, ७.पंच महल, ८.बडोदा, ९.भरूच, १०.सुरत, ११.डांग, १२.पश्चिम खानदेश (धुळे) १३.पूर्व खानदेश(जळगाव) १४.नाशिक, १५.ठाणा, १६.बृहद्मुंबई, १७.कुलाबा, १८.रत्‍नागिरी, १९.पुना, २०.अहमदनगर, २१.सोलापूर, २२.उत्तर सातारा, २३. दक्षिण सातारा, २४.कोल्हापूर, २५. विजापूर, २६.बेळगाव, २७.धारवाड, २८.उत्तर कन्नडा

राज्य पुनर्रचना नियम(इ.स.१९५६)

इ.स.१९५६ च्या राज्य पुनर्रचना नियमानुसार भाषावार प्रांतरचना करण्यात आली. त्यानुसार इ.स.१९६० मध्ये मुंबई राज्याचे विभाजन झाले.

  • सौराष्ट्र, कच्छ, आणि मुंबई राज्यातील गुजरात प्रदेश यांचे मिळून स्वतंत्र गुजराती भाषिकांचे गुजरात राज्य करण्यात आले.
  • मुंबई राज्यातील कोकण, देश, खानदेश, आणि हैदराबाद राज्यातील मराठवाडा, मध्य प्रदेशातील विदर्भ आणि वऱ्हाड यांचे मिळून मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य करण्यात आले.
  • मुंबई राज्यातील कर्नाटक प्रदेश हा म्हैसूर राज्याला जोडण्यात आला.