अण्णा भाऊ साठे
तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट , १९२० — १८ जुलै , १९६९) हे अण्णा भाऊ साठे[a] म्हणून ओळखले जाणारे एक मराठी लोककवी, लेखक आणि समाजसुधारक होते.[१] साठे हे मांग (मातंग) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.[२] साठे हे मार्क्सवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता.[३][४][५][६] दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
तुकाराम भाऊराव साठे | |
---|---|
जन्म नाव | तुकाराम भाऊराव साठे |
टोपणनाव | अण्णा भाऊ साठे |
जन्म | ऑगस्ट १, इ.स. १९२० वाटेगाव, वाळवा, सांगली जिल्हा |
मृत्यू | १८ जुलै, १९६९ (वय ४८) |
शिक्षण | अशिक्षित |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
कार्यक्षेत्र | लेखक, साहित्यिक, समाजसुधारक |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | शाहिर, कथा, कादंबरीकार |
चळवळ | संयुक्त महाराष्ट्र चळवळ व स्वातंत्र्य चळवळ |
प्रसिद्ध साहित्यकृती | सर्वच साहित्य |
प्रभाव | मॅक्झिम गॉर्की, श्रीपाद अमृत डांगे, कार्ल मार्क्स |
वडील | भाऊराव साठे |
आई | वालुबाई साठे |
पत्नी | कोंडाबाई साठे जयवंता साठे |
अपत्ये | मधुकर, शांता आणि शकुंतला |
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.
वैयक्तिक जीवन
अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला.
राजकारण
साठे पहिल्यांदा कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले.[७] १९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती.[८] इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती[९] आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.[१०]
साठे यांनी दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे"[७] यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.[११]
त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.[७]
लेखन साहित्य
साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.[१]
साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले.[१][१२] नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.[७]
मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हटले आहे..[१०][१३]
साठेंनी लिहिलेली पुस्तके
- अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५)
- अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले)
- अमृत
- आघात
- आबी (कथासंग्रह)
- आवडी (कादंबरी)
- इनामदार (नाटक, १९५८)
- कापऱ्या चोर (लोकनाट्य)
- कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह)
- खुळंवाडा (कथासंग्रह)
- गजाआड (कथासंग्रह)
- गुऱ्हाळ
- गुलाम (कादंबरी)
- चंदन (कादंबरी)
- चिखलातील कमळ (कादंबरी)
- चित्रा (कादंबरी, १९४५)
- चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८)
- नवती (कथासंग्रह)
- निखारा (कथासंग्रह)
- जिवंत काडतूस (कथासंग्रह)
- तारा
- देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६)
- पाझर (कादंबरी)
- पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)
- पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२)
- पेंग्याचं लगीन (नाटक)
- फकिरा (कादंबरी, १९५९)
- फरारी (कथासंग्रह)
- मथुरा (कादंबरी)
- माकडीचा माळ (कादंबरी, १९६३)
- रत्ना (कादंबरी)
- रानगंगा (कादंबरी)
- रूपा (कादंबरी)
- बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०)
- बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७)
- माझी मुंबई (लोकनाट्य)
- मूक मिरवणूक(लोकनाट्य)
- रानबोका
- लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२)
- वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८)
- वैजयंता (कादंबरी)
- वैर (कादंबरी)
- शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)
- संघर्ष
- सुगंधा
- सुलतान (नाटक)
प्रवासवर्णन
- कविता आणि माझा रशियाचा प्रवास
काव्ये
- अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या
साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट
- वैजयंता (१९६१, कादंबरी – वैजयंता)
- टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी – आवडी)
- डोंगरची मैना (१९६९, कादंबरी – माकडीचा माळ)
- मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी – चिखलातील कमळ)
- वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी – वारणेचा वाघ)
- अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी – अलगूज)
- फकिरा (कादंबरी – फकिरा)
साठेंवरील पुस्तके
- अण्णाभाऊंचा संदेश (विनिमय पब्लिकेशन्स)
- अण्णा भाऊ सांगून गेले (विलास रणसुभे)
- अण्णा भाऊ साठे (मराठी कवी) – लेखक: बजरंग कोरडे, अनुवाद : विलास गिते, प्रकाशन : साहित्य अकादमी
- अण्णा भाऊ साठे (बालवाङ्मय, लेखक - बाबुराव गुरव)
- अण्णा भाऊ साठे (हिंदी, प्रा. रतनलाल सोनग्रा)
- अण्णा भाऊ साठे (डाॅ. संजीवनी सुनील पाटील)
- अण्णा भाऊ साठे : चरित्र आणि कार्य – विजयकुमार जोखे, नालंदा प्रकाशन[१४]
- अण्णा भाऊ साठे विचारधन (विठ्ठल साठे)
- अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय ( प्रा.डाॅ. अंबादास सगट)
- अण्णा भाऊ साठेलिखित 'फकीरा'ची समीक्षा (डाॅ. श्रीपाल सबनीस)
- क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे (प्रा. गौतम निकम)
- समाज सुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (संपादित, संपादक - ॲड. महेंद्र साठे)
वारसा
साठे हे उपेक्षित समाज आणि विशेषतः मांग जातीचे प्रतीक बनले आहेत. डॉ बाबासाहेब गोपले यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे
तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन केली आहे
- १ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने ₹४ च्या टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले.[१५]
- पुण्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक आणि मुंबईच्या कुर्लामधील एका उड्डाणपुलासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.[१६][१७]
हे सुद्धा पहा
संदर्भ व टीप
बाह्य दुवे
- अण्णा भाऊ साठे (विकासपीडिया)
- अण्णा भाऊ साठे : 'मी फकिराच्या लुटीच्या पैशातून घुटी पिलेला कलावंत'
- अण्णा भाऊ साठेंनी लिहिलेली पुस्तके
- अण्णा भाऊ साठे – एक जबरदस्त साहित्यिक Archived 2016-07-19 at the Wayback Machine.