श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

(श्री.के. क्षीरसागर या पानावरून पुनर्निर्देशित)


श्री.के. क्षीरसागर (नोव्हेंबर ६, १९०१ - एप्रिल २९, इ.स. १९८०) हे मराठी लेखक, विचारवंत, समीक्षक होते. प्रा. श्री. के. क्षीरसागर हे टीकाकार म्हणून परिचित आहेत, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

श्रीकृष्ण केशव क्षीरसागर
200pix
जन्म नावश्रीकृष्ण केशव क्षीरसागर
जन्मनोव्हेंबर ६, १९०१
पाली, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यूएप्रिल २९, इ.स. १९८०
पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकादंबरी, समीक्षा
विषयभाषा, समाज
वडीलकेशव क्षीरसागर

जीवन

प्रा. श्री.के. क्षीरसागरांचा जन्म नोव्हेंबर ६, १९०१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाली गावी झाला. सातारा जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावी शालेय शिक्षण पुरे करून त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतले. पुढे त्यांनी पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १९४५ सालापासून त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकी केली. ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कला व विज्ञान महाविद्यालयात (जुने नाव - एमईएस काॅलेज, आत्ताचे नाव - आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ आर्ट्‌स ॲन्ड सायन्स) मराठी विभागाचे प्रमुख होते. (संदर्भ - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वार्षिक अहवाल १९५९-६०)

प्रकाशित साहित्य

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
आधुनिक राष्ट्रवादी रवींद्रनाथ ठाकूरसमीक्षा१९७०
उमरखय्यामची फिर्यादसमीक्षा१९६१
टीकाविवेकसमीक्षा१९६५
तसबीर आणि तकदीरआत्मचरित्र१९७६
निवडक श्री.के. क्षीरसागरलेखसंकलनसाहित्य अकादमी
बायकांची सभाप्रहसन१९२६
मराठी भाषा: वाढ आणि बिघाडवैचारिकराज्य मराठी विकास संस्था२०००
राक्षसविवाह१९४०
वादे वादेसमीक्षा
व्यक्ती आणि वाङ्मयसमीक्षा१९३७
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर१९३७
समाजविकासकाँटिनेंटल प्रकाशन
स्त्रीशिक्षण परिषदेची वाटचाल१९३३

विशेष

  • प्रा. श्री.के. क्षीरसागर १९५९ साली मिरजेला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • महाराष्ट्र सरकार दर वर्षी वाङ्मयीन समीक्षेवरच्या एका ग्रंथाला श्री.के क्षीरसागर यांच्या नावाचा पुरस्कार देते. २०१७ साली हा पुरस्कार विश्राम गुप्ते यांना 'नवं जग नवी कविता' या पुस्तकाला मिळाला आहे. २०१४ साली डॉ. शोभा नाईक यांना 'मराठी-कन्नड सांस्कृतिक सहसंबंध' या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार २०१८ साली डाॅ पराग घोंगे यांच्या 'अभिनय चिंतन - भरतमुनी ते बर्टोल्ड ब्रेख्त' या ग्रंथाला मिळाला.


🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन