विकिपीडिया:धूळपाटी/KiranBOT II

  • KiranBOT II ज्याप्रमाणे मुख्य/लेख नामविश्वात संपादन करतो, अगदी त्याचप्रमाणे ह्या पानावर सुद्धा करतो.
  • हे पान KiranBOT II च्या संपादन प्रक्रियेच्या चाचण्या करण्यासाठी वापरल्या जाते.
  • KiranBOT II च्या शुद्धलेखनाची यादी: User:KiranBOT II/typos
  • KiranBOT II भारतीय प्रमाणवेळेनुसार रोज रात्री ९:३० वाजता आपोआप कार्यरत होतो. तुम्ही इथे यादीत असलेले चुकीचे शब्द टाकल्यास ते शब्द ताबडतोब दुरुस्त न होता, येणाऱ्या रात्रीच्या ९:३० नंतर दुरुस्त होतील.
  • तुम्ही ह्याखाली प्रयोग करू शकता.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

blank section

  • प्रमाणीकरण -

बोधिसत्व

जर्मन: (विसर्ग)

जर्मन: (कोलन)

  • abcusernamekiran
  • रून → रून
  • रुण → रुण
  • कॅथरुन → कॅथरुन
  • सुखावून → सुखावून
  • रूप → रूप
  • ग्रुप → ग्रुप
  • रूपा → रूपा
  • रुपाली → रुपाली
  • रुपारेल → रुपारेल
  • अंथरूण → अंथरुण
  • पांघरूण → पांघरुण
  • भ्रूण → भ्रूण

वापरून

वापरुन

कॅथरुन

कॅथरुन

हरिलालकेन्या

  • आदिशक्तीपीठे
  • गुरुपदाचे आणि गुरूचे


  • हरिलालकेन्या. हरिलालकेन्या -केन्या -
  • हरिलाल केन्या - हरिलाल केन्या. - हिरालाल. केन्या

इस्लामीकरण → इस्लामीकरण

अधिकाधिक संक्षिप्त परंतु एकूण ग्रुप दुप्पट ध्रुवीकरण.

  • एकत्रित प्राथमिक
  1. अंथरूण → अंथरुण
  2. पांघरूण → पांघरुण
  3. भ्रूण → भ्रूण
  • डिग्री सेल्सिअस > अंश सेल्सिअस
  • सेल्सिअस सेल्सियस
  • कृष्ण > कृष्ण
  • मारुतीचे > मारुतीचे
  • विष्णू > विष्णू -
  • अनिर्णित > अनिर्णित

दुसरे महायुद्ध

दुसरे महायुद्ध

डावीकडून: वाळवंटात कॉमनवेल्थचे सैन्य; जपानी सैनिक चिनी नागरिकांना जिवंत पुरताना; अंतर्गत बंडाळीमध्ये रशियन सैन्य; जपानी युद्ध विमाने; बर्लिनमध्ये रशियन सैन्य; एक जर्मन पाणबुडी.
दिनांक१९३०२ सप्टेंबर, १९४५
स्थानयुरोप, पॅसिफिक समुद्र, आग्नेय आशिया, चीन, मध्य-पूर्व, भूमध्य समुद्रआफ्रिका
परिणतीदोस्त राष्ट्रांचा विजय
युद्धमान पक्ष
दोस्त राष्ट्रे
 सोव्हियेत संघ(१९४१-४५)
 अमेरिका(१९४१-४५)
 भारत
चीन(१९३७-४५)

 फ्रान्स
 पोलंड
 कॅनडा,
 ऑस्ट्रेलिया
 न्यूझीलंड
 युगोस्लाव्हिया (१९४१-४५)
 नॉर्वे(१९४०-४५)
 बेल्जियम (१९४०-४५)
 चेकोस्लोव्हाकिया
 फिलिपिन्स (१९४१-४५)
 ब्राझील (१९४२-४५)
व इतर....
अक्ष राष्ट्रे
 जर्मनी
 जपान(१९३७-४५)
 इटली(१९४०-४३)

 हंगेरी (१९४१-४५),
 रोमेनिया (१९४१-४४),
 बल्गेरिया (१९४१-४४),
 थायलंड (१९४१-४५),
सहकारी राष्ट्रे
 फिनलंड (१९४१-४४),
 इराक (१९४१),
 सोव्हियेत संघ (१९३९-४१),
व इतर....

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोपआशियामध्ये दोस्त राष्ट्रेअक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले.[१][२] यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपानने व इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात पदार्पण केले. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पाडले. अमेरिकेने युद्धात सक्रिय भाग घेतला व तेथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटलीजपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर माणसे मेली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवितहानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.[३][४][५][६]

आढावा

युरोप

सप्टेंबर १, १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. जर्मनीचा नेता ॲडॉल्फ हिटलर व त्याच्या नाझी पक्षाने सोव्हिएत संघाशी त्यापूर्वी मैत्री-करार केला होता. त्यानुसार सोव्हिएत संघाने सप्टेंबर १७च्या दिवशी पूर्वेकडून पोलंडवर चाल केली. याला प्रत्युत्तर म्हणून युनायटेड किंग्डमफ्रान्सने सप्टेंबर ३ला जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले. सुरुवातीला हे युद्ध मुख्यत्वे सागरी युद्ध होते. काही महिन्यातच जर्मनीने पोलंड काबीज केले. त्यानंतर १९४०मध्ये जर्मन सैन्याने नॉर्वे, नेदरलँड्स, बेल्जियमफ्रान्स पादाक्रांत केले व १९४१मध्ये युगोस्लाव्हिया आणि ग्रीसचा पाडाव केला. इटलीने उत्तर आफ्रिकेतील ब्रिटिश वसाहतींवर हल्ला केला. काही महिन्यांनी त्यांना जर्मन सैन्याची कुमक मिळाली. १९४१ च्या मध्यापर्यंत जर्मनीने बहुतांश पश्चिम युरोप आपल्या टाचेखाली आणले होते परंतु युनायटेड किंग्डम जिंकणे त्यांना जमले नाही. याचे मुख्य कारण होते रॉयल एअर फोर्सरॉयल नेव्हीने दिलेली कडवी झुंज.

आता हिटलर सोव्हिएत संघावर उलटला व जून २२, १९४१ रोजी त्याने अचानक सोव्हिएत संघावर चाल केली. ऑपरेशन बार्बारोसा या सांकेतिक नावाने योजलेल्या या मोहिमेत जर्मनीला सुरुवातीला भरभरून यश मिळाले. १९४१ शेवटीशेवटी जर्मन सैन्याने मॉस्कोपर्यंत धडक मारली परंतु येथे ही मोहीम अडकून पडली. सोव्हिएत सैन्याने कडवा प्रतिकार करीत जर्मनीचा रेटा मोडून काढला. पुढे सोव्हिएत सैन्याने स्टालिनग्राडला वेढा घालून बसलेल्या जर्मनीच्या सहाव्या सैन्यालाच प्रतिवेढा घालुन पूर्ण सैन्याला युद्धबंदी बनवले. कुर्स्कच्या युद्धात सोव्हिएत सैन्याने जर्मनीचा प्रतिकार मोडून काढला व लेनिनग्राडचा वेढा. उठवला. जर्मन सैन्याने अखेर माघार घेतली. लाल सैन्याने त्यांचा बर्लिनपर्यंत पाठलाग केला. बर्लिनमध्ये जर्मन सैन्याने व सामान्य नागरिकांनी घराघरातून सोव्हिएत सैन्याला झुंज दिली परंतु प्रचंड प्रमाणात मिळत असलेल्या कुमकेच्या जोरावर सोव्हिएत सैन्याने बर्लिन जिंकले. याच सुमारास (एप्रिल ३०, १९४५ रोजी) हिटलरने आपल्या भूमिगत बंकरमध्ये आत्महत्त्या केली.

इकडे पाश्चिमात्य दोस्त राष्ट्रांनी १९४३मध्ये इटलीवर चाल केली. १९४४मध्ये त्यांनी नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर हल्ला केला व फ्रान्सला जर्मन आधिपत्यातून मुक्त केले. जर्मनीने चढवलेल्या प्रतिहल्ल्याला ऱ्हाईन नदीच्या किनाऱ्यावर बॅटल ऑफ द बल्ज नावाने प्रसिद्ध लढाईत दोस्त राष्ट्रांनी जबरदस्त उत्तर दिले व येथून आगेकूच करित त्यांनी जर्मनी गाठले आणि एल्ब नदीच्या किनाऱ्यावर पूर्वेकडून चालून आलेल्या सोव्हिएत सैन्याशी संधान बांधले. यावेळी जर्मनीच्या उरल्यासुरल्या सैन्याने शरणागती पत्करली व हार मान्य केली.

युरोपमध्ये चाललेल्या या धुमश्चक्री दरम्यान जर्मन राष्ट्राकडून चालविण्यात आलेल्या वंश हत्येत ६०,००,००० ज्यू व्यक्तींचा बळी गेला. याला ज्यूंचे शिरकाण अथवा होलोकॉस्ट म्हणण्यात येते.

आशिया व प्रशांत महासागर

युरोपमध्ये युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी जपानने जुलै ७, १९३७ रोजी चीनवर आक्रमण केले.,[७][८] जपानचा रोख चीनमधून पूर्व आणि आग्नेय आशियावर स्वारी करीत एकएक देश जिंकायचा होता. यात मिळालेल्या यशानंतर जपानने डिसेंबर ७, १९४१च्या दिवशी अनेक राष्ट्रांवर एकाच वेळी हल्ला केला. याच दिवशी पर्ल हार्बर येथे अमेरिकेच्या नौदलावरही हल्ला चढवला गेला. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने युद्धात उतरण्याचे निश्चित केले.

पुढील सहा महिने जपानला घवघवीत यश मिळाले पण कॉरल समुद्राच्या लढाईत अमेरिकन नौसैन्याने त्यांचा प्रतिकार केला व मिडवेच्या लढाईत जपानने हार पत्करली. यात जपानच्या चार विमानवाहू नौका बुडवून अमेरिकेने जपानी नौसैन्याचा कणाच मोडला. येथून दोस्त राष्ट्रांनी जपानवर प्रतिहल्ला चढवला व मिल्ने बेग्वादालकॅनालच्या लढाईत त्यांनी विजय मिळवला. नैर्ऋत्य प्रशांत महासागरातमध्ये विजयी ठरलेल्या दोस्त राष्ट्रांनी मग प्रशांत महासागराच्या मध्य भागावर रोख धरून मोहीम काढली. यात जपानी सैन्याने त्यांचा कडवा प्रतिकार केला. या मोहीमेदरम्यान फिलिपाईन समुद्राची लढाई, लेयटे गल्फची लढाई, इवो जिमाओकिनावाची लढाई, इ. अनेक भयानक सागरी युद्धे लढली गेली.

या दरम्यान अमेरिकन पाणबुड्यांनी जपानकडे जाणारी रसद तोडण्यात यश मिळवले. याने जपानची आर्थिकदृष्ट्या कुचंबणा होऊ लागली. १९४५मध्ये दोस्त राष्ट्रांच्या वायुदलाने जपानवर अनेक वादळी हल्ले चढवले. मुख्यत्वे नागरी वस्त्या व कारखान्यांवर झालेल्या या हल्ल्यांनी जपानची युद्धप्रवण राहण्याची शक्ती कमी झाली.

अखेर ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर परमाणु बॉम्ब टाकला. ऑगस्ट ९ला अमेरिकेने नागासाकी शहरावर असाच हल्ला केला व जोपर्यंत जपान शरण येत नाही तोपर्यंत एक एक करित जपानी शहरे बेचिराख करण्याची धमकी दिली. जपानने ऑगस्ट १५, १९४५ रोजी बिनशर्त शरणागती पत्करली व दुसऱ्या महायुद्धाचा अधिकृतरीत्या अंत झाला.[९]

पर्यवसान

या अतिभयानक युद्धात अंदाजे ६,२०,००,००० (सहा कोटी वीस लाख) व्यक्ती मरण पावल्या. हे म्हणजे जगाच्या त्यावेळेच्या लोकसंख्येच्या २.५ % होय.[१०] अर्थात, हा केवळ अंदाज आहे व प्रत्येक राष्ट्राचे अंदाज वेगवेगळे आहेत. युरोपमधील आणि आशियामधील अनेक देश या युद्धात बेचिराख झाले. त्यातून सावरायला त्यांना पुढील अनेक दशके घालवावी लागली. दुसऱ्या महायुद्धाचे राजकीय,[११] सामाजिक, आर्थिक[१२][१३][१४] तसेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जगावर झालेले प्रभाव आजदेखील दिसून येतात.

कारणे

जर्मनीचे पोलंडवरील आक्रमण व जपानचे चीन, अमेरिका व ब्रिटिश आणि डच वसाहतींवरचे आक्रमण ही दुसऱ्या महायुद्धाची कारणे समजली जातात.[१५] [१६]जगाच्या दोन्ही बाजूच्या या घटनांचे कारण होते जर्मनी व जपानमधील हुकूमशाही सत्ताधीश व त्यांची जगज्जेते होण्याची महत्त्वाकांक्षा. जरी या दोन्ही सत्तांनी आपले पाय पसरवण्यास आधीच सुरुवात केली असली तरी दुसऱ्या महायुद्धाची अधिकृत सुरुवात झाली ती या झोंडशाहीला झालेल्या सशस्त्र विरोधाने.

जर्मनीत नाझी पक्ष जरी लोकशाही मार्गाने सत्तेवर आला असला तरी एकदा हातात सत्ता आल्यावर पक्षाधिकाऱ्यांनी जर्मनीतील लोकशाही व्यवस्थेची लक्तरे काढली.[१७] असे असून जर्मन जनतेने त्यांना पाठिंबा दिला कारण पहिल्या महायुद्धात पराभूत झाल्यावर त्यांना जर्मन स्वाभिमानाला जागे करणारे सरकार प्रथमतःच मिळालेले होते.[१८] पहिल्या महायुद्धात शरणागती पत्करताना व्हर्सायच्या तहातील २३१वे कलम जर्मन जनतेला असह्य झाले होते.[१९] या शिवाय साम्यवाद-विरोध आणि आर्थिक सुबत्ता व प्रगतीच्या वचनांना भुलून जर्मनीने नाझी पक्षाला व पर्यायाने एडॉल्फ हिटलरला अमर्याद सत्ता बहाल केली. हिटलरने जर्मनीला आपल्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या सगळ्या देशांना जर्मन सत्तेखाली आणण्याचे वचन दिले व त्यादृष्टीने पावलेही उचलली. नाझी पक्षाने (व स्वतः हिटलरनेही) हिटलरला जर्मनीचा तारणहार असल्याचे भासवले,[२०] व येथून एका भस्मासुराचा जन्म झाला.

इकडे जपानमध्ये क्रिसॅंथेमम (जास्वंदी) वंशाच्या राजांचे राज्य असले तरी खरी सत्ता होती ती सैन्यातील अत्त्युच्च अधिकाऱ्यांच्या टोळक्याकडे. जपानला जगातील महासत्ता करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. जपानने या नेतृत्वाखाली मांचुरियावर १९३१मध्ये व चीनवर १९३७मध्ये आक्रमण केले होते. यामागचे कारण होते ते चीन व मांचुरियातील नैसर्गिक संपत्ती बळकावून त्याद्वारे आपला प्रभाव अधिक मजबूत करणे. युनायटेड किंग्डमअमेरिकेने या युद्धात जरी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी त्यांनी चीनला आर्थिक व सैनिकी मदत केली. याशिवाय त्यांनी जपानविरुद्ध आर्थिक नाकेबंदी करीत जपानला मिळणारे खनिज तेल व इतर रसद कापली. यामुळे जपानला चीन व मांचुरियातील युद्ध जास्त काळ चालू ठेवणे अशक्य झाले व त्यांनी तेथून काढता पाय घेण्याची तयारी सुरू केली. आता जपानकडे उपाय होते म्हणजे चीनचा जिंकलेला प्रदेश परत करणे, खनिज तेल व इतर कच्च्या मालाची इतर पुरवठे शोधणे किंवा हे मिळवण्यासाठी अजून काही देश/प्रांत जिंकणे. आग्नेय आशियातील फिलिपाईन्स आणि डच, फ्रेंच व ब्रिटिश वसाहतींमधून या खनिजांचा मुबलक पुरवठा होता व हा भाग चीनमधून हल्ला करण्याच्या टप्प्यातही होता. जपानचा समज होता की आशियातील युरोपीय सत्ता युरोपमध्ये सुरू झालेल्या युद्धात गुंतल्या होत्या व आशियात लक्ष देण्याची त्यांना फुरसत नव्हती. सोव्हिएत संघ जर्मनीशी संधान बांधून असले तरी त्यांच्यात कुरबुर सुरूच होती आणि अमेरिका युद्ध करण्याआधी संधी/करार करण्याचा प्रयत्न करेल. ही परिस्थिती जपानने आग्नेय आशिया गिळंकृत करण्यास साजेशीच होती. हा अंदाज बांधून जपानने डच व ब्रिटिश वसाहतींवर आक्रमण केले व जगाच्या पूर्व भागातील युद्धाला तोंड फुटले.

सुरुवातीला तटस्थ असलेल्या अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना जर्मनीविरुद्ध आर्थिक मदत करणे चालूच ठेवले होते. त्याला खीळ घालण्यासाठी जपानने डिसेंबर ७, १९४१रोजी अमेरिकेच्या पर्ल हार्बर येथील नौसेना तळावर जबरदस्त हल्ला केला व तेथील आरमार उद्ध्वस्त केले. अमेरिकेला आता युद्धात उतरणे भागच होते. अशा प्रकारे अमेरिकेचा या युद्धात प्रवेश झाला.

घटनाक्रम

युद्धाची सुरुवात - इ.स. १९३९

युरोपियन रणांगण

जर्मनीची आगळीक

१९३९ च्या सुमारास जर्मनीने जाहीर केले होते की व्हर्सायच्या तहात गमावलेला सगळा प्रदेश जर्मनीने जिंकलाच पाहिजे. शिवाय, ज्या ज्या प्रदेशात जर्मनवंशीय व्यक्तींचे बहुमत असेल, ते प्रदेशही जर्मनीचेच भाग झाले पाहिजेत. जर्मनीच्या अधिकृत परराष्ट्र धोरणात म्हणले होते की पोलंडझेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेशात जर्मन बाहुल्य होते व तेथील जर्मनवंशीय व्यक्तींच्या हक्कांची पायमल्ली होत होती. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी असे प्रदेश जर्मनीत असले पाहिजेत.

युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान नेव्हिल चेम्बरलेन बरोबरच्या चर्चासत्रात हिटलरने अनेक पुरावे दाखवले ज्यानुसार जर्मनीच्या शेजारी राष्ट्रातील जर्मनवंशीय लोकांवर अत्याचार होत होते. या सबबीवर हिटलरने असे प्रदेश जर्मनीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला.

हिटलरच्या या युक्तिवादाला जर्मन जनतेचा पूर्ण पाठिंबा होता. जर्मनीला पहिल्या महायुद्धात नामुष्की पत्करावी लागली होती. व्हर्सायच्या तहातील काही कलमे जर्मनीच्या आर्थिक व सैनिकी विकासाला जाचक होती. याच सुमारास जगभर आर्थिक मंदी सुरू होती, त्याचा प्रभाव जर्मनीवरही पडला होता. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला सैन्य बाळगण्यावर कडक निर्बंध होते व प्रत्येक सैनिकी हालचालीबद्दल लीग ऑफ नेशन्स द्वारे परदेशी राजवटींना जबाब द्यावा लागत होता. ततः जर्मनीत गरीबी, बेकारी व असंतोषाचे लोण सर्वदूर पसरलेले होते. याचे भांडवल करून हिटलर व नाझी पक्षाने सत्ता मिळवली व हळूहळू लोकशाही व्यवस्थेत बदल करून अधिकाधिक हुकुमशाहीगत व्यवस्था जर्मनीत आली. नाझींनी जर्मनीला पटवून दिले की अनिर्बंध सत्तेशिवाय जर्मनीचा उद्धार कोणीही करू शकणार नाही. हळूहळू हिटलरने ऱ्हाइनलॅंडरुह्र प्रदेशात सैन्य उभारणीलाही सुरुवात केली. याशिवाय अश्या अनेक कृती केल्या ज्या व्हर्सायच्या तहाविरुद्ध होत्या परंतु जर्मन राष्ट्रहितकारक होत्या. याचा परिणाम जर्मन जनता हिटलरच्या मागे एकमुखाने उभी राहण्याचा झाला.

हिटलर व नाझी पक्षाने याचे पूरेपूर फायदा घेतला. जर्मनवंशीयांवर अन्याय होत असल्याचे भासवून त्यांनी याकाळात अनेक इतरवंशीय व्यक्तींचे (रोमा जिप्सी, ज्यू, इ.) सर्रास शिरकाण सुरू केले.

युरोपीय देशांची अति-सहिष्णुता व युद्धापूर्वीचे मैत्री-करार

जर्मनीत हे सुरू असताना ब्रिटिश व फ्रेंच सरकारने त्याविरुद्ध पावले उचलायच्या ऐवजी जर्मनीच्या तुष्टीकरणाचे धोरण अवलंबिले. त्यांना जर्मनीशी उघड संघर्ष टाळायचा होता कारण पहिले महायुद्ध संपून जेमतेम २० वर्षे होत होती. संपूर्ण युरोप त्यातून सावरत होता व अजून एक युद्ध झाल्यास युनायटेड किंग्डमफ्रान्सच नव्हे तर युरोपमधील प्रत्येक देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली असती. त्यामुळे दोन्ही देशांनी जर्मनीला ढील देणेच पसंत केले. याचे पर्यवसान १९३८ च्या म्युनिक करारात झाले. याआधी जर्मनीने चेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेश बळकावले होते व अजून पुढे सरकण्याच्या तयारीत असताना फ्रान्स व ब्रिटनने जर्मनीची ही आगळीक मान्य केली व चेकोस्लोव्हेकियाचे प्रदेश जर्मनीला देऊन टाकले. चेम्बरलेनने जाहीर केले की म्युनिक करार हा "आपल्या काळातील शांततेचेच प्रतीक" आहे. मऊ लागल्यावर कोपराने खणल्यासारखे जर्मनीने मार्च १९३९मध्ये उरलेले चेकोस्लोव्हेकियासुद्धा बळकावले. जर्मनीच्या मनसूब्यांबद्दल भ्रमात राहिलेल्या दोस्त राष्ट्रांकडे नुसते बघत बसण्यापेक्षा काही गत्यंतर नव्हते. या व अशा छोट्या-मोठ्या चालींनंतर वर्षभरात युद्धाला तोंड फुटले.

म्युनिक करार निष्फळ ठरल्यावर ब्रिटन/फ्रान्ससना कळले की हिटलरच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून चालणार नव्हते व जर्मन महत्त्वाकांक्षा नुसते आसपासचे प्रदेश गिळंकृत करून थांबणार नव्हती. मे १९, १९३९ला पोलंडने व फ्रान्सने परस्पर-मैत्री करार केला व एकावर आक्रमण झाल्यास दुसऱ्याने मदतील धावून येण्याचे मान्य केले. ब्रिटन व पोलंडमध्ये असाच करार मार्चमध्ये झालेला होता. इकडे जर्मनी व सोव्हिएत संघाने ऑगस्ट २३, १९३९ला मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करारावर सह्या केल्या. या करारात जर्मनी व सोव्हिएत संघाने युरोप जिंकून घेणे गृहित धरले होते व त्यानंतर युरोप आपापसात कसा वाटून घ्यायचा याची नोंद होती. तोपर्यंत दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांच्या सैनिकी कार्रवाईत दखल न देण्याचे कबूल केले व सोव्हिएत संघाकडून जर्मनीला खनिज तेल व इतर रसद पुरवण्याची तरतूद घातली. या कलमामुळे जर्मनीची उत्तर समुद्रातून येणाऱ्या मालवाहतूकीवरील भीस्त कमी झाली. पहिल्या महायुद्धात हा वाहतूकमार्ग रोखून धरून ब्रिटनने जर्मनीच्या नाकीतोंडी पाणी आणले होते. ही तरतूद झाल्यावर हिटलरची पोलंड व वेळप्रसंगी ब्रिटन व फ्रान्सशीही युद्ध करण्याची तयारी झाली. पुढचे पाउल होते ते काहीतरी कुरापत काढणे. जर्मनीने जाहीर केले की डान्झिगच्या स्वतंत्र शहरात जर्मन व्यक्तींवर अन्याय होत आहे व याचा उपाय करण्यासाठी जर्मनी डान्झिग व पोलंडमधील अन्य शहरे जिंकून घेईल. हे पाहून पोलंड ने ऑगस्ट २५रोजी युनायटेड किंग्डमशी नव्याने मैत्री करार केला, पण त्याचा जर्मन बेतांवर काही प्रभाव पडला नाही.

जर्मनी व सोव्हिएत संघाचे पोलंडवर आक्रमण

जर्मन आक्रमकांशी लढणारे पोलिश सैनिक, सप्टेंबर १९३९

सप्टेंबर १, १९३९रोजी जर्मनीने खोटी पोलिश हल्ल्याची सबब सांगून पोलंडवर आक्रमण केले. युद्धोत्तर अहवालात कळून आले की पोलंडने जर्मन ठाण्यावरील तथाकथित हल्ला झालाच नव्हता. सप्टेंबर ३ला भारतासह युनायटेड किंग्डम व फ्रान्सने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. काही दिवसातच कॅनडा, ऑस्ट्रेलियान्यू झीलंडनेही त्यांचा साथ देण्याचे जाहीर केले. फ्रान्सने जरी युद्ध जाहीर केले असले तरी त्यांची हालचाल संथ होती. सार प्रांतात नावापुरती चढाई केल्यावर काही दिवसात तीसुद्धा सोडून दिली. युनायटेड किंग्डमला नौसेनेच्या कवायती करण्याशिवाय काही करणे शक्य नव्हते. इकडे जर्मनीने पोलिश सैन्याची वाताहत करीत सप्टेंबर ८ रोजी पोलंडची राजधानी वॉर्सोपर्यंत धडक मारली.

सप्टेंबर १७ला सोव्हिएत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारात ठरवल्याप्रमाणे पोलंडवर पूर्वेकडून चाल केली. पोलिश सैन्याला आता दुसरी आघाडी उघडणे भाग पडले व त्यामुळे आधीच खिळखिळी झालेली बचावाची फळी कोलमडली. पराभव अटळ दिसताना पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व सरसेनापतीने दुसऱ्याच दिवशी रोमेनियात पळ काढला. वॉर्सोतील सैन्याने महिनाभर तग धरली पण ऑक्टोबर १ रोजी जर्मन सैन्य शहरात घुसले. ४-५ दिवस घराघरातून युद्ध करून ऑक्टोबर ६ला पोलिश सैन्याने हत्यारे खाली ठेवली. काही तुकड्या पळून शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या व तेथून त्यांनी भूमिगत सशस्त्र चळवळ उभारली. या चळवळीने युद्धाच्या अखेरच्या दिवसांत दोस्त राष्ट्रांची मोठी मदत केली. जरी राजधानी व जवळजवळ संपूर्ण देशाचा पाडाव झाला तरी पोलंडने अधिकृतरीत्या जर्मनीकडे शरणागती पत्करली नाही.

खोटे युद्ध

पोलंडच्या पाडावानंतर १९३९ च्या हिवाळ्यात जर्मनीने आपली वाटचाल तात्पुरती थांबवली. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी आपली बचावफळी पक्की केली व पुढील हल्ल्यांची योजना आखणे चालू ठेवले. इकडे ब्रिटन व फ्रान्सने आपले बचावात्मक धोरण चालूच ठेवले. एप्रिल १९४०पर्यंत कोणीच काही मोठी हालचाल केली नाही. वृत्तपत्रांनी या कालावधीला खोटे युद्ध अथवा सिट्झक्रीग असे उपहासात्मक नाव दिले.

अटलांटिकची लढाई

पूर्व युरोपमध्ये लढाई सुरू होताच उत्तर अटलांटिक समु्द्रात जर्मन यु-बोटींनी दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. छुप्या पद्धतीने हल्ला करणाऱ्या या पाणबुड्यांची संख्या जास्त नसली तरी ही कसर त्यांनी त्यांची कुशलता, हिंमत व नशीबाने भरून काढली. ब्रिटिश क्रुझर एच.एम.एस. करेजस अशाच एका यु-बोटीला बळी पडली तर अजून एका यु-बोटीने एच.एम.एस. रॉयल ओक या युद्धनौकेला बंदरातून बाहेर पडण्याची संधी न देताच जलसमाधी दिली. युद्धाच्या पहिल्या चार महिन्यात यु-बोटींनी ११० जहाजे बुडवली व व्यापारी जहाजवटीवर भीतीचे सावट पसरवले.

दक्षिण अटलांटिक समुद्रात जर्मन पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पीने नऊ ब्रिटिश व्यापारी नौका बुडवल्या. अखेर एच.एम.एस. अजॅक्स, एच.एम.एस. एक्झेटरएच.एम.एन.झेड.एस. अकिलीस ने तिला मॉॅंटेव्हिडियोजवळ गाठले. प्लेट नदीच्या लढाईत ग्राफ स्पीला पराभव अटळ दिसता तिच्या कप्तान हान्स लांग्सदोर्फ याने समुद्राकडे प्रयाण केले व पकडले जाण्यापेक्षा स्वतःच ग्राफ स्पीला जलसमाधी दिली.

पॅसिफिक रणांगण

दुसरे चीन-जपान युद्ध

पूर्वेतील युद्ध युरोपच्या आधीच दोन वर्षे सुरू झाले होते. जपानने १९३१मध्ये मांचुरिया जिंकून तेथे तळ ठोकलेला होता. जुलै ७, १९३७ रोजी जपानने मांचुरियाची हद्द ओलांडून बिजींगवर (तेव्हाचे बिपींग) हल्ला चढवला. विद्युतवेगाने आगेकूच करीत जपानी सैन्य शांघायपर्यंत पोचले परंतु तेथे त्यांची प्रगती थांबली. डिसेंबर १९३७मध्ये शांघाय पडले व लगेचच राजधानीचे शहर नानजिंग (तेव्हाचे नानकिंग) ही जपानने जिंकले. चीनी सरकारने नानजिंगहून पळ काढून चॉॅंगकिंग येथे कामचलाऊ राजधानी उभारली. नानजिंग जिंकल्यावर जपानी सैन्याने तेथील युद्धकैदी व नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले (पहा - नानकिंगची कत्तल)व एका महिन्यात सुमारे ३,००,००० व्यक्तींची कत्तल केली.

दुसरे रशिया-जपान युद्ध

जपानमंगोलियाच्या सरहद्दीवर खाल्का नदी आहे. मांचुरियातील जपानी राजवटीनुसार ही मांचुरिया-मंगोलियाच्यामधील हद्द होती. मंगोलियाच्या मते हद्द नदीपलीकडे ३० किमी पूर्वेस होती. मे ८, १९३९ रोजी ७०० मोंगोल घोडेस्वार नदी पार करून पूर्वेस आले. ते पाहताच मांचुरियन सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. काही दिवसातच सोव्हिएत संघाने मंगोलिया व जपानने मांचुरियाच्या सैन्याच्या मदतीला आपले सैन्य पाठवले व तुंबळ युद्धास सुरुवात झाली. सप्टेंबरपर्यंत चालू असलेल्या या युद्धात १८,००० जपानी तर ९,००० सोव्हिएत-मंगोल सैनिक मृत्यू पावले. येथे सुरू असलेले युद्ध थांबले नसते व एकाच वेळी येथ तसेच जर्मनीशीसुद्धा लढायची पाळी आली तर सोव्हिएत संघाला दोन्ही आघाड्या संभाळणे कठीण गेले होते. सोव्हिएत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारावर सही करण्यामागे हेही एक कारण होते.

युद्ध पसरले - इ.स. १९४०

युरोपीय रणांगण

सोव्हिएत संघाचे बाल्टिक देशांवर आक्रमण

जर्मनीसोव्हिएत संघात युद्धाच्या आधी झालेल्या मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारानुसार फिनलंडला सोव्हिएत संघाचे मांडलिक राष्ट्र ठरवण्यात आले होते. त्यानुसार सोव्हिएत संघाने नोव्हेंबर ३०, १९३९ रोजी फिनलंडवर हल्ला केला. येथून सुरू झालेल्या युद्धाला हिवाळी युद्ध म्हणतात. सोव्हिएत संघाने फिनिश सैन्याच्या चौपट सैनिक पाठवले तरीही त्यांची पुरेशी प्रगती झाली नाही. फिनिश बचावाची फळी भक्कम होती व त्यांनी पहिला हल्ला रोखून धरला. हळूहळू लाल सैन्याने आपले हल्ले तिखट केले व फळी फोडण्यात यश मिळवले. फिनलंडने तहाची बोलणी सुरू केली व लेनिनग्राडला लागून असलेले व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे प्रदेश सोव्हिएत संघाला दिले. या अकारण सुरू केलेल्या युद्धाविरुद्ध जगातील इतर देशांनी विरोध दर्शविला व डिसेंबर १४ला सोव्हिएत संघाची लीग ऑफ नेशन्समधून हकालपट्टी झाली. यामुळे सोव्हिएत संघाला जणू अधिक आगळीक करण्याची मुभाच मिळाली. जून १९४०मध्ये त्यांनी लात्व्हिया, लिथुएनिया आणि एस्टोनियाचा पाडाव केला व तेथील सत्ताधारी व्यक्तींना सैबेरियातील गुलागमध्ये पाठवून दिले. याशिवाय सोव्हिएत संघाने रोमेनियाकडून बेसारेबियाउत्तर बुकोव्हिना हे प्रांतही बळकावले.

जर्मनीचे डेन्मार्कवर व नॉर्वेवर आक्रमण

सोव्हिएत संघ व फिनलंडमधील हिवाळी युद्ध संपताना जर्मनीने एप्रिल ९, १९४०ला एकाच वेळी डेन्मार्कनॉर्वेवर ऑपरेशन वेसेरुबंग या सांकेतिक नावाखाली मोहीम काढली. डेन्मार्कने लगेचच नांगी टाकली पण नॉर्वेने प्रतिकार केला. युनायटेड किंग्डमने नॉर्वेवर चढाई करण्याचा बेत आखलेलाच होता. त्यांनी आपले सैनिक उत्तर नॉर्वेत उतरवले पण जूनपर्यंत जर्मन सैन्य वरचढ ठरले व दोस्त राष्ट्रांनी नॉर्वेतून काढता पाय घेतला. नॉर्वेच्या सैन्याने शरणागती पत्करली व जवळजवळ संपूर्ण नॉर्वे जर्मनीच्या ताब्यात आले. नॉर्वेचा राजा आपल्या कुटुंबियांसह लंडनला पळून गेला. नॉर्वेचा सागरी किनारा हातात आल्यावर जर्मनीने तेथे हवाई व नौसेनेचे तळ उभारले व आर्क्टिक समुद्रातून होणाऱ्या पुढील मोहीमेची तयारी सुरू केली.

जर्मनीचे फ्रान्सवर व 'खालच्या देशांवर' आक्रमण

पॅरिसच्या शॉंझ एलिझे रस्त्यावर जर्मन सैनिक, जून १९४०

लक्झेम्बर्ग, बेल्जियमनेदरलँड्स हे समुद्रसपाटीपासून समतल व काही प्रदेशात समुद्राच्या पातळीच्याही खाली आहेत म्हणून त्यांना लो कन्ट्रीज अथवा खालचे देश असे म्हणतात. मे १०, १९४० रोजी जर्मनीने या तीनही देश व शिवाय फ्रान्सवर हल्ला केला. या घटनेने खोटे युद्ध संपले व खरे युद्ध परत सुरू झाले. जर्मनीला रोखण्यासाठी ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स व फ्रेंच सैन्य उत्तर बेल्जियममध्ये घुसले. दक्षिणेत फ्रान्सने मॅजिनो लाईनवर आपली बचावफळी तयार केलेली होती. तेथे जर्मन सैन्याला अडवून ठेवून उत्तरेत गनिमी काव्याने जर्मनीशी लढायचे असा त्यांचा बेत होता पण जर्मनीने ब्लिट्झक्रीग अथवा विद्युतवेगी युद्धाचा अत्युत्तम नमूना दाखवत फ्रेंच व ब्रिटिश सैन्याचा धुव्वा उडवला. इकडे लुफ्तवाफेने नेदरलँड्सच्या रॉटरडॅम शहरावर बॉम्बफेक करून शहराचा विनाश केला.

हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात वेह्रमाख्टची (जर्मन सेना) पॅन्झरग्रुप फोन क्लाईस्ट ही तुकडी सुसाट आर्देन्नेस पार करून गेली. दोस्त राष्ट्रांचा अंदाज होता की दाट जंगल असलेला हा प्रदेश यांत्रिकी व रणगाड्यांना पार करणे अशक्य होते. हा अंदाज चुकीचा ठरवत जर्मन सैन्याने सेदान येथे येऊन धडकले. सेदानचे रक्षण करणारे सैन्यदल हे फ्रेंच सैन्याचे नेहमीचे सैनिक नव्हते. येथे हल्ला होण्याची शक्यता कमी असल्याकारणाने येथे कुमक जास्त नव्हती. वेह्रमाख्टने सहजगत्या बचावाची फळी फोडली आणि पश्चिमेकडे आगेकूच करीत थेट इंग्लिश चॅनेल पर्यंत जाऊन पोचले. जर्मन सैन्याच्या दुसरे सैन्याने बेल्जियम, लक्झेम्बर्ग व नेदरलँड्सचा सहजगत्या पाडाव केला. आता दोस्तराष्ट्रांचे सैन्य दुभागले गेले व उत्तर फ्रान्स व खालच्या देशातले सैनिक जर्मन सैन्याच्या कचाट्यात सापडले. त्यांच्या समोर आता आत्मसमर्पण करणे किंवा पळ काढणे हेच पर्याय होते. ऑपरेशन डायनॅमो या मोहिमेअंतर्गत ३,३८,००० दोस्त सैनिकांना डंकर्कहून उचलण्यात आले. युद्धनौका, होड्या, व मिळेल त्या तरंगणाऱ्या वाहनांतून या सैनिकांनी इंग्लंड गाठले.

जून १०ला इटली जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरले व फ्रान्सच्या दक्षिणेकडून त्यांनी हल्ला केला. जर्मन सैन्याने फ्रान्समध्ये अनिर्बंध कूच सुरू ठेवली व जवळजवळ सगळे फ्रान्स आपल्या टाचेखाली आणले. जून २२, १९४० रोजी फ्रान्सने शस्त्रसंधीची याचना केली व शरणागती पत्करली. जर्मन सैन्याने पॅरिसमध्ये तळ ठोकला व आग्नेय फ्रान्समध्ये विची फ्रान्स हे नावापुरते स्वतंत्र परंतु खरेतर जर्मनधार्जिणे सरकार बसवले. अशाप्रकारे बॅटल ऑफ फ्रान्स ही एकतर्फी लढाई जर्मनीने जिंकून युरोपमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

बॅटल ऑफ ब्रिटन

फ्रान्सवरची मोहीम विजयी होत असताना जर्मनीने युनायटेड किंग्डमवर ऑपरेशन सी लायन या नावाच्या मोहिमेची आखणी सुरू केली. ब्रिटिश सैन्याने डंकर्कहून पळ काढताना बरीचशी हत्यारे, जड तोफा व रसद तेथेच टाकून दिली होती व त्यामुळे ब्रिटिश सैन्याची स्थिती अगदी केविलवाणी झाली होती. असे असता जर एक घणाघाती घाव घातला तर युनायटेड किंग्डमने गुडघे टेकले असते. पण ब्रिटनवर हल्ला करायचा तर त्यासाठी समुद्र पार करावा लागणार होता किंवा आरमारी वेढा घालावा लागला असता. रॉयल नेव्हीशी टक्कर देणे जर्मन आरमाराला शक्य नव्हते पण काही करून ब्रिटीिद्वीपांवर सैन्य उतरवता आले व त्याला हवेतून आधार देता आला तर विजय निश्चित होता. त्यासाठी आधी रॉयल एअर फोर्सचा समाचार घेणे आवश्यक होते. लुफ्तवाफेरॉयल एअर फोर्सच्या या लढाईला बॅटल ऑफ ब्रिटन म्हणतात. लुफ्तवाफेने सुरुवात केली ती रॉयल एअर फोर्सच्या विमानतळ व रडारचा वेध घेऊन. मोडक्यातोडक्या धावपट्ट्यांवरूनसुद्धा उड्डाणे भरून आर.ए.एफ.च्या वैमानिकांनी त्यांचा प्रतिकार सुरू केला व धाव घेतली थेट बर्लिनकडे. राजधानी बर्लिनवरील झालेल्या बॉम्बफेकीमुळे ॲडॉल्फ हिटलरचा संताप झाला व त्याने लंडन शहरावर हल्ले सुरू करण्याचे आदेश दिले. द ब्लिट्झ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमध्ये लंडनचे अतोनात नुकसान झाले. आर.ए.एफ.ने आपल्या स्पिटफायरहरिकेन विमानांनी कसेबसे का होईना हे हल्ले परतवून लावले व लुफ्तवाफेला हवेत वर्चस्व मिळू दिले नाही. इकडे समुद्रात रॉयल नेव्हीने जर्मन आरमाराला रोखून धरले व इंग्लंडवर चढाई करण्याचा हिटलरचा मनसुबा धुळीत मिळाला. आता युनायटेड किंग्डमचा नाद सोडून हिटलरने आपली नजर पूर्वेकडे वळवली.

इटलीचे ग्रीसवर आक्रमण

युद्धापूर्वीच इटलीने आल्बेनियावर चढाई केलेली होती. ऑक्टोबर २८, १९४० रोजी तेथून त्यांनी ग्रीसवर हल्ला केला. ग्रीक सैन्याने तिखट उत्तर दिले व पुढील दोन महिन्यात इटलीलाच मागे रेटत अल्बेनियाचा एक चतुर्थांश भाग काबीज केला. रॉयल नेव्हीने ग्रीसच्या मदतीला येऊन इटलीच्या आरमाराविरुद्ध कारवाया सुरू केल्या. या धामधुमीत इटलीचे ५,३०,००० सैनिक अडकून पडले व त्यांची प्रगती खुंटली.

आशियातील व प्रशांत महासागरातील रणांगण

दुसरे चीन-जपान युद्ध

१९४० च्या सुमारास येथील युद्ध थंडावले होते. इतस्ततः हल्ल्यात कोणत्याच बाजूला निर्णायक विजय मिळत नव्हता. अमेरिका जरी अधिकृतरीत्या तटस्थ असले तरी चीनला त्यांची भरघोस आर्थिक मदत होती, शिवाय चिनी वायुदलाच्या मदतीला काही अमेरिकन वैमानिकही पाठविण्यात आले होते.

आग्नेय आशियातील युद्ध

जुलै १९४०मध्ये फ्रेंच इंडो-चायनामध्ये आपल्याला लष्करी तळ उभारण्यासाठी जागा पाहिजे असल्याचे जपानने सूतोवाच केले. फ्रान्स व इतर पाश्चिमात्य देशांनी अर्थातच ही मागणी धुडकावून लावली. अमेरिकेने १९११ च्या जपान-अमेरिका व्यापारी करारातून अंग काढून घेतल्याचे जाहीर केले व जपानला युद्धसामग्री निर्यात करण्यावर बंदी घातली. जपानने सप्टेंबर २२ रोजी जपानी सैन्याने उत्तर फ्रेंच इंडो-चायना वर चाल केली.

उत्तर आफ्रिकेचे रणांगण

फ्रेंच आरमाराने नांगी टाकल्यावर भूमध्य समुद्रातील वर्चस्वासाठी रॉयल नेव्ही व इटालियन आरमारात चढाओढ सुरू झाली. रॉयल नेव्हीने आपल्या जिब्राल्टर, माल्टाइजिप्तच्या अलेक्झांड्रिया, इजिप्त बंदरातील तळांवरून कारवाया सुरू ठेवल्या. ऑगस्टमध्ये इटालियन सैन्याने ब्रिटिश सोमालीलॅंड जिंकले व पुढील महिन्यात लिबियामधून इजिप्तमधील ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला. इटलीचा बेत होता सुएझ कालवा जिंकायचा. असे झाल्यावर भारत व इंग्लंडमधील नौकानयन बंद पडले असता व इंग्लंडला मिळणारी रसद व पैसा कमी होऊन युद्धातील जोर कमी झाला असता. या हल्ल्याला ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन व भारतीय फौजांनी ऑपरेशन कंपास या मोहीमेत प्रत्युत्तर दिले व कालवा ब्रिटिश हातातच ठेवला. जर्मनीने आपली आफ्रिका कॉर्प्स नावाने नंतर ख्यातनाम झालेली रणगाड्यांची सेना जनरल इर्विन रोमेलच्या नेतृत्वाखाली लिब्यात उतरवली.

युद्ध जगभर पसरले - इ.स. १९४१

युरोपीय रणांगण

लेंड लीझ

फ्रान्समध्ये प्रयत्नांची शर्थ करताना युनायटेड किंग्डमचे लश्करी बळ रोडावले होते. भारत व इतर वसाहतींतून अमाप संपत्ती ओढूनसुद्धा राष्ट्र आता भिकेला लागण्याची चिह्ने होती. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकन काँग्रेसला पटवून दिले की अमेरिकेने जर ब्रिटिश साम्राज्याला मदत नाही केली तर युद्ध अमेरिकेच्या दाराशी येण्यास वेळ लागणार नाही. कॉॅंग्रेसने युद्धात उतरण्यास नकार दिला परंतु युनायटेड किंग्डम व ३७ इतर दोस्त राष्ट्रांना ५,००,००,००,००० (पाच अब्ज) अमेरिकन डॉलरचे युद्धसाहित्य व इतर रसद पुरवण्याचे मान्य केले. यातील ३,४०,००,००,००० डॉलर हे युनायटेड किंग्डमसाठी राखीव होते. अमेरिकन कॉॅंग्रेसचा हा ठराव लेंड लीझ नावाने ओळखण्यात येतो. कॅनडाने देखिल ४,७०,००,००,००० (चार अब्ज सत्तर कोटी) अमेरिकन डॉलरचे साहित्य युनायटेड किंग्डमला पाठवले.

जर्मनीचे ग्रीसवर, क्रीटवर व युगोस्लाव्हियावर आक्रमण

मार्च २८ला रॉयल नेव्हीने इटालियन आरमाराशी भूमध्य समुद्रात केप माटापानजवळ झुंज घेतली. जवळजवळ एकतर्फी झालेल्या या लढाईत इटालियन आरमाराने तीन विनाशिका व पाच क्रुझर गमावल्या. रॉयल नेव्हीची दोन विमाने खर्ची पडली. पांगळ्या झालेल्या इटालियन आरमाराची ग्रीसमध्ये समुद्रमार्गे सैनिक पोचवण्याची कुवत कमी झाली. एप्रिल ६, १९४१ रोजी जर्मनी, इटली, हंगेरीबल्गेरियाच्या सैन्यांनी युगोस्लाव्हियावर चढाई केली. नाममात्र प्रतिकार मोडून काढत हे आक्रमक १० दिवसांत राजधानीपर्यंत पोचले व शरण आलेल्या युगोस्लाव्हियात त्यांनी अक्ष-धार्जिणे सरकार बसवले. जरी युगोस्लाव्ह सैन्याने लढा दिला नसला तरी तेथील नागरिकांनी दोन भूमिगत सशस्त्र चळवळी उभारल्या. या दोन्हींनी अक्ष राष्ट्रांबरोबर एकमेकांवरही हल्ले सुरू ठेवले. याच दिवशी (एप्रिल ६) जर्मनीने बल्गेरियातून ग्रीसवर हल्ला केला. इटलीला प्रखर लढा देणाऱ्या ग्रीक सैन्याची कुवत जर्मनीच्या अफाट सैन्यापुढे कमी पडली व त्यांनी माघार घेतली. एप्रिल २७ला अथेन्सचा पाडाव होण्यापूर्वी युनायटेड किंग्डमने ५०,००० ग्रीक सैनिकांना उचलले. जरी ग्रीस पडले असले तरी जर्मनीचे सैन्य बरेच दक्षिणेला आले होते. परत आपल्या आघाडीवर जाण्यात त्यांचे जवळजवळ ६ आठवडे खर्ची पडले. याची जर्मनीला पुढे मोठी किंमत मोजावी लागणार होती.

मे २०, १९४१ रोजी जर्मनीने आपल्या ७वी फ्लायगर डिव्हिजन५ माउंटन डिव्हिजन या युद्धकुशल तुकड्या क्रीटमध्ये उतरवल्या. ग्रीसमधून पराभूत होऊन आलेल्या ११,००० ग्रीक सैनिकांनी व २८,००० स्थानिक अर्धसैनिक दलांनी त्यांचा प्रतिकार केला. बेटावरील तीन विमानतळांवर लक्ष केंद्रित केलेल्या जर्मन सैन्याचे पहिल्या दिवशी अतोनात नुकसान झाले पण मालेमे विमानतळ काबीज करण्यात त्यांना यश मिळाले. त्यानंतर त्यांनी विमानाद्वारे अधिक कुमक मागवली व लवकरच ग्रीक सैन्याचा बीमोड केला. जरी जर्मनीने ही लढाई जिंकली असली तरी ग्रीक सैन्याने हवाईहल्ल्यांविरुद्ध दाखवलेल्या शौर्यामुळे हिटलरने हवाई हल्ले करणे बंद केले.

जर्मनीचे सोव्हिएत संघावर आक्रमण

ऑपरेशन बार्बारोसा - जर्मनीची सोव्हिएत संघावर चाल - जून ते डिसेंबर १९४१.

जर्मनी व सोव्हिएत संघाने ऑगस्ट १९३९मध्ये मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करार केला व त्यानंतर एकमेकांना युद्धात सहकार्य केले. तेव्हापासून १९४१ च्या मध्यापर्यंत सोव्हिएत संघाने जर्मनीला युद्धसाहित्य, रसद, इ. साहाय्य केले. जून २२, १९४१ला जर्मनी सोव्हिएत संघावर उलटला. या दिवशी ऑपरेशन बार्बारोसा ही आधुनिक इतिहासातील मनुष्यबळाच्या बाबतीत सगळ्यात मोठी मोहीम सुरू झाली. जर्मनीने तीन सैन्यसमूह, अंदाजे ४०,००,००० सैनिक सोव्हिएत संघात घुसवले. लाल सैन्याला या व्यूहात्मक धक्क्यातून सावरायची संधी न देता ही टोळधाड रशियात विद्युतवेगाने शिरली. रशियन सैन्याच्या तुकड्यांना वेढा घालायचा व त्याचा घेरा आवळत आवळत शत्रूला नामशेष करायचे हा जर्मन सैन्याचा या लढायांमधील खाक्या होता. लाल सैन्याचे संपूर्ण पश्चिम सैन्य याप्रकारे नेस्तनाबूद झाले. अक्ष राष्ट्रांचे लक्ष विचलित करायला सोव्हिएत संघाने जून २५ला फिनलंडवर परत हल्ला केला व दुसरी आघाडी उघडली. असे असूनसुद्धा जर्मनीला समोरासमोर टक्कर देता येत नाही हे पाहून सोव्हिएत सैन्याने दग्धभू(स्कॉर्च्ड अर्थ) व्यूह अंगिकारला. जर्मन सैन्य जेथे चढाई करणे अपेक्षित होते त्या भागातील कारखाने व इतर व्यवसाय होते तसे मोडले व भराभर युरल पर्वतांच्या पलीकडे नेउन जशीच्या तशी परत उभे केले. शेतातील उभी पिके जाळली, अन्नभांडार नष्ट केले व पूर्वेकडे माघार घेतली. नोव्हेंबर १९४१ च्या सुमारास जर्मन सेना लेनिनग्राड, मॉस्कोरोस्तोव्हच्या वेशीवर येऊन ठेपली. आता अतिकठीण असा रशियन हिवाळा सुरू झाला व पाच महिने अव्याहत चाललेली जर्मन आगेकूच ठप्प झाली. जर्मन सेनाधिकाऱ्यांचा अंदाज होता की रशियातील थंडी सुरू व्हायच्या आतच जर्मन ब्लिट्झक्रीगपुढे रशिया गुडघे टेकेल व हिवाळ्यात युद्ध करायची गरजच उरणार नाही. ग्रीसमध्ये घालवलेले ६ आठवडे आता त्यांच्या अंगाशी येणार होते. जर्मन सेनेला स्थानिक रसद मिळणे दुरापास्तच होते. त्यांना पोलंड व जर्मनीतून युद्धसाहित्य, यंत्रसामग्री व अन्न-धान्यदेखील मागवावे लागत होते. कडाक्याच्या थंडीत हे सगळे आघाडीवर पोचायला अनेक आठवडे लागत होते व जर्मन सैन्याची कुचंबणा व काही ठिकाणी तर उपासमारदेखील होऊ लागली.

इकडे या थंडीची सवय असलेल्या लाल सैन्याने आपली लश्करभरती चालूच ठेवली होती. जर्मन सैन्य मॉस्कोपासून हाकेच्या अंतरावर आले असता सोव्हिएत सैन्याने प्रतिहल्ले सुरू केले. आपली राजधानीच इरेला पडलेली पाहून त्यांनी केलेल्या या कडव्या हल्ल्यांनी आधीच अगतिक झालेले जर्मन सैन्य मागे हटले. सोव्हिएत रेटा इतका जबरदस्त होता की अक्ष सैन्याने काही दिवसातच १५०-२५० कि.मी. पीछेहाट केली. दुसऱ्या महायुद्धातील अक्ष राष्ट्रांची ही पहिली माघार होय.

अटलांटिकचे युद्ध

मे ९, १९४१ रोजी रॉयल नेव्हीची विनाशिका एच.एम.एस. बुलडॉगने एक जर्मन यू-बोट पकडली व त्यातून संपूर्णावस्थेत असलेले एनिग्मा यंत्र जप्त केले. जर्मनीचे कूटसंदेश समजण्यासाठी हे यंत्र अतिमहत्त्वाचे होते. मे २४ रोजी जर्मन युद्धनौका बिस्मार्क युद्धात उतरली. डेन्मार्कच्या अखातातील लढाईत बिस्मार्कने रॉयल नेव्हीचा मानदंड असलेली बॅटलक्रुझर एच.एम.एस. हूडला जलसमाधी दिली. चिडलेल्या रॉयल नेव्हीने बिस्मार्कचा शोध घेण्यासाठी युद्धनौकांचा तांडा सोडला. तीन दिवस सतत चाललेल्या या शोधाच्या अंती बिस्मार्क सापडली. हा लपाछपीचा खेळ २,७०० कि.मी. चालला. यात ब्रिटिश आरमाराच्या आठ युद्धनौका, दोन विमानवाहू नौका, अकरा क्रुझर, एकवीस विनाशिका व सहा पाणबुड्यांनी भाग घेतला होता. एच.एम.एस. आर्क रॉयल या विमानवाहू नौकेवरील विमानांनी बिस्मार्कवर टॉरपेडोने हल्ला केला. हल्ल्याने नुकसान फारसे झाले नाही पण बिस्मार्कचे सुकाणू अडकून बसले. दिशाहीन झालेल्या बिस्मार्कला मग इतर युद्धनौकांनी गाठले व बुडवले.

आशिया व प्रशांत महासागरातील रणांगण

अमेरिकेचे युद्धात पदार्पण

हिटलरच्या सोव्हिएत संघावरील आक्रमणाची जपानला पूर्वकल्पना नव्हती. सोव्हिएत संघाला याची कुणकुण होती व एकाचवेळी दोन्हीकडून हल्ला होण्याचे टाळण्यासाठी सोव्हिएत संघाने जपानशी मैत्री करण्याचे ठरवले. एप्रिल १३, १९४१ रोजी सोव्हिएत-जपान तटस्थता करार करण्यात आला. यात सोव्हिएत संघाला पूर्वेकडून हल्ला न होण्याचे आश्वासन होते तर जपानला खात्री मिळाली की पश्चिमेकडून त्यांच्यावर हल्ला होणार नाही. जपानला आता आशिया-प्रशांत महासागरामधील युद्धावर लक्ष केंद्रित करायला मोकळीक मिळाली.

जपानी विमानहल्ल्यांमुळे बुडालेली यु.एस.एस. कॅलिफोर्निया

१९४१ च्या ग्रीष्मात अमेरिका, युनायटेड किंग्डमनेदरलँड्सने जपानला खनिजतेल विकण्यावर निर्बंध घातले. याने जपानची युद्ध चालू ठेवण्याची कुवत धोक्यात आली. जपानने होत्या त्या रसदीनिशी चीनमधील आगेकूच चालूच ठेवली. जपानचा बेत होता अमेरिकेवर अचानक धाड टाकून त्यांच्या आरमाराला निकामी करायचे व त्याच वेळी डच ईस्ट ईंडीझमध्ये घुसून तेथील तेलसाठे बळकावायचा. त्यानुसार डिसेंबर ७, १९४१ रोजी जपानी आरमाराने अमेरिकेच्या हवाई प्रांतातील पर्ल हार्बर येथील आरमारी तळावर प्रचंड शक्तीनिशी हल्ला केला. या धाडीत अमेरिकेच्या आरमाराचे प्रचंड नुकसान झाले. सहा युद्धनौका बुडाल्या, दोन निकामी झाल्या व इतर अनेक नौकांचा विनाश झाला. या शिवाय नौका-दुरूस्ती केंद्र, रसद साठा व इतर अनेक व्यवसाय विनाश पावले. शेकडो सैनिक व नागरिक मृत्युमुखी पडले. अमेरिकेच्या सुदैवाने जपानी धाडीचे मुख्य लक्ष्य असलेल्या चार विमानवाहू नौका त्या वेळी कवायतींसाठी बाहेर पडलेल्या होत्या त्या वाचल्या व तळावरील इंधनसाठ्यालाही धक्का पोचला नाही. दुसऱ्या दिवशी अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले. या हल्ल्यामुळे आत्तापर्यंत तटस्थ असलेले अमेरिकन जनमत पूर्णतः बदलले व या हल्ल्याचा वचपा काढण्याची मागणी होऊ लागली.

अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारताच जर्मनीने डिसेंबर ११ला अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. ॲडॉल्फ हिटलरचा अंदाज होता की याने जर्मनीला जपानची सहानुभूती मिळेल व जपानकडून जर्मनीच्या सोव्हिएत संघावरील आक्रमणाला पाठिंबा मिळेल. परंतु जपान आपल्या सोव्हिएत संघाला दिलेल्या शब्दाला जागले व त्यांच्याविरुद्ध युद्धात भाग नाही घेतला. उलट, जर्मनीच्या या कृतीमुळे अमेरिकेतील युरोपमधल्या युद्धात भाग घेण्याविरुद्धचा उरलासुरला विरोधदेखील मावळला व युद्ध आता खरोखरचे जागतिक युद्ध झाले.

जपानची आगेकूच

त्याचवेळी डिसेंबर ८ रोजी (म्हणजे अमेरिकेतील डिसेंबर ७लाच) जपानने हॉंग कॉंगवर हल्ला केला व त्यानंतर लगेचच मलाया, फिलिपाईन्स, बॉर्नियोबर्मावरही हल्ला केला. येथे त्यांना भारतीय, ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन, केनेडीयन, अमेरिकनन्यू झीलंडच्या सैन्याने कडवा प्रतिकार केला परंतु हे सगळे प्रदेश जपानने काही महिन्यातच काबीज केले. सिंगापूर बळकावताना जपानने हजारो ब्रिटिश व भारतीय सैनिकांना युद्धबंदी बनवले.

चीनने अखेर जपानविरुद्ध अधिकृतरीत्या युद्ध पुकारले. जपानने प्रशांत महासागरातील रॉयल नेव्हीच्या तांड्यावर हल्ला चढवून एच.एम.एस. प्रिन्स ऑफ वेल्स, एच.एम.एस. रिपल्स या युद्धनौका व त्यासोबत ८४० खलाश्यांना यमसदनी धाडले. याचा युनायटेड किंग्डमला मोठाच धक्का बसला.

पर्ल हार्बरवरील हल्ला

७ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी जपानाने अमेरिकेच्या पर्ल हार्बर, हवाई येथील नाविक तळावर आकस्मिक हल्ला चढवला. अमेरिकेच्या पॅसिफिक नौदलाने जपानाच्या आग्नेय आशियातील साम्राज्यविस्तारासाठी ब्रिटन, नेदरलँड्स् आणि अमेरिकेच्या ताब्यातील प्रांतांविरुद्ध आखण्यात आलेल्या लष्करी कारवायांत अडथळा आणू नये, म्हणून शाही जपानी नौदलाने ७ डिसेंबर, इ.स. १९४१ च्या सकाळी (जपानी प्रमाणवेळेनुसार ८ डिसेंबर, इ.स. १९४१) हा हल्ला केला.

३५३ जपानी लढाऊ विमाने, बॉंब आणि टॉर्पेडो विमाने यांचा वापर करून तळावर हल्ला केला. अमेरिकन नौदलाच्या आठही लढाऊ जहाजांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांपैकी चार जहाजे बुडाली. या आठपैकी सहा जहाजे पुन्हा मिळवून्, दुरुस्त करून त्यांचा वापर पुढे युद्धात करण्यात आला. जपानी नौदलाने तीन क्रूझर, तीन विनाशिका, एक विमानविरोधी प्रशिक्षण नौका आणि एक सुरूंगनौका यांचेही नुकसान केले. अमेरिकेची १८८ विमाने नष्ट झाली, २,४०२ अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले, १,२८२ अमेरिकन लोक जखमी झाले. वीजकेंद्र, गोदी, इंधन व टॉर्पेडो साठवण्याची गोदामे तसेच, पाणबुडीचे धक्के आणि मुख्यालय (जे हेरखात्याचे केंद्र होते) यांवर हल्ला केला गेला नाही. अमेरिकेच्या तुलनेत जपानाचे कमी नुकसान झाले: २९ विमाने आणि ५ लहान पाणबुड्या नष्ट झाल्या, ६५ सैनिक कामी आले वा जखमी झाले व केवळ् एक जपानी सैनिक पकडला गेला.

ह्या अनपेक्षित हल्ल्याने अमेरिकन जनतेला प्रचंड धक्का बसला व त्याने अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात उतरण्यास भाग पाडले. ८ डिसेंबर, इ.स. १९४१रोजी अमेरिकेने अधिकृतरीत्या जपानाविरुद्ध युद्ध पुकारले व ती ब्रिटनाच्या बाजूने युद्धात उतरली. यापुढील अमेरिकन कारवायांमुळे जर्मनीइटली यांनी ११ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. त्याला अमेरिकेने तसेच प्रत्युत्तर दिले.

या आकस्मिक जपानी हल्ल्यामागे बराच पूर्वेतिहास होता, परंतु, सामोपचाराने बोलणी चालू असताना, कुठलीली पूर्वसूचना न देता झालेल्या ह्या हल्ल्यामुळे तत्कालीन अमेरिकन साष्ट्रपती फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट यांनी ७ डिसेंबर, १९४१ या दिवसाबद्दल 'अ डेट विच विल लिव्ह इन इन्फेमी' (बदनाम, असंतोषजनक दिवस) असे उद्गार काढले आहेत.

आफ्रिकेतील रणांगण

उत्तर आफ्रिका व मध्यपूर्व

उत्तर आफ्रिकेत उतरलेल्या फील्ड मार्शल रोमेलच्या सैन्याने पूर्वेकडे आगेकूच चालू ठेवली व टोब्रुक या बंदराला वेढा घातला. टोब्रुक सोडवायचे दोस्त राष्ट्रांचे दोन प्रयत्न निष्फळ झाले शेवटी ऑपरेशन क्रुसेडर या मोहीमेंतर्गत मोठ्या सैन्यानिशी हल्ल्याला उत्तर दिल्यावर रोमेलने टोब्रुकचा वेढा उठवला वा इतरत्र प्रयाण केले. एप्रिल-मे १९४१मध्ये युनायटेड किंग्डमने इराकवर हल्ला करून इराक परत जिंकून घेतले. जूनमध्ये दोस्त सैन्याने सीरियालेबेनॉन जिंकले. तटस्थ राहिलेल्या इराणवर सोव्हिएत संघाने व ब्रिटनने हल्ला केला व तेथील तेलसाठा बळकावला. इराणमधील तेलवाहिन्यांतून सोव्हिएत संघाला खनिज तेलाचा मुबलक पुरवठा सुरू झाला.

तिढा - इ.स. १९४२

युरोपीय रणांगण

मध्य व पश्चिम युरोप

मे १९४२मध्ये चेकोस्लोव्हेकियातील भूमिगत सशस्त्र चळवळीच्या सद्स्यांनी 'शेवटच्या उपायाचा' योजक राइनहार्ड हेड्रिख याचा खून केला. याचा वचपा काढण्यासाठी हिटलरने चेकोस्लोव्हेकियामधील लिडाईस हे गाव बेचिराख केले. ऑगस्टमध्ये केनेडीयन सैनिकांनी ऑपरेशन ज्युबिली नावाखाली फ्रान्सच्या दियेपे गावाजवळ धाड घातली. ही मोहीम सपशेल फसली व अनेक सैनिक मृत्युमुखी पडले वा युद्धबंदी झाले पण यातून दोस्त सेनापतींनी धडे घेतले व ऑपरेशन टॉर्च व ऑपरेशन ओव्हरलॉर्डच्यावेळी ते गिरवले.

शिशिरामधील व वसंतातील सोव्हिएत हल्ले

उत्तर युरोपमध्ये लाल सैन्याने जानेवारी ९ ते फेब्रुवारी ६च्या दरम्यान टोरोपेट्स-खोल्म मोहीम उघडुन अँड्रियापोलदेम्यान्स्कजवळ जर्मन तुकड्यांना हरवले. याशिवाय खोल्म, वेलिझ व वेलिकी लुकीच्या आसपास जर्मन सैन्याला थोपवण्यात त्यांना यश मिळाले. दक्षिणेत मे महिन्यात सोव्हिएत सैन्याने जर्मनीच्या सहाव्या सैन्याविरुद्ध आघाडी उघडली. खार्कोव्हजवळ १७ दिवस चाललेल्या लढाईत २,००,०००पेक्षा जास्त लाल सैनिक मृत्यू पावले.

ग्रीष्मातील अक्ष हल्ले

जून २८ला अक्ष राष्ट्रांनी ऑपरेशन ब्लू ही मोहीम सुरू केली. जर्मन सैन्य आग्नेयेला डॉन नदी पासुन व्होल्गा नदीपर्यंत कॉकेसस पर्वतांच्या दिशेने कूच करू लागली. सैन्यसमूह बी स्टालिनग्राड शहर जिंकायच्या अपेक्षेने निघाला. स्टालिनग्राड जिंकून जर्मन सैन्याची डावी आघाडी सुरक्षित होताच सैन्यसमूह ए दक्षिणेतील तेलसाठे जिंकून घेणार होता. ग्रीष्म संपता झालेल्या कॉकेससच्या लढाईत जर्मनीने हे तेलसाठे जिंकून घेतले.

स्टालिनग्राड
मुख्य पान: स्टालिनग्राडचा वेढा

स्टालिनग्राडच्या भग्नावशेषातून लढणारे सोव्हिएत सैनिक

जर्मन सैन्यसमूह बी ऑगस्ट २३, १९४२ रोजी स्टालिनग्राडच्या उत्तरेला व्होल्गा नदीच्या किनारी येऊन पोचला. यासुमारास लुफ्तवाफेने केलेल्या बॉम्बफेकीत गावाच्या मध्यावर असलेल्या लाकडी इमारती व कारखाने उद्ध्वस्त झाले. महिन्याभरात उरलेसुरले उद्योग-धंदेही नष्ट झाले व शहराच्या पिछाडीस असलेले पूल व रस्तेसुद्धा जर्मन तोफखान्याच्या पल्ल्यात आले. आता स्टालिनग्राडला रसद/कुमक मिळणेही मुश्किल झाले. जर्मन सैन्याने आता शहरात धाडी घालणे सुरू केले. सोव्हिएत सैनिकांनी व स्टालिनग्राडच्या नागरिकांनी त्यांचा चौकाचौकातून व घराघरातून सामना केला. अत्यंत भयानक अश्या हातोहात लढाया रोजच व्हायला लागल्या. हळूहळू रशियन हिवाळा जर्मन सैन्यालाही गारठू लागला पण लढाईची तीव्रता तितकीच राहिली. दमछाक व उपासमारीने दोन्हीकडील सैन्याला पछाडले. स्टालिनग्राडची स्थिती तर अगदीच केविलवाणी होती पण तरीही तेथील नागरिक जिद्दीने मुकाबला करीत राहिले. आता ॲडॉल्फ हिटलरही ईरेला पेटला. काही केल्या स्टालिनग्राड जिंकायचेच असे हुकुम त्याने सोडले. जर्मन सेनापतींनी व्यूहात्मक माघार घेउन हिवाळ्यानंतर परत हल्ला करायचे सुचवले पण हिटलरने ते धुडकावून लावले. आता स्टालिनग्राडच्या लढाईत हिटलर बर्लिनमधून स्वतः व्यूह रचू लागला. जनरल फोन पॉलसने वैतागून नोव्हेंबरमध्ये शहरावर निर्वाणीचा हल्ला चढवला जर्मनीचे सहावे सैन्य स्टालिनग्राडमध्ये घुसले. त्यांनी शहराचा ९०% भाग काबीज केला. सोव्हिएत सैन्याने स्टालिनग्राडच्या बाहेर सैन्य गोळा करण्यास सुरुवात केलेली होती. जर्मन सैन्याचा मोठा भाग शहरात होता व तेथील हातोहात लढायां गुंतलेला होता. परिणामी त्यांच्या बाजू दुबळ्या पडल्या. ही संधी साधून सोव्हिएत सैन्याने ऑपरेशन युरेनस ही मोहीम सुरू केली व नोव्हेंबर १९ रोजी जर्मन सैन्याच्या दोन्ही बाजूने एल्गार केला. हा हल्ला परिणामकारक ठरला व जर्मन सैन्याचा प्रतिकार खचला. दोन्हीकडून आलेले सोव्हिएत सैन्य स्टालिनग्राडच्या नैर्ऋत्येला कलाच शहराजवळ एकत्र झाले. परिणामी स्टालिनग्राडमध्ये घुसलेले सहावे जर्मन सैन्य आता चारही बाजूंनी वेढले गेले.

स्टालिनग्राडची लढाई

अडकलेल्या जर्मन सैन्याने हिटलरकडे वेढा फोडून बाहेर पडण्याची (त्यायोगे स्टालिनग्राड परत सोव्हिएत सैन्याला देण्याची) परवानगी मागितली पण ती नाकारली गेली. हिटलरने सहाव्या सैन्याला स्टालिनग्राडमध्येच थांबायचा हुकुम सोडला व बाहेरून सैन्य पाठवून वेढा फोडण्याचे आश्वासन दिले. त्यादरम्यान लुफ्तवाफेद्वारा रसद पुरवण्याचीही ग्वाही दिली. पण लुफ्तवाफेकडून होणारी मदत ही गरजेच्या एक षष्ठांशही नव्हती व लवकरच जर्मन सैन्याची गत महिन्याभरापूर्वीच्या स्टालिनग्राडच्या नागरिकांसारखीच झाली. लाल सैन्याला हिटलरच्या व्यूहाचा अंदाज होताच. त्यांनी मॉस्कोजवळ ऑपरेशन मार्स सुरू केले व मध्य सैन्यसमूहाची लांडगेतोड करण्यास सुरुवात केली. परिणामी जर्मनीला तेथून स्टालिनग्राडच्या मदतीला कुमक पाठवणे अशक्य झाले. मॉस्कोकडून कुमक येत नसल्याचे पाहून दक्षिण सैन्यसमूहाच्या सेनापती फोन मॅनस्टीनने डिसेंबरमध्ये आपल्या सैन्यातून काही तुकड्या स्टालिनग्राडच्या मदतीला पाठवल्या पण स्टालिनग्राडपासून ५० कि.मी. अंतरावरील लढाईत त्यांचा पराभव झाला व त्यांनी माघार घेतली. स्टालिनग्राडमधील सहाव्या सैन्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.

हिटलरला अजूनही स्टालिनग्राडमध्ये पराभव मान्य नव्हता. जानेवारीत त्याने जनरल पॉलसला फील्डमार्शलपदी पदोन्नती दिली. जर्मनीच्या इतिहासात एकाही फील्डमार्शलने शत्रूसमोर शरणागती पत्करली नव्हती तसेच एकही फील्डमार्शल शत्रूच्या हाती जिवंत लागलेला नव्हता. फोन पॉलसच्या पदोन्नतीतून हिटलर जणू काही फोन पॉलस व सहाव्या सैन्याला संदेशच देत होता की त्यांनी शरणागती पत्करणे हिटलरला मंजूर नव्हते. अपेक्षित होते ते मरेपर्यंत लढणे व हरल्यास मरणे. परंतु फोन पॉलसला हे पटले नाही. आपल्या सैन्याची दयनीय अवस्था पाहून त्याने फेब्रुवारी २ रोजी सोव्हिएत सैन्यासमोर शरणागती पत्करली. असलेल्या सैनिकांपैकी २२ जनरलांसह फक्त ९१,००० सैनिकांना जिवंतपणी युद्धबंदी केले गेले. यांपैकीसुद्धा केवळ ५,००० युद्धाच्या अंतापर्यंत जिवंत राहिले.

अतिशय दारुण अशा या लढाईत दोन्ही पक्षांचे अपरिमित नुकसान झाले. दोन्हीकडचे मिळून २०,००,००० व्यक्ती मरण पावल्या. पैकी अक्ष राष्ट्रांचे ८,५०,००० सैनिक व उरलेले सोव्हिएत सैनिक व नागरिक होते. तोपर्यंतच्या जगाच्या इतिहासातील मृतांच्या आकड्याच्या दृष्टीने ही सगळ्या मोठी लढाई ठरली.

प्रशांत महासागरातील रणांगण

नैर्ऋत्य व मध्य प्रशांत महासागर

जपानविरुद्ध युद्धाची तयारी करीत असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेत राहणाऱ्या जपानी, इटालियन व जर्मन वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात धाडण्याचा हुकुम सोडला. युद्ध संपेपर्यंत हे लोक हलाखीच्या अवस्थेत तुरुंगसदृश जागेत राहिले. त्यादरम्यान त्यांची संपत्ती सरकार व इतर नागरिकांनी बळकावली.

एप्रिल १९४२मध्ये अमेरिकेने जपानवर पहिला हल्ला केला. टोक्योवरील बॉम्बफेकीने नुकसान जास्त झाले नसले तरी अमेरिकन जनतेच्या अंगावर मूठभर मांस चढले व जपानने आपले काही सैन्य व आरमार स्वतःच्या किनाऱ्याजवळ परत बोलावले. मेमध्ये जपानी आरमाराने न्यू गिनीतील पोर्ट मोरेस्बी शहरावर हल्ला केला. दोस्त राष्ट्रांच्या आरमाराने कॉरल समुद्राच्या लढाईत जपानला रोखले परंतु अमेरिकेची यु.एस.एस. लेक्झिंग्टन ही विमानवाहू नौका त्यात बळी पडली. कॉरल समुद्राची ही लढाई विमानवाहू नौकांची आमनेसामने झालेली पहिलीच लढाई होती. पुढच्या महिन्यात दोन्ही आरमारात पुन्हा टक्कर झाली ती मिडवेच्या लढाईत. तोपर्यंत अमेरिकेच्या तंत्रज्ञांनी जपानी कूटसंदेशलेखनपद्धती उकलली होती व त्यामुळे त्यांना जपानी बेतांची पूरेपूर माहिती होती. अमेरिकेच्या बॉम्बफेकी विमानांनी जपानच्या चार विमानवाहू नौका बुडवल्या व जपानी आरमाराचा कणा मोडला. इतिहासकारांच्या मते ही लढाई युद्धातील निर्णायक क्षणांपैकी होती. येथून जपानच्या अनिर्बंध सत्ताप्रसाराला खीळ बसली.

ग्वादालकॅनालमध्ये अमेरिकन सैनिक

मेमध्ये न्यू गिनीवर समुद्रीमार्गाने केलेले आक्रमण फसल्यावर जपानने जुलैमध्ये जमिनीवरून हल्ला केला. पोर्ट मोरेस्बीच्या पश्चिमेस जंगलात जमा होऊन कोकोडा पायवाटेवरून जपानी सैन्याने हल्ला केला. त्यावेळी पोर्ट मोरेस्बीचा बचाव करण्याची जबाबदारी ऑस्ट्रेलियन सैन्यावर होती. ५,००० सैनिकांनी मिळेल त्या हत्यारांनिशी आपल्यापेक्षा बऱ्याच मोठ्या सैन्याचा यशस्वी प्रतिकार केला व जपानी सैन्याला मागे रेटले. यानंतर दोन्ही सैन्यांनी कुमक मागवली व सप्टेंबरमधील मिल्ने बेच्या लढाईनंतरही जानेवारी १९४३पर्यंत चकमकी होत राहिल्या पण दोस्त सैन्याने पोर्ट मोरेस्बी शत्रूच्या हाती पडू दिले नाही. जपानी सेनेचा जमिनीवरील युद्धात हा प्रथम पराभव होता.

ऑगस्ट ७ला अमेरिकेचे मरीन सैनिक ग्वादालकॅनालच्या लढाईत उतरले. ग्वादालकॅनाल बेटावर वर्चस्व मिळवण्यासाठी झालेली ही लढाई सहा महिने चालली. यादरम्यान आसपासच्या समुद्रात अनेक आरमारी लढाया झाल्या त्यातील काही म्हणजे साव्हो बेटाची लढाई, केप एस्पेरान्सची लढाई, ग्वादालकॅनालची आरमारी लढाई, तासाफरोंगाची लढाई, इ.

चीन-जपान युद्ध

पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर जपानने चीनवर नव्याने हल्ला केला. यावेळी त्यांचा रोख चांग्शा शहर जिंकण्यावर होता. जपानने १,२०,००० सैनिकांसह केलेल्या हल्ल्याला चीनने ३,००,००० सैनिकांनी प्रत्युत्तर दिले. दोन बाजूंनी चीनी सैन्याच्या कचाट्यात सापडलेल्या जपानने तेथून काढता पाय घेतला.

आफ्रिकेतील रणांगण

ईशान्य आफ्रिका

जर्मनीच्या पॅंझर कोरचे रणगाडे आफ्रिकेत

१९४२च्या सुरुवातीला दोस्त राष्ट्रांना आफ्रिकेतील काही सैन्य पूर्वेच्या आघाडीवर पाठवावे लागले. याच वेळी जनरल रोमेलने लिब्यातील बेंगाझी शहर काबीज केले. त्यानंतर त्याने गझालाच्या लढाईत दोस्त सैन्याला हरवले व टोब्रुक जिंकून घेत दोस्त सैन्याची वाताहत केली. टोब्रुकला हजारो युद्धबंदी व मोठी रसद मिळवून रोमेलने इजिप्तवर चढाई केली.

इजिप्तमध्ये अल अलामेनची पहिली लढाई जुलै १९४२मध्ये झाली. रोमेलने दोस्त सैन्याला मागे रेटत अलेक्झांड्रिया, इजिप्तसुएझपर्यंत ढकलले पण आता जर्मन सैन्याकडील इंधन व अन्नसाठाही संपत आलेला होता व कोपऱ्यात सापडलेल्या दोस्त सैन्याचा प्रतिकारही तिखट झाला होता. अल अलामेनच्याच जवळ दुसरी लढाई झाली ती ऑक्टोबर २३नोव्हेंबर ३च्या दरम्यान. लेफ्टनंट जनरल बर्नार्ड मॉॅंटगोमरीच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश आठव्या सैन्याने रोमेलला माघार घेण्यास भाग पाडले. रोमेलने आफ्रिका कोरसह ट्युनिसियात माघार घेतली

वायव्य आफ्रिका

दोस्त राष्ट्रांनी नोव्हेंबर ८, १९४२ रोजी ऑपरेशन टॉर्च नावाची मोहीम सुरू केली. कॅसाब्लांका, ओरान व अल्जीयर्समधून सैनिक घुसवून उत्तर आफ्रिका जिंकण्याच्या बेताने उतरलेल्या या सैन्याला काही दिवसांनी बोने येथे उतरलेल्या सैनिकांची साथ मिळाली. हा सगळा जथा ट्युनिसियातील रोमेलच्या सैन्यावर चाल करून गेला. रस्त्यात विची फ्रान्सच्या सैन्याने नाममात्र प्रतिकार केला पण शत्रूची संख्या व कुवत पाहून लगेचच हत्यारे खाली ठेवली. यामुळे चिडलेल्या ॲडॉल्फ हिटलरने वीचि फ्रान्सवर हल्ला करून तेथील नाममात्र सरकारसुद्धा पदच्युत केले व लष्करी कायदा लावला. आता ट्यूनीशियातील जर्मन व इटालियन सैन्य अल्जीरियालीबियाकडून चाल करून येणाऱ्या दोस्त सैन्याच्या कचाट्यात सापडले. रोमेलने ही कोंडी फोडण्यासाठी कॅसरीन पासच्या लढाईत अमेरिकन सैन्याला धूळ चारली व अक्ष सैन्याचा एक भाग सोडवला. पण उरलेल्या अक्ष सैन्याने लवकरच पराभव पत्करला.

बदलते वारे - इ.स. १९४३

युरोपीय रणांगण

सोव्हिएत कारवाया

चित्र:सोव्हिएत सैनिक ड्नाइपर.jpg
सोव्हिएत सैनिक ड्नाइपर नदी ओलांडताना

स्टालिनग्राडच्या विजयानंतर लाल सैन्याने जर्मन सैन्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. मुख्यत्वे डॉन नदीच्या आसपासच्या या कारवायात सोव्हिएत सैन्याला सुरुवातीस यश मिळाले पण लवकरच जर्मनीने नव्या दमाने त्यांचा प्रतिकार केला व एकामागोमाग लढाया जिंकल्या. खार्कोव्ह शहर परत जर्मनीच्या हातात गेले.

सोव्हिएत सैन्याने वर्षअखेर खार्कोव्ह परत मिळवले. सोवयेत सैन्याची चढती कमान पाहून ॲडॉल्फ हिटलरने आपल्या सैन्याला ड्नाइपर नदीपर्यंत माघार घेण्याची परवानगी दिली. सप्टेंबरपर्यंत ड्नाइपरच्या तीरावर बचावफळी तयार करण्यात आली पण लवकरच सोव्हिएत सैन्याने तेथून जवळच ड्नाइपर ओलांडली व एकामागोमाग शहरे काबीज करण्यास सुरुवात केली. झापोरोझ्येड्नेप्रोपेट्रोव्ह्स्क नंतर लाल सैन्याने युक्रेनची राजधानी क्यीव्हकडे मोर्चा वळवला. नोव्हेंबरमध्ये क्यीव्हच्या दोन्ही बाजूंनी हल्ला करीत सोव्हिएत सैन्य शहरात दाखल झाले. डिसेंबर २४ला कोरोस्टेन जिंकून घेउन तेथून रेल्वेमार्गाच्या बाजूने चाल करीत सोव्हिएत व युक्रेनियन सैन्याने १९३९ च्या सोव्हिएत-पोलंड सीमेपर्यंत धडक मारली.

जर्मन कारवाया

१९४३चा वसंत जर्मन आणि सोव्हिएत सैन्यांनी पुनर्बांधणीत घालवला. तयारी पूर्ण न झाल्यामुळे जर्मनीने आघाडी उघडणे लांबवले. अखेर जुलै ४च्या सुमारास वेह्रमाख्टने दुसऱ्या महायुद्धातील आपले सगळ्यात मोठे दल जमा केले आणि कुर्स्क शहरावर चाल केली. याची कल्पना असलेल्या लाल सैन्याने येथे मातीचे कामचलाउ किल्ले उभारून त्याआडून प्रतिकार केला. जर्मनीने रशियन व्यूहरचनेतील पान उचलून कुर्स्कच्या उत्तर व दक्षिणेकडून एकदम चाल केली होती. त्यांचा बेत सोव्हिएत सैन्याच्या पिछाडीचा प्रदेश काबीज करून स्टालिनग्राडप्रमाणे रशियाच्या ६० डिव्हिजन पकडण्याचा होता. उत्तरेकडून आलेल्या जर्मन सैन्याला फारशी प्रगती करता नाही आली पण दक्षिणेतून त्यांनी बरीच मजल मारली. वेढले जाण्याची शक्यता ओळखून सोव्हिएत सैन्याने आपली राखीव दलेसुद्धा आता युद्धात उतरवली. यावेळी झालेली कुर्स्कची लढाई ही रणगाड्यांची युद्धातील सगळ्यात मोठी लढाई ठरली. प्रोखोरोव्ह्का शहराजवळ झालेल्या या लढाईत दोन्ही बाजूंनी होतीनव्हती ती सगळी शक्ती पणाला लावली. जर्मनीचे सैन्य गेली चार वर्षे अव्याहत लढत होते व त्यांच्याकडे राखीव असे सैन्य नव्हतेच. उलटपक्षी रशियाने आपले ताज्या दमाचे राखीव सैन्य रणात उतरवले होते. याची परिणती लवकरच दिसून आली. जर्मन हल्लेखोरांचा धुव्वा उडवत सोव्हिएत सैन्याने त्यांना युद्धाच्या सुरुवातीपेक्षा मागे रेटले.

दोस्तांचे इटलीवर आक्रमण

ऑगस्ट १९४३मध्ये रोमेलने कॅथेरीन पासच्या लढाईत दोस्त सैन्याला गुंगारा दिला होता पण ट्युनिसियातील उरलेले अक्ष सैन्य फारसा प्रतिकार करू शकले नाही व २,५०,००० सैनिकांनी तेथे आत्मसमर्पण केले. यात इटलीच्या सैन्यदलातील बहुसंख्य सैनिक होते. दरम्यान जुलैमध्ये दोस्त राष्ट्रांनी ऑपरेशन हस्की मोहीमेंतर्गत सिसिलीवर चढाई केली व महिन्याभरात बेट जिंकून घेतले. शत्रु दाराशी येऊन ठेपलेला बघताच इटलीतील बेनितो मुसोलिनीचे सरकार गडगडले. राजा व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसऱ्याने मुसोलिनीला पदच्युत केले व ग्रेट फाशिस्ट काउन्सिलच्या संमतीने त्याला अटकही करवली. पीयेत्रो बॅदोग्लियोच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने युद्ध चालू ठेवण्याचे जाहीर केले पण एकीकडे दोस्त राष्ट्रांशी गुप्त वाटाघाटी सुरू केल्या. यात ठरल्याप्रमाणे दोस्तांनी सप्टेंबर ३ रोजी इटलीवर चढाई केली. चार-पाच दिवस नाममात्र प्रतिकार करून इटलीने शरणागती पत्करली. राजा व त्याचे कुटुंब बॅदोग्लियोच्या सरकारसह रोमहून दक्षिणेला पळून गेले. नेतृत्वहीन इटालियन सैन्याने तुरळक लढाया केल्या पण थोड्याच दिवसांत त्यांनीही शस्त्रे खाली ठेवली. हे पाहताच उत्तरेतून जर्मन सैन्य पुढे सरसावले व त्यांनी दोस्त सैन्याला रोमच्या दक्षिणेला गुस्ताव रेषेवर चार-पाच महिने रोखून धरले. जर्मनीने उत्तरेत सालोचे इटालियन समाजवादी प्रजासत्ताक या नावाखाली जर्मनधार्जिणे सरकार मुसोलिनीच्या हाती देऊन बसवले. याचवेळी जर्मनीने युगोस्लाव्हियात आपले सैनिक पाठवून तेथील भूमिगत चळवळ चिरडण्याचा प्रयत्न केला.

अटलांटिकची लढाई

जर्मनीने आपल्या यु-बोटींनी दोस्त राष्ट्रांच्या आरमाराला गेली चार वर्षे सळो की पळो केलेले होते. आता दोस्तांनी त्यांचे आरमारी व्यूह बदलले व यु-बोटींचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. १९४३मध्ये यु-बोटींना नौकांचे दोन तांडे बुडवण्यात यश आले पण शत्रूने अनेक यु-बोटीही बुडवल्या. जर्मनीत नवीन यु-बोटी तयार होणे जवळजवळ थंडावलेच होते. आपली संख्या कमी होत असलेली पाहून यु-बोटींनी खुल्या समुद्रात हल्ले करण्याचे सोडले व किनाराऱ्याच्या जवळ राहून शिकार शोधणे पसंत केले.

यु-बोटींचा धोका कमी होताच दोस्त आरमारांनी आर्क्टिक समुद्रातून रशियाकडे रसद धाडण्यास पुनः सुरुवात केली. यामुळे सोव्हिएत संघाचे पारडे जड होणार असे दिसताच जर्मन आरमाराने आपला मोर्चा तिकडे वळवला. नॉर्थ केपच्या लढाईत रॉयल नेव्हीच्या एच.एम.एस. ड्युक ऑफ यॉर्क, एच.एम.एस. बेलफास्ट व इतर काही विनाशिकांनी मिळून जर्मनीची शेवटची बॅटल क्रुझर शार्नहॉर्स्टला जलसमाधि दिली.

आशिया व प्रशांत महासागरातील रणांगण

मध्य व नैर्ऋत्य प्रशांत महासागर

दोस्त सैन्याने जानेवारी २ला न्यू गिनीतील बुना शहर जिंकले व पोर्ट मोरेस्बीवरील जपानी टांगती तलवार दूर केली. जानेवारी २२ पर्यंत पुढे चाल करीत त्यांनी जपानी सैन्याचे पूर्व आणि पश्चिम न्यू गिनीमध्ये ये-जा करण्याचे मार्गही बंद केले. त्यामुळे दोन्हीकडच्या जपानी सैन्यांना हरवणे सोपे झाले.

अमेरिकन सैन्याने फेब्रुवारी ९ला ग्वादालकॅनाल मुक्त केले व सोलोमन द्वीपांवर चढाई केली व वर्षअखेर तेही जिंकून घेतले.

चीन-जपान युद्ध

चांग्डेची लढाई

चीनच्या हुनान प्रांतातील चांग्डे शहरावर जपानने नोव्हेंबर २, १९४३ रोजी १,००,००० सैनिकांसह हल्ला केला. पुढील काही दिवसांत हे शहर जपान व चीनच्या हाती पडले पण अंती चीनने जपानी आक्रमकांना हुसकावून लावले व बाहेरून मदत मिळेपर्यंत शहर लढवले. स्टालिनग्राडप्रमाणे चाललेल्या या युद्धात दोन्हीकडचे मिळून १,००,०००हून अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या

आग्नेय आशिया

चीनमध्ये सम्राट च्यांग कै-शेकच्या नेतृत्वाखालील कॉमिन्टांग सैन्य आणि साम्यवादी माओ झेडॉॅंगच्या नेतृत्वाखालील चीनी सैन्य जपानी आक्रमणाचा सामना करीत असले तरी दोघांत एकवाक्यता नव्हती व एकमेकांत कुरबुरी सुरूच होत्या. इकडे ब्रिटनने दोन्ही सैन्यांना बर्मा रोड नावाने ओळखल्या जाणाऱ्या घनदाट जंगल व कठीण पर्वत पार करीत आसाम पासुन ब्रह्मदेश(आताचे म्यानमार)मार्गे रसद पुरवठा सुरू ठेवला होता. जपानने म्यानमार हस्तगत केल्यावर हा मार्ग बंद पडला. यावर उपाय म्हणून रॉयल एअरफोर्सने ईशान्य भारतातील विमानतळांवरून ही मदत सुरू ठेवली होती. जपानी सैन्य ब्रह्मदेशातून हटत नाही ही पाहिल्यावर ब्रिटनने चीनी सैन्याला अरुणाचल प्रदेशमार्गे भारतात आणले व अमेरिकन जनरल जोसेफ स्टिलवेलने त्यांना नवी तालीम व शस्त्रास्त्रे दिली. या चीनी सैन्याच्या पाठबळावर आता ब्रिटनने भारतातून चीनला जाण्यासाठी लेडो मार्ग बांधण्याचे काम सुरू केले.

शिकाऱ्याचीच शिकार? - इ.स. १९४४

युरोपीय रणांगण

शिशिर-वसंतातील सोव्हिएत कारवाया

लाल सैन्याने जानेवारीत लेनिनग्राडचा वेढा उठवल्यावर जर्मनीने पद्धतशीरपणे माघार घेत तेथून दक्षिणेला बचावफळी उभारली. त्या भागातील तळ्यांचा आधार घेत जर्मनीला ही आघाडी उभारण्यात यश आले पण त्या सुमारास जनरल हान्स-व्हॅलेन्टिन ह्युबचे पहिले पॅन्झर सैन्य दोन बाजूंनी चालून आलेल्या सोव्हिएत सैन्याच्या कचाट्यात सापडले. सात आठवड्यांनी त्यांनी आपली सुटका करून घेतली पण बरेचसे जर्मन रणगाडे व तोफा शत्रूच्या हाती पडल्या.

वसंत ऋतुत जर्मनीने युक्रेनमधूनही माघार घेतली पण त्यांच्या दक्षिण सैन्यसमूहातील सतरावे सैन्य बचावासाठी तेथे थांबले. वसंतअखेर लाल सैन्याच्या तिसऱ्या युक्रेनियन आघाडीने त्यावर हल्ला करून जर्मन सैन्याचा धुव्वा उडवला. रशियन सैन्याने या लढाईत काळ्या समुद्रापार माघार घेणाऱ्या जर्मन सैन्याचा रस्ताही तोडला व २,५०,००० जर्मन व रोमेनियन सैनिकांना यमसदनी धाडले.

याच सुमारास सोव्हिएत सैन्याने रोमेनियातील इयासी शहरावर चढाई केली. महिनाभर शहर लढवल्यावर जर्मन-रोमेनियन सैन्याने टारगुल फ्रुमोसच्या लढाईनंतर हार पत्करली व शहर सोव्हिएत सैन्याच्या हातात आले. यामुळे आता सोव्हिएत संघाला रोमेनियावर पुढील चाल करणे सोपे झाले. शत्रूची ही चाल पाहून ॲडॉल्फ हिटलरने अंदाज बांधला की हंगेरी पक्ष बदलून सोव्हिएत संघाला सामील होइल. हे टाळण्यासाठी जर्मनीने हंगेरीवर चढाई केली व आपले सैन्य देशभर पसरवले.

उत्तरेत फेब्रुवारीत फिनलंडने स्टालिनशी तहाची बोलणी सुरू केली पण स्टालिनने पुढे केलेली तहाची कलमे त्यांना मंजूर नव्हती. जून ९ रोजी सोव्हिएत संघाने कारेलियन द्वीपकल्पावरून चौथे आक्रमण केले व तीन महिन्यात फिनलंडला नमवून तह करणे भाग पाडले.

इटली व मध्य युरोप

इटलीने शरणागती पत्करल्यावर जर्मन सैन्याने इटालियन द्वीपकल्पाचा बचाव करण्याचे ठरवले व रोमच्या दक्षिणेस एपेनाइन पर्वतातून गुस्ताव रेषेवर बचावाची फळी उभारली. अनेक प्रयत्नांनंतरसुद्धा दोस्तांना ही फळी फोडता आली नाही. पर्यायाने त्यांनी त्यास वळसा घालण्याचा प्रयत्न केला. ऑपरेशन शिंगल नावाखाली केलेल्या या मोहिमेने आंझियो येथे जानेवारी २२, १९४४ रोजी समुद्रातून हल्ला केला खरा पण किनाऱ्यावर उतरलेल्या सैन्याला लगेचच जर्मन सैन्याने वेढले व हाही प्रयत्न फसला.

गुस्ताव रेषा पार करण्यासाठी बेचैन झालेल्या दोस्त सैन्याने परत समोरासमोरचे हल्ले सुरू केले. ५२४मध्ये उभारलेली मॉॅंते कॅसिनो येथील ख्रिश्चन साधूंची वस्ती अमेरिकन वायु सेनेने फेब्रुवारी १५ रोजी उद्ध्वस्त केली. त्यांचा असा समज झाला होता की या वस्तीत राहून जर्मन सैन्य त्यांच्या तोफखान्याला गुप्त बातम्या पुरवत होते. बेचिराख झालेल्या या वस्तीत जर्म सैनिक फेब्रुवारी १७ला आले व त्यांनी आता तेथे ठाण मांडले. मे १८ पर्यंत चार वेळा दोस्त सैन्याने येथे हल्ले केले. यात २०,००० जर्मन तर ५४,००० दोस्त सैनिक मृत्युमुखी पडले.

अखेर गुस्ताव रेषेवरची बचावाची जर्मन फळी फुटली व दोस्त सैन्याने उत्तरेकडे आगेकूच सुरू केली. जून ४ला हे सैनिक रोममध्ये पोचले तर ऑगस्टमध्ये फ्लोरेंसला. हेमंत ऋतूच्या सुमारास जर्मन सैन्याने टस्कनीतील एपेनाइन पर्वतातील गॉथिक रेषेवर पुन्हा जमवाजमव करून त्यांना रोखले

युरोपमधील युद्धाचा एकंदर रागरंग बघून जर्मनीने मध्य युरोपमधून माघार घेतली व हंगेरीत आपल्या सैन्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू केला. रोमेनियाने ऑगस्ट १९४४मध्ये दल बदलून जर्मनीवर युद्ध पुकारले. यामुळे युक्रेनमधून माघार घेणाऱ्या जर्मन सैन्याला धोका निर्माण झाला. बल्गेरियाने सप्टेंबरमध्ये शरणागती पत्करली.

बॉम्बहल्ले

जून इ.स. १९४४मध्ये जर्मनीने सर्वप्रथम क्रुझ क्षेपणास्त्रांचा उपयोग युद्धात केला. व्ही-१ उडत्या बॉम्बने युनायटेड किंग्डमवर प्रत्यक्ष हल्ले होऊ लागले. काही महिन्यांनी जर्मनीने ही कला अधिक विकसित केली व व्ही-२ हे द्रव-इंधन वापरणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वापरण्यास सुरुवात केली.

या हल्ल्यांना उत्तर व लुफ्तवाफेच्या कारवाया रोखण्यासाठी म्हणून अमेरिका, यु.के. व कॅनडाच्या वायुदलांनी व्यूहात्मक बॉम्बफेकींनी सुरुवात केली. सुरुवातीला सरहद्दीवरच्या गावांवरील या धाडी हळूहळू जर्मनीच्या मुख्य शहरांपर्यंत पोचल्या. एअर चीफ मार्शल हॅरिसने आखणी केलेल्या या हल्ल्यांनी जर्मन प्रजा संत्रस्त होऊ लागली. हे ओळखून विन्स्टन चर्चिलने मग दहशतवादी धाडी मारण्याचे आदेश दिले. यात विमानांच्या अनेक स्क्वॉड्रन (५०० ते १,००० विमाने) एकाचवेळी अनेक दिशांनी एकाच शहरावर चाल करून जायच्या व संपूर्ण शहरच्या शहर बेचिराख करण्याची योजना होती. हे पार पाडणारी विमाने अग्निजन्य बॉम्ब वापरून आपली निशाणे संपूर्णतः उद्ध्वस्त करीत. अशा अनेक हल्ल्यांमध्ये विमानतळ, कारखाने, पाणबुड्यांची आश्रयस्थाने, रेल्वे-यार्ड, तेलसाठे तसेच व्ही-१ व व्ही-२ क्षेपणास्त्रांचे तळ नष्ट करण्याचा उद्देश होता. सहसा या हल्ल्यांमध्ये आसपासच्या नागरिक वस्त्याही बळी पडत. या टोळधाडींचा मुकाबला करण्यास आता लुफ्तवाफे कमी पडू लागली व उरलासुरला विरोधही मोडून काढणे दोस्त वायुसेनांना सोपे झाले. इ.स. १९४४ च्या अंतापर्यंत पश्चिम आघाडीवर लुफ्तवाफेकडे फक्त तुरळक प्रमाणात विमानांच्या तुकड्या उरल्या होत्या. परिणामतः इ.स. १९४५ च्या मध्यापर्यंत जर्मनीतील जवळजवळ सगळी मुख्य शहरे बेचिराख झालेली होती.

वॉर्सोत उठाव

लाल सैन्य वॉर्सोच्या जवळ आल्याची बातमी ऐकून तेथील जनतेला वाटले की आता वॉर्सोची मुक्ती जवळच आहे. त्यामुळे ऑगस्ट १ रोजी त्यांनी जर्मन सैन्याविरुद्ध उठाव केला. ऑपरेशन टेम्पेस्ट मोहिमेतून त्यांना मदत मिळेत अशी त्यांना आशा होती. अंदाजे ४०,००० क्रांतिकाऱ्यांनी वॉर्सो काबीज केले. परंतु लाल सैन्याने आपली कूच अलीकडेच थांबवली व शहराबाहेरुनच तोफांचा मारा करून मदत करण्याचे चालू ठेवले. इकडे जर्मन सैन्याने कुमक पाठवून उठाव दाबण्याचे सुरू केले. शेवटी ऑक्टोबर २ रोजी हा उठाव संपला. जर्मन सैन्याने संपूर्ण शहर बेचिराख केले.

ग्रीष्म-हेमंतातील सोव्हिएत कारवाया

बुखारेस्ट मध्ये लाल सैन्याचे स्वागत करीत असलेले नागरिक (ऑगस्ट ३१, इ.स. १९४४.

आर्मी ग्रुप सेंटरचा नायनाट केल्यावर लाल सैन्याने जुलै १९४४ च्या मध्यास दक्षिणेला असलेल्या जर्मन सैन्यावर हल्ला चढवला व महिन्याभरात युक्रेनमधून जर्मनीची हकालपट्टी केली. यासाठी सोव्हिएत दुसऱ्या व तिसऱ्या युक्रेनी फळीने जर्मनीच्या हीरेस्ग्रुप स्युडयुक्रेन या बचावफळीचा विनाश केला व थेट रोमेनियापर्यंत धडक मारली. या प्रभावी हालचालीने रोमेनियाने पक्ष बदलला व जर्मनीची साथ सोडून ते आता दोस्त राष्ट्रांना सामील झाले.

ऑक्टोबर १९४४मध्ये जनरल मॅक्सिमिलियन फ्रेटर-पिकोच्या सहाव्या जर्मन सैन्याने डेब्रेसेन जवळ सोव्हिएत मार्शल रोडियोन याकोव्लेविच मॅलिनोव्स्कीच्या ग्रुप प्लियेवच्या तीन कोरना वेढा घालून त्यांचा धुव्वा उडवला. पूर्व आघाडीवरचा जर्मन सैन्याचा हा अखेरचा विजय होता.

डिसेंबर १९४४ पासुन लाल सैन्याच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या बाल्टिक आघाडींनी जर्मन आर्मी ग्रुप सेंटरचा उरला सुरला भाग व आर्मी ग्रुप नॉर्थशी झटापटी करून बाल्टिक प्रदेश काबीज केला. यात जर्मनीच्या दोन्ही सैन्यसमूहांची ताटातूट झाली व लात्व्हियात कूरलॅंड पॉकेटची रचना झाली. डिसेंबर २९, १९४४ ते फेब्रुवारी १३ १९४५पर्यंत सोव्हिएत सैन्याने बुडापेस्टला वेढा घातला. बुडापेस्टचा बचाव करण्यासाठी हंगेरीच्या सैन्याबरोबरच वाफेन-एस.एस.ची कुमक होती. या वेढ्यात दोन्ही बाजूंची अपरिमित हानी झाली.

दोस्तांचे पश्चिम युरोपवर आक्रमण

मुख्य पाने: नॉर्मंडीची लढाई, फलैस पॉकेट, ऑपरेशन ड्रगून, व पॅरिसची मुक्ती
ओमाहा बीचवर उतरणारे अमेरिकन सैनिक, डी-डे (जून ६, इ.स. १९४४).

जून ६, इ.स. १९४४ रोजी पाश्च्यात्य दोस्त राष्ट्रांनी (अमेरिका, युनायटेड किंग्डम व कॅनडा) जर्मन आधिपत्याखालील फ्रान्सच्या नॉर्मंडी किनाऱ्यावर हल्ला केला. त्याला जर्मनीने खंबीर उत्तर दिले. ओमाहा बीच व केन शहरांच्या आसपास तुंबळ युद्ध झाले पण दोस्तांना पाय रोवण्यात यश मिळाले. महिनाभर नॉर्मंडीच्या आसपास जम बसवल्यावर जुलैच्या अखेरीस अमेरिकन सैन्याने ऑपरेशन कोब्रा मोहीमेंतर्गत आपले वर्चस्व पसरविण्यास सुरुवात केली. ॲडॉल्फ हिटलरला या चालीची खबर मिळताच त्याने नॉर्मंडीच्या आसपासच्या जर्मन सेनेला प्रतिहल्ला चढवण्यास फर्मावले पण हा प्रतिहल्ला सपशेल फसला. याचे मुख्य कारण म्हणजे चाल करून येणारे जर्मन सैन्य आता दोस्त वायुसेनेचे सोपे शिकार झाले. यापूर्वी आपल्या लपवलेल्या ठाण्यांत दबा धरून बसलेल्या जर्मन सैन्याला टिपणे अशक्य असले होते, पण आता उघड्या रानातून चाल करून येणाऱ्या जर्मन सैन्याची दोस्त वायुसेनांनी वाताहत उडवली. बाजूने चाल करून येण्याऱ्या जर्मन सैन्याला थोपवण्यासाठी अमेरिकन सैन्याने आपल्या बाजूच्या फळ्या भक्कम ठेवल्या होत्या. पुढे सरकत अमेरिकन फौजेने जर्मनीच्या सातव्या सैन्याला व पाचव्या पॅंझर सैन्याला फलैसजवळ वेढा घातला. यात ५०,००० जर्मन सैनिक हाती लागले पण सुमारे १,००,००० सुटले. तोपर्यंत जर्मन सैन्याने रोखून धरलेली ब्रिटिश व केनेडियन सैन्येही आता बचावफळी फोडून पुढे होण्याच्या बेतात होती. या रेट्याला फ्रान्समध्येच रोखून धरण्यासाठी जर्मनीला कुमकेची आवश्यकता होती पण ही कुमक त्यांनी आधीच प्रतिहल्ला करण्यात खर्ची घातली होती. आता दोस्त राष्ट्रे फ्रान्स ओलांडून पुढे येणार हे जवळजवळ निश्चित झाले. ऑगस्ट १९४४मध्ये इटलीतील दोस्त सैन्याने दक्षिणेकडून फ्रेंच रिव्हियेरावर हल्ला चढवला आणि उत्तरेत असलेल्या फौजेशी संधान बांधले. फ्रेंच क्रांतिकाऱ्यांनी ऑगस्ट १९ला पॅरिसमध्ये उठाव केला. फिलिप लक्लर्क दि हॉक्लॉकच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्याच्या एक डिव्हिजनने पॅरिसमधल्या जर्मन सेनेची शरणागती स्वीकारली व ऑगस्ट २५ला पॅरिस मुक्त केले.

पॅरिसच्या शॅंझे लिझी रस्त्यावरून मिरवणारे अमेरिकन सैनिक.

शिशिरातील दोस्तांची मोहीम

मुख्य पाने: ऑपरेशन मार्केट गार्डन, आचेनची लढाई, व हर्टगेनच्या जंगलातील लढाई
ऑपरेशन मार्केट गार्डन मोहीमेंतर्गत नेदरलँड्समध्ये उतरणारे ब्रिटिश छत्रीधारी सैनिक

नॉर्मंडीतून पुढे सरकणाऱ्या दोस्त सैन्यांची रसद अजूनही नॉर्मंडीतूनच येत होती. दूर अंतर पार करून येणारी ही रसद वेळेवर व नेमकी पोचेल अशी खात्री फार कमी वेळा असायची. असे असतानाही जर्मन सैन्याच्या वर्मी घाव घालण्यासाठी दोस्तांनी छत्रीधारी सैनिक व चिलखती दल ऱ्हाइन नदीपल्याड नेदरलँड्समध्ये घुसवून पाहण्याचा प्रयत्न केला. पण सप्टेंबरअखेर त्यांना तेथून माघार घ्यावी लागली. शेल्टच्या लढाईत केनेडियन सैन्याच्या निर्णायक विजयानंतर ॲंटवर्पचे बंदर खुले करण्यात त्यांना यश मिळाले व नोव्हेंबर १९४४पासून येथून रसदपुरवठा सुरू झाला. दरम्यान सप्टेंबरमध्ये अमेरिकन सैन्याने हर्टगेनच्या जंगलातून चाल केली. जंगल व दऱ्याखोऱ्यांच्या आश्रयाने लढणाऱ्या जर्मन सैन्याने आपल्यापेक्षा अनेकपटीने मोठ्या असलेल्या या फौजेला पाच महिने झुंजवत ठेवले. इकडे ऑक्टोबरमध्ये अमेरिकेने आखन हे जर्मनीचे मोठे शहर प्रथमतःच काबीज केले.

जर्मनीचे प्रत्युत्तर

मुख्य पान: बॅटल ऑफ द बल्ज

पूर्वेकडे आपल्या सेनेची धूळधाण उडत असलेली पाहून हिटलरने डिसेंबर १९४४मध्ये आपली पश्चिमेकडील शेवटची मोठी मोहीम उघडली. बॅटल ऑफ द बल्ज नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लढाईतून त्याला १९४० च्या आर्देनेस मोहीमेप्रमाणे यश अपेक्षित होते. चिलखती दल व रणगाड्यांनी दोस्त राष्ट्रांना पश्चिमेस समुद्रापर्यंत रेटत नेल्यास त्यांच्याशी संधी करून पूर्वेस आपली सगळी शक्ती पणाला लावता येईल अशी ही योजना होती. अशा कडव्या प्रतिहल्ल्याची अपेक्षा नसल्याने दोस्त राष्ट्र गाफील होते व त्यामुळे सुरुवातीस जर्मन सेनेला नेत्रदीपक यश मिळाले. जोखेन पायपरच्या नेतृत्वाखालील कॅंफग्रुप पायपर हा आघाडीच्या पॅंझर तुकड्याचा समूह दोस्तांच्या प्रदेशात इतका आत घुसला की त्यामुळे अमेरिकन सैन्याच्या फळीत त्यांनी जणू काही फुगवटा (बल्ज) तयार केला. यावरून नंतर या लढाईला नाव दिले गेले.

या हल्ल्याच्या सुरुवातीच्या दिवसात हवामान अतिशय खराब होते व याचा फायदा जर्मनीने पूरेपूर उठवला. दोस्त विमाने उडू शकत नसल्याने त्यांना हवेतून रोखणारी शक्ती नव्हतीच. अमेरिकन सैन्याच्या सेंट विथ आणि बॅस्टोइन येथील कडव्या प्रतिकाराने जर्मनीची चाल मंदावली. बॅस्टोइन येथे घेरल्या गेलेल्या १०१व्या एअरबॉर्न डिव्हिजनने पराक्रमाची शर्थ करून हा तिठा अमेरिकेच्या हातात राखला. जॉर्ज पॅटनच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या तिसऱ्या सैन्याने या धडकमोहिमेला खीळ घातली व हल्ला परतवला. जर्मन सैन्याचा पाठलाग करताना अमेरिकन सैन्याने अनेक जर्मन तुकड्या पकडल्या व उरलेल्यांना थेट जर्मनीपर्यंत माघार घेण्यास भाग पाडले. या मोहीमेत अमेरिकन सैन्याची ही मोठी हानी झाली. अमेरिकेच्या इतिहासातील ही सगळ्यात हानिकारक लढाई होती.

आशिया व प्रशांत महासागरातील रणांगण

मुख्य पान: प्रशांत महासागरातील लढाई

मध्य व नैर्ऋत्य प्रशांत महासागर

फेब्रुवारी १९४४ च्या अखेरीस अमेरिकेने नैर्ऋत्य प्रशांत महासागरातील मार्शल द्वीपसमूह काबीज केला वा आपली आगेकूच चालू ठेवली. त्याच सुमारास ४२,००० अमेरिकन सैनिक क्वाजालाइन एटॉलवर उतरले व आठवड्याभरात ते बेट जिंकले. त्यानंतर त्यांनी एनिवेटोकच्या लढाईत जपानला हरवले.

या चालींचा व्यूहात्मक उद्देश होता जपानच्या जवळातजवळ वायुसेनेचा तळ उभारण्याचा. यासाठी मेरियाना द्वीपसमूहातील सैपान, तिनियान व गुआमची बेटे जिंकणे आवश्यक होते. जून ११ला अमेरिकन आरमाराने सैपानवर बॉम्बफेक सुरू केली. ३२,००० सैनिकांनीशी लढणाऱ्या जपानी सैन्यावर जून १४ला ७७,००० अमेरिकन मरीन सैनिकांनी चाल केली व जुलै ७ला सैपान अमेरिकेच्या हातात आले. जपानने आपले उरलेसुरले आरमार फिलिपाईन्सच्या समुद्राच्या लढाईत पणाला लावले पण तेथेही त्यांना हार पत्करावी लागली तसेच त्यांची जवळजवळ सगळी विमाने व युद्धनौका नष्ट झाल्या. यानंतर जपानी आरमार केवळ नावापुरतेच उरले आणि आता जपान अमेरिकेच्या बी.२९ सुपरफोर्ट्रेस या बॉम्बफेकी विमानांच्या पल्ल्यात आले.

"मी परत आलो आहे." - जनरल मॅकआर्थरचे लाइफ नियतकालिकाच्या कार्ल मायडान्सने घेतलेले एक प्रसिद्ध छायाचित्र

जुलै २१ला गुआमवर हल्ला झाला व ऑगस्ट १०ला हेही बेट पडले पण येथे जपान्यांनी कडवी झुंज दिली. बेटाच्या कडे-कपारींतून लढणाऱ्या जपानी सैनिकांनी अमेरिकन सैन्याला सळो की पळो करून सोडले. बेट पडल्यावरही अनेक आठवडे या चकमकी सुरू होत्या. जुलै २४ला अमेरिकेने तिनियान बेटावर चाल केली व ऑगस्ट १ला ते जिंकून घेतले.

ऑक्टोबर २०ला जनरल डग्लस मॅकआर्थरचे सैनिक लेयटे बेटावर उतरले. जपानने असे होणार ही कल्पना असल्यामुळे येथे भक्कम बचावफळी उभारली होती. ऑक्टोबर २३ ते २६ दरम्यानच्या या लढाईत जपानने प्रथमतः कामिकाझे वैमानिकांचा उपयोग केला. जगातील सगळ्यात मोठ्या अशा या आरमारी युद्धात जपानची मुसाशी हे युद्धनौका, जी आत्तापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या लढाऊ नौकांपैकी एक होती, बुडाली. ही बुडवण्यासाठी १९ टोरपेडो व १७ बॉम्ब लागले.

१९४४मध्ये अमेरिकेच्या पाणबुड्या व विमानांनी जपानच्या व्यापारी व मालवाहू जहाजांवर हल्ले करून जपानकडे जाणाऱ्या कच्च्या मालाची रसद अगदी कमी केली होती. या एका वर्षात पाणबुड्यांनी जपानचे २० लाख टन सामान समुद्रतळास पोचवले होते.[२१] जपानचा खनिज तेलाचा साठा १९४४ च्या अंतापर्यंत जवळजवळ रिकामा झाला होता. याने जपानची आर्थिक व औद्योगिक स्थिती बिकट झाली.

चीन-जपान युद्ध

मुख्य पाने: ऑपरेशन इचिगो, चांग्शाची लढाई (१९४४), व ग्विलिन-ल्युझूची लढाई

एप्रिल १९४४मध्ये जपानने आपण पादाक्रांत केलेल्या ईशान्य चीन, कोरिया व आग्नेय एशियाला जोडणारा लोहमार्ग जिंकण्यासाठी ऑपरेशन इचिगो ही मोहीम सुरू केली. त्याचबरोबर या भागातील अमेरिकेचे तळ उद्ध्वस्त करणे हाही एक हेतु होता. जून १९४४मध्ये जपानने ३,६०,००० सैनिकांनिशी चांग्शा शहरावर चौथ्यांदा आक्रमण केले. ४७ दिवसांच्या रणधुमाळीनंतर शहर जपानी हातात आले. नोव्हेंबर पर्यंत जपानने ग्विलिन व ल्युझू शहरेही जिंकली व तेथील अमेरिकन वायुसेनेचे तळ नष्ट केले. तथापि हे करेपर्यंत अमेरिकेने उतरत्त नवीन तळ उभारले होते. डिसेंबर १९४४मध्ये जपानी सैन्य फ्रेंच इंडोचायना पर्यंत पोचले व ऑपरेशन इचिगोचे उद्दिष्ट साध्य झाले पण हे करताना जपानलाही मोठे नुकसान सहन करावे लागले होते.

आग्नेय आशिया

भारतीय सेनेची गोरखा रेजिमेंट इम्फाल-कोहिमा रस्त्यावर कूच करताना. (जानेवारी २७, इ.स. १९४५. १९४५ च्या सुरुवातीला जपानी सैन्याला म्यानमारमध्ये थोपवून धरण्याची कामगिरी गोरखा रायफल्सनी पार पाडली होती.

१९४४मध्ये अमेरिकन सैन्य भारतातून चीनला जाण्यासाठीचा लेडो मार्ग बांधत असताना जपानने आग्नेयेतून भारतावर चाल केली. ही चलो दिल्ली मोहीम जपानी सैन्य, म्यानमारमधील स्वातंत्र्यसैनिक व सुभाषचंद्र बोसच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय सेनेने उभारली होती. इंफालजवळ या सैन्याने कडाडून हल्ला चढवला पण ब्रिटिश सैन्याने (ज्यात मुख्यत्वे भारतीय सैनिकच होते) त्यांना थोपवून धरले. तुंबळ युद्धानंतर कोणालाच सरशी मिळाली नाही पण जपानी/भारतीय राष्ट्रीय सेनेने इंफालला वेढा घातला. ब्रिटिशांनी इंफाल व कोहिमाला विमानाद्वारे रसद व कुमक पोचवली. त्याचवेळी पश्चिम व उत्तरेकडून ताज्या दमाच्या फौजा पाठवून वेढा फोडून अडकलेल्या सैन्याची सुटका केली. हल्लेखोरांना वाटले होते की भारतीय प्रदेश जिंकल्यावर तेथूनच रसद मिळेल व ब्रिटिशांतर्फे लढणारे भारतीय सैनिक आपल्याला सामील होतील, त्यामुळे त्यांनी त्याची काही सोय केलेली नव्हती. आता आक्रमक स्वतःच वेढ्यात अडकले व कुमक न मिळाल्याने अतिशय हालात माघार घ्यालला लागले. उपासमार, रोगराई व शत्रूच्या हल्ल्यांना ८५,००० सैनिक बळी पडले. जपानच्या सगळ्यात मोठ्या पराभवात हा गणला जातो. या पराभवाबरोबरच ब्रिटिशांना सशस्त्र मार्गाने भारतातून हुसकावून लावण्याची अजून एक आशा मावळली.

युद्धाचा अंत - इ.स. १९४५

युरोपमधील रणांगण

बर्लिनप्रागवरील मोहीम, १९४५.

हेमंतातील सोव्हिएत कारवाया

मुख्य पाने: व्हिस्चुला-ओडर मोहीम व ऑपरेशन फ्रुहलिंग्सरवाखेन

जानेवारी १९४५मध्ये सोव्हिएत सैन्य ताज्या दमाने पुढच्या मोहीमेसाठी सज्ज होती. इव्हान कोनेव्हने आपल्या फौजेनिशी दक्षिण पोलंडमधील जर्मन शिबंदीवर हल्ला चढवला व त्यांचा पाठलाग करीत सॅंडोमियेर्झजवळ व्हिस्चुला नदी ओलांडली. जानेवारी १४ला कॉन्स्टान्टिन रोकोसोव्स्कीने नारेव नदी ओलांडून वॉर्सोच्या उत्तरेला आक्रमण केले व पूर्व प्रशियाची राखण करणारी जर्मन बचावफळी मोडीत काढली. झुकोवच्या सैन्यानेही त्यानंतर वॉर्सोवर हल्ला केला व जर्मन आघाडी होत्याची नव्हती केली.

जानेवारी १७ला झुकोवने वॉर्सो घेतले. १९ तारखेला लॉड्झही जिंकले. त्याचदिवशी कोनेव्हचे सैन्य युद्धपूर्वीच्या जर्मन सीमेवर येऊन थडकले. या एका आठवड्यात सोव्हिएत सैन्याने ६५० कि.मी. रुंदीची आघाडी उघडून १६० कि.मी. आत धडक मारली होती. फेब्रुवारीच्या मध्यास लाल सैन्याने बुडापेस्ट जिंकले. ही टोळधाड शेवटी ओडर नदीच्या किनारी बर्लिनपासून ६० कि.मी.वर येऊन थांबली.

पश्चिमेतील हेमंत कारवाया

जानेवारी १४ रोजी दुसऱ्या ब्रिटिश सैन्याने मास नदी व रोअर नदीच्या मधील रोअर त्रिकोणातून जर्मनीला हुसकावण्यासाठी ऑपरेशन ब्लॅककॉक ही मोहीम सुरू केली. जानेवारी २७ला जर्मन सैन्य रोअर नदीच्या पूर्वेस रेटले गेले होते.

याल्टा परिषद

याल्टा येथे जमलेले विन्स्टन चर्चिल, फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टजोसेफ स्टालिन.
मुख्य पान: याल्टा परिषद

युद्धाचे पारडे आपल्या बाजूला झुकत असल्याचे पाहून फेब्रुवारी १९४५मध्ये विन्स्टन चर्चिल, फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टजोसेफ स्टालिन यांनी याल्टा येथे भेटून युद्धानंतर युरोपची राजकीय व भौगोलिक स्थिती काय असावी यावर चर्चा केली. यात अनेक दूरगामी निर्णय घेण्यात आले.

  • एप्रिल १९४५मध्ये संयुक्त राष्ट्रांची स्थापना करणे.
  • पोलंडमध्ये मुक्त निवडणूका घेणे.
  • पोलंडची पश्चिम सीमा पूर्वेकडे सरकवणे यासाठी जर्मनीच्या पूर्व भागाचा लचका तोडून पोलंडमध्ये समाविष्ट करणे.
  • सगळ्या सोव्हिएत नागरिकांना सोव्हिएत संघाकडे सोपवणे.
  • जर्मनी शरण आल्याच्या तीन महिन्यात सोव्हिएत संघाने जपानवर आक्रमण करणे.

वसंतातील सोव्हिएत मोहीम

मुख्य पाने: सीलो हाइट्सची लढाई, बर्लिनची लढाई, व हॅल्बेची लढाई

एप्रिल १६ रोजी लाल सैन्याने पोलिश सैन्याच्या ७८,५५६ सैनिकांसह बर्लिनवर आक्रमण केले. एप्रिल २४ला सोव्हिएत सैन्यातील तीन फौजांनी बर्लिनला पूर्णपणे वेढा घातला. शेवटचा शर्थीचा प्रयत्न म्हणून हिटरलने शहरातील आबालवृद्ध नागरिकांना फोक्सस्टर्म या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले व चढाई करीत येणाऱ्या लाल सैन्याशी झुंज घेण्याचे हुकुम सोडले. त्यांच्याबरोबरीने सीलोच्या लढाईत पराभूत होऊन आलेली जर्मन फौज होती. लाल सैन्य बर्लिन शहरात घुसल्यावर झालेल्या असंख्य झटापटी दारुण होत्या. घराघरातून व रस्त्यातून आमनेसामने सैनिक व नागरिकांच्या चकमकी होत होत्या व बळींची संख्या लाखांच्या घरात गेली. सोव्हिएत सैन्याने ३,०५,००० सैनिक गमावले तर ३,२५,००० जर्मन नागरिक व सैनिक फक्त बर्लिनमध्ये मृ्त्युमुखी पडले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून ॲडॉल्फ हिटलर व त्याचे मंत्रीमंडळ फ्युह्ररबंकरमध्ये आश्रयाला गेले. शेवटी एप्रिल ३०, इ.स. १९४५ रोजी हिटलरने त्याची सोबतीण एव्हा ब्रॉनसह आत्महत्या केली.

वसंतातील पश्चिमेकडील आघाडी

अमेरिकेच्या जनरल ओमर ब्रॅडलीकडे जर्मन भूमिवरील आक्रमणाचे नेतृत्व होते.

जानेवारीअखेरीस पश्चिमेकडील दोस्त राष्ट्रांनी जर्मनीत पाय ठेवला. ऱ्हाइन नदीच्या तीरावरील जर्मन प्रतिकार मोडून काढीत त्यानी मार्चअखेर नदी ओलांडली. रेमाजेन येथील लुडेनडॉर्फ पूल हस्तगत झाल्यावर ही आगेकूच अजून गतिमान झाली.

ऱ्हाइन ओलांडल्यावर ब्रिटिश फौजा ईशान्येस हांबुर्गकडे सुटल्या. त्यांनी एल्ब नदी ओलांडून डेन्मार्कबाल्टिक समुद्राकडे धडक सुरू केली. अमेरिकेची नववी फौज दक्षिणेस रुह्रला घातलेल्या वेढ्याच्या उत्तर टोकापर्यंत पोचली तर पहिली फौज उत्तरेला याच वेढ्याच्या दक्षिण घेऱ्याला जाऊन भिडली. १३,००,००० सैनिक असलेल्या या फौजांचे नेतृत्व जन्रल ओमर ब्रॅडलीकडे होते. आता रुह्रला चारही दिशांनी वेढा पडला. फील्ड मार्शल वॉल्टर मॉडेलच्या नेतृत्वाखालील जर्मन सैन्यसमूह बी आता येथे पूर्णपणे अडकला. येथे अंदाजे ३,००,००० सैनिक युद्धकैदी झाले. यानंतर या अमेरिकन फौजा पूर्वेकडे निघाल्या व एल्ब नदीच्या तीरी सोव्हिएत सैन्याशी भेट झाल्यावर ही त्यांची विजयदौड थांबली.

इटली
इटालियन द्वीपकल्पातील दुर्गम पर्वत व येथील फौज फ्रान्समध्ये हलवल्यामुळे १९४५ च्या हिवाळ्यात दोस्तांची प्रगती हळूहळू होत होती. एप्रिल ९ला अमेरिका व युनायटेड किंग्डमची १५वी फौज गॉथिक रेषेवरचा प्रतिकार मोडून काढीत उत्तरेला सरकली व पो नदीच्या खोऱ्यात आली. येथून पुढे सरकत त्यांनी खोऱ्यातील जर्मन सैन्याला घेरले. याच वेळी अमेरिकेची पाचवी फौज पश्चिमेकडे गेली व तेथील फ्रेंच शिबंदीशी त्यांनी सूत जमवले. न्यू झीलंडच्या दुसऱ्या डिव्हीजनने त्रियेस्ते शहरातून युगोस्लाव्ह बंडखोरांना हुसकून लावले.

इटलीतील जर्मन सैन्याने शरणागती पत्करल्यावर मुसोलिनीने स्वित्झर्लंडला पळ काढण्याचा प्रयत्न केला पण इटलीतील क्रांतीकाऱ्यांनी त्याला पकडले व त्याची सोबतीण क्लारा पेटाची सह त्यांना मृत्युदंड दिला. त्यांचे मृतदेह मिलानला नेण्यात आले व जाहीर स्थळी उलटे टांगण्यात आले.

जर्मनीची शरणागती
[[चित्|thumb|right|200px|जून २४, इ.स. १९४५ रोजी मॉस्कोतील विजयसंचलनाचे लाल चौकात नेतृत्व करताना मार्शल झुकोव्ह (पांढऱ्या घोड्यावर) व मार्शल रोकोसोव्स्की)]]

मुख्य पाने: दुसऱ्या महायुद्धाचा अंत व प्राग आघाडी

ॲडॉल्फ हिटलरच्या मृत्यूनंतर ॲडमिरल कार्ल डोनित्झने जर्मन सैन्याचे सूत्रे हातात घेतली पण लवकरच हा डोलारा कोसळला. बर्लिनमधील जर्मन सैन्यबलाने मे २, इ.स. १९४५ रोजी सोव्हिएत सैन्यासमोर शरणागती पत्करली.

इटलीतील जर्मन सैन्याने २ मेलाच जनरल अलेक्झांडरच्या मुख्यालयात शरणागती पत्करली तर उत्तर जर्मनी, डेन्मार्क व नेदरलँड्समधील फौज ४ मेला शरण गेले. इटलीतील शरणागतीपूर्वी सोव्हिएत संघाने युनायटेड किंग्डम व अमेरिकेवर सोव्हिएत संघाशिवाय शरणागती घेण्याची तयारी करण्याचा आरोप ठेवला. मे ७ रोजी उरलेल्या सैन्याने जनरलोबेरोस्ट आल्फ्रेड जोड्लच्या नेतृत्वाखाली फ्रान्सच्या ऱ्हाइम्स शहरात शरणागती पत्करली. मे ८ला पश्चिमी दोस्तांनी व्ही.ई. दिन साजरा केला.सोव्हिएत संघाने मे ९ला विजय दिन साजरा केला. जर्मन मध्य सैन्यसमूहातील काही तुकड्यांनी मे ११-१२ पर्यंत चकमकी सुरू ठेवल्या होत्या.

पॉट्सडॅम
दोस्तांनी बर्लिनच्या उपनगर पॉट्सडॅममध्ये आपली शेवटची परिषद भरवली. जुलै १७ ते ऑगस्ट २ पर्यंत चाललेल्या या परिषदेत दोस्तव्याप्त जर्मनीबद्दलची धोरणे जाहीर करण्यात आली तसेच जपानला बिनशर्त शरणागती पत्करण्यासाठीचे अखेरचे आवाहन करण्यात आले.

प्रशांत महासागरातील रणांगण

मध्य व नैर्ऋत्य प्रशांत महासागर

मुख्य पाने: इवो जिमाची लढाई, ओकिनावाची लढाई, व बॉर्नियो मोहीम (१९४५)

जानेवारीत अमेरिकेचे सहावे सैन्य लुझोन या फिलिपाईन्सच्या मुख्य बेटावर उतरले. मार्चपर्यंत त्यांनी राजधानी मनिला काबीज केली. फेब्रुवारीतील इवो जिमावरील व एप्रिल-जूनमधील ओकिनावावरील विजयांमुळे आता जपान अमेरिकेच्या आरमारी व वायुसेनेच्या पल्ल्यात आले. राजधानी टोक्योसह अनेक शहरांवर अमेरिकेने तुफान बॉम्बफेक केली. यात ९०,०००हून अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. जपानमधील शहरे व वस्त्या दाट असल्यामुळे ही हानी जास्त होती. या बरोबरच तेथील घरे मुख्यत्वे लाकडी असतात त्यामुळे बॉम्बफेकीनंतर लागलेल्या आगींमध्येही जीवितहानी बरीच झाली. या शिवाय अमेरिकेने जपानमधील मुख्य बंदरे व जलमार्गांवर विमानांतून सुरूंग पेरले व जपानचा बाहेरच्या जगाशी संपर्क कमी केला.

१९४५ च्या मध्यातील बॉर्नियो मोहीम ही नैर्ऋत्य प्रशांतातील शेवटची मोहीम होती. तेथील जपानी सैन्याला हरवून त्यांच्या ताब्यातील दोस्त युद्धकैदी सोडविण्यासाठी ही मोहीम आखली होती.

आग्नेय एशिया

मुख्य पाने: मध्य बर्माची लढाई व ऑपरेशन ड्रॅक्युला

१९४४ च्या मॉन्सून मध्ये भारतावर चालून आलेल्या जपानी सैन्याला तेथील ब्रिटिश सैन्याने चिंदविन नदीपर्यंत मागे ढकलले होते. पाऊस संपताना अमेरिकन व चिनी सैन्याने लेडो मार्ग बांधून पूर्ण केला. तोपर्यंत जपानी सैन्याने माघार घेतल्यामुळे या कठीण रस्त्याचा दोस्तांना युद्धात फारसा उपयोग झाला नाही. आता भारतात जमलेल्या भारतीय, ब्रिटिश व आफ्रिकन फौजांनी जपान्यांचा पाठलाग सुरू केला व आघाडी मध्य ब्रह्मदेशपर्यंत नेली. मे २ला दोस्तांनी रंगून घेतले व जपानी तसेच भारतीय राष्ट्रीय सेनेला भारतातून पळवून लावले.

हिरोशिमा व नागासाकीवर परमाणुहल्ले

नागासाकीवर टाकलेल्या परमाणु बॉम्बचा स्फोट झाल्यावर अग्निज्वाला व धूर हवेत १८ कि.मी. वर गेला होता.

युद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. वस्तुतः नोव्हेंबरमध्ये अमेरिकेने जपानवर खुश्कीदलासह हल्ला करण्याचे योजिले होते पण ओकिनावाच्या लढाईनंतर त्यांना कळून चुकले की जपानचा प्रतिकार कडवा असेल व अशा हल्ल्यात जपानइतकीच अमेरिकेचीही हानी होईल. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार अशा जमिनीवर केलेलल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. तसेच जपानी नागरिकही लाखांत मेले असते. या अंदाजांबद्दल अद्यापही शंका व्यक्त केली जाते.

ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी एनोला गे नावाच्या बी.२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा नष्ट झाले. ऑगस्ट ९ रोजी बॉक्सकार नावाच्या बी.२९ विमानाने फॅट मॅन नावाचा परमाणु बॉम्ब नागासाकी शहरावर टाकून तेही शहर नष्ट केले.

दूरपूर्वेतील सोव्हिएत आक्रमण

मुख्य पान: ऑपरेशन ऑगस्ट स्टॉर्म

हिरोशिमावर बॉम्ब पडल्यावर दोनच दिवसात सोव्हिएत संघाने याल्टात नक्की केल्याप्रमाणे आपला जपानबरोबरचा अनाक्रमण तह धुडकावून लावला व मांचुरियातील जपानी सैन्यावर चाल केली. दोन आठवड्यात १०,००,००० जपानी सैनिकांचा पराभव करीत लाल सैन्य ऑगस्ट १८ला उत्तर कोरियात घुसले.

जपानची शरणागती

मुख्य पान: जपान विजय दिन

अमेरिकेचा परमाणुप्रयोग व सोव्हिएत संघाचे मांचुरियावरील आक्रमण पाहून जपानी सम्राट हिरोहितोने प्रधानमंडळाला न विचारता युद्धसमाप्तीचे प्रयत्न सुरू केले. ऑगस्ट १७ला केलेल्या दूरवाणीवरील आपल्या भाषणात त्याने आपल्या सैनिकांना हत्यारे खाली ठेवण्याचा आदेश दिला तसे करताना त्याने कारण सोव्हिएत आक्रमणाचे दिले व परमाणुबॉम्बचा उल्लेख टाळला.

ऑगस्ट १४, इ.स. १९४५ रोजी जपानने शरणागती पत्करली व हे अतिभयानक युद्ध अधिकृतरीत्या समाप्त झाले.

हताहत, नागरिकांवरील प्रभाव व अत्याचार

गुप्त कारस्थाने व भूमिगत सशस्त्र चळवळी

युद्धाचे परिणाम

दुसऱ्या महायुद्धाने मानवी इतिहासात कधीही न पाहिलेली अतोनात हिंसा पाहिली. जगातील सर्वच राष्ट्रे यात भरडली गेली. काही युद्धग्रस्त होतेच तर काहींना त्याचे परिणाम भोगावे लागले. जर्मनी, पोलंड व रशिया व जपानमध्ये सर्वाधिक लोक बळी पडले. वर नमूद केल्याप्रमाणे मृतांची संख्या सहा कोटीवर असण्याची शक्यता आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व रशिया या देशांतील शहरेच्या शहरे हवाई हल्यांमध्ये संपूर्णपणे बेचिराख झाली. या देशांना पुढील अनेक दशके ती शहरे पुन्हा उभारण्यात घालवावी लागली.

दुसऱ्या महायुद्धावरील मराठी पुस्तके

  • एरिक लोमॅक्सच्या दीर्घ प्रवास : दुसऱ्या महायुद्धातील गोष्ट (अनंत भावे)
  • कथा महायुद्धाच्या (डॉ. मिलिंद आमडेकर)
  • दहा हजार नयन : दुसऱ्या महायुद्धात फ्रेंचांच्या अपार त्यागाची गाथा ! (पंढरीनाथ सावंत)
  • दुसरे महायुद्ध (किरण गोखले)
  • दुसरे महायुद्ध (वि.स. वाळिंबे)
  • ('अद्भुत' महायुद्धाच्या खऱ्याखुऱ्या गोष्टी) दुसरे महायुद्ध : काही कथा (अनंत भावे)
  • दुसऱ्या महायुद्धातील महिला आघाडी (ग.म. केळकर)
  • दुसऱ्या महायुद्धातील शौर्यकथा (निरंजन घाटे)
  • द्वितीय महायुद्धानंतरचे जग (१९४७ ते १९९७) (य.ना. कदम)
  • फिफ्टी इअर्स ऑफ़ सायलेन्स : दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान अनेक वेळा बलात्कार झालेल्या स्त्रीची आठवणगाथा (मूळ लेखिका - जॅन रफ ओ हर्; मराठी अनुवाद - नीला चांदोरकर)
  • महायुद्ध १९३९ ते १९४४ (ज.पां. देशमुख)
  • युद्धकथा : दुसऱ्या महायुद्धाच्या खऱ्याखुऱ्या १२ कथा (अनंत भावे)
  • हिटलरचे महायुद्ध (वि.ग. कानिटकर)

हेसुद्धा पहा

माध्यमे

चित्रपटातदुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव जगातील बहुतेक राष्ट्रांवर पडला. अनेक साहित्य कृती, नाटके, चित्रपट दुसऱ्या महायुद्धावर अथवा त्यांच्या परिणामांवर बनले. त्यातील चित्रपट मुख्य युद्धातील घटनांवर आधारित होते तर काही त्याच्या परिणाम किंवा युद्धकालातील जीवनावर आधारित होते. काही सत्य घटनांवर तर काही काल्पनिक घटनांवर अथवा मिश्रित बनवले गेले. त्यातील काही प्रसिद्ध चित्रपट खालील प्रमाणे.

ट्व्हेल ओ क्लॉक हाय (१९४९), ब्रिज ऑन द रिव्हर क्वाई (१९५७), पॅटन (१९७०), दास बुट (१९८१), सेव्हिंग प्रायव्हेट रायन (१९८८), पर्ल हार्बर(२००१), व्हेअर इगल्स डेअर, द डायरी ऑफ यंग गर्ल, स्टालिन्ग्राड

छळछावण्यामधील जीवनावर आधारीत चित्रपटांमध्ये अनेक ऑस्कर विजेते चित्रपट आहेत. त्यातील प्रमुख चित्रपट म्हणजे शिंडलर्स लिस्ट, ऍने फ्रांक, लाईफ इज ब्युटिफुल, द पियानिस्ट इत्यादी.

मुख्य पान: अर्वाचीन संस्कृतीत दुसरे महायुद्ध

जगातील अनेक भाषांमध्ये दुसऱ्या महायुद्धाबद्दल कलाकृती निर्माण झाल्या आहेत.

यात शेकडो काल्पनिक चित्रपटही आहेत. यात ट्वेल्व ओ'क्लॉक हाय (१९४९), द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय (१९५७), द डर्टी डझन (१९६७), पॅटन (१९७०), डास बूट (जर्मन, १९८१), सेव्हिंग प्रायव्हेट रायन (१९९८), पर्ल हार्बर (२००१) इ. विशेष आहेत.

आजतगायत लिहिल्या गेलेल्या हजारो पुस्तकांतून या महायुद्धाचा उल्लेख आहे. यात जोसेफ हेलरचे कॅच-२२, अकियुकि नोसाकाचे ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईझ, ॲन फ्रॅंकचे द डायरी ऑफ अ यंग गर्ल आणि कर्ट व्होनेगटचे स्लॉटरहाउस-५ यांचा समावेश आहे.

ग्रंथ यादी

हेसुद्धा पहा

धारिका

साधारण माहिती

संचिका

माहिती

चलतचित्रे

  • The World at War (1974) is a 26-part Thames Television series that covers most aspects of World War II from many points of view. It includes interviews with many key figures (Karl Dönitz, Albert Speer, Anthony Eden etc.) (Imdb link)
  • The Second World War in Colour (1999) is a three episode documentary showing unique footage in color (Imdb link)
दुसरे महायुद्ध
घटनाक्रम    ठळक घटना    काही लेख    सहभागी देश    

पूर्वघटना:

  • कारणे
  • युरोपातील
  • एशियातील

मुख्य रणभूमी:

  • युरोप
  • पूर्व आघाडी (युरोप)
  • उत्तर आफ्रिका
  • मध्यपूर्व
  • भूमध्य समुद्र
  • पॅसिफिक समुद्र
  • चीन
  • अटलांटिक समुद्र

साधारण घटनाक्रम:

  • घटनाक्रम
  

१९३९:

१९४०:

१९४१:

१९४२:

१९४३:

१९४४:

१९४५:

  • ओकिनावाची लढाई
  • बर्लिनची लढाई
  • युरोपातील युद्धविराम
  • हिरोशिमा व नागासाकीवरील अणुहल्ला
  • जपानची शरणागती
  • आणखी...
  
  • ब्लिट्झक्रीग
  • कूटलेखन
  • दुसर्‍या महायुद्धातील शस्त्रास्त्रे
  • दुसर्‍या महायुद्धातील शस्त्रास्त्रांचे उत्पादन
  • दुसर्‍या महायुद्धादरम्यानच्या भूमिगत चळवळी
  • दुसर्‍या महायुद्धातील तंत्रज्ञान

नागरिकांवरील प्रभाव व अत्याचार:

  • हॉलोकॉस्ट
  • लेनिनग्राडचा वेढा
  • Allied war crimes
  • इ.स. १९४४चा डेन्मार्कमधील दुष्काळ
  • हिरोशिमा व नागासाकीवरील अणुहल्ला
  • German war crimes
  • Japanese war crimes
  • दुसर्‍या महायुद्धातील नागरी वस्त्यांवरील बॉम्बहल्ले

पर्यवसान:

  • दुसर्‍या महायुद्धाचा प्रभाव
  • दुसर्‍या महायुद्धातील हताहत
  • दुसर्‍या महायुद्धानंतरची जर्मनवंशीयांची हकालपट्टी
  • शीतयुद्ध
  

दोस्त राष्ट्रे
युनायटेड किंग्डम
सोवियेत संघ
अमेरिकेची संयुक्त संस्थाने
चीन
पोलंड
फ्रांस
नेदरलँड्स
बेल्जियम
कॅनडा
नॉर्वे
ग्रीस
युगोस्लाव्हिया
चेकोस्लोव्हेकिया
भारत
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलँड
दक्षिण आफ्रिका
इजिप्त
फिलिपाईन्स
ब्राझिल
• आणखी...

अक्ष राष्ट्रे
जर्मनी
जपान
इटली
विची फ्रांस
हंगेरी
बल्गेरिया
रोमेनिया
फिनलंड
क्रोएशिया
स्लोव्हेकिया
थायलंड
• आणखी...

हेसुद्धा पहा

दुसर्‍या महायुद्धाबद्दलचे वर्गीकृत लेख
• आधुनिक संस्कृतीतील दुसर्‍या महायुद्धाचे उल्लेख
• दुसर्‍या महायुद्धातील सैनिकी सन्मान
• दुसर्‍या महायुद्धादरम्यान उत्तर अमेरिकेवरील हल्ले
• दुसर्‍या महायुद्धातील सैनिकी पदव्या


दुसर्‍या महायुद्धाबद्दल (इंग्लिशमध्ये) अजून माहिती:

इंग्लिश विक्शनरीवर दुसरे महायुद्ध
विकिबुक्सवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलची पुस्तके
विकिक्वोट्सवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलचे उद्गार
विकिसोर्सवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलची मूळ लिखाणे
विकिकॉमन्सवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलची चित्रे व चित्रफिती
विकिन्यूजवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलच्या बातम्या

  • हा लेख इंग्लिश विकिपिडीयावरील या लेखावर आधारित आहे

बाह्य दुवे

संदर्भ

क्रिकेट

धूळपाटी/KiranBOT II
गोलंदाज शॉन पोलॉकफलंदाज मायकल हसी. पाढंऱ्या रंगाची खेळपट्टी दिसत आहे.
सर्वोच्च संघटनाआयसीसी
उपनावद जंटलमन्स गेम ("The Gentleman's game")
सुरवात१८ वे शतक
माहिती
संघ सदस्य११ खेळाडू संघागणिक
बदली खेळाडू केवळ जखमी किंवा आजारी खेळाडूसाठी
मिश्रहो, वेगळ्या स्पर्धा
वर्गीकरणसांघिक, चेंडूफळी
साधनक्रिकेट चेंडू, क्रिकेट बॅट,
यष्टी
मैदानक्रिकेट मैदान
ऑलिंपिक१९०० उन्हाळी ऑलिंपिक केवळ

क्रिकेट हा मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू(बाॅल) आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड लांबीची मुख्य खेळपट्टी असते. तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ लाकडी यष्टी असतात. एक संघ फलंदाजी संघ म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला डाव असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित षटके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत अतिरिक्त धावा मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता संघ म्हणून घोषित होतो.

प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला, दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक खेळाच्या मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील गोलंदाज खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसऱ्या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे (या फलंदाजाला स्ट्रायकर म्हणतात.) जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळाला सुरूरवात होते. स्ट्रायकर खेळपट्टीवर यष्टीसमोर चार फुटांवर क्रीजमध्ये उभा राहतो. बॅटचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापूर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे ही फलंदाजाची भूमिका असते. दुसरा फलंदाज (नॉन-स्ट्रायकर), खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला गोलंदाजाजवळ क्रीजच्या आतमध्ये उभा राहतो. बाद झालेल्या फलंदाजाला मैदान सोडावे लागते, आणि त्याच्या संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो. फलंदाजाला धावा करू न देणे आणि त्याला बाद करणे ही गोलंदाजाची उद्दिष्ट्ये असतात. एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर चेंडूफेकीचे एक षटक पूर्ण होते. त्यानंतरचे षटक दुसरा गोलंदाज, खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने टाकतो.

फलंदाज बाद होण्याच्या सामान्य पद्धती

  • त्रिफळाचीत : गोलंदाजाने फेकलेला चेंडू थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला की फलंदाज त्रिफळाचीत होतो..
  • पायचीत : जेव्हा फलंदाज बॅटऐवजी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून रोखतो, तेव्हा तो पायचीत होतो.
  • झेलबाद : जेव्हा फलंदाजाने टोलविलेला चेंडू हवेत उडून जमिनीवर पडण्याआधी क्षेत्ररक्षक झेलतो, तेव्हा फलंदाज झेलबाद होतो.
  • धावचीत : फलंदाज क्रीजच्या बाहेर असताना क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि तो यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो ह्याला धावचीत असे म्हणतात.

धावा मिळवण्याच्या पद्धती

धावा दोन प्रकारे जमविल्या जातात: चेंडू पुरेशा ताकदीने टोलवून सीमारेषेपार करून किंवा क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवून यष्टीच्या दिशेने फेकण्याआधी दोन्ही फलंदाजांनी एकाचवेळी धावून आपल्या जागेवरून खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचून. फलंदाज क्रिजमध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो (ह्याला धावचीत असे म्हणतात). मैदानावर निर्णय देण्याची भूमिका दोन पंच पार पाडतात.

क्रिकेटचे कायदे करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब (MCC) यांच्यावर आहे. क्रिकेटचे ट्वेंटी२० (ज्यामध्ये १ डाव हा २० षटके म्हणजेच १२० चेंडू इतका असतो) पासून ते कसोटी क्रिकेट (जो पाच दिवस आणि अमर्यादित षटकांचा असतो आणि प्रत्येक संघ प्रत्येकी दोन डाव खेळतो) पर्यंत अनेक प्रकार आहेत. परंपरागत क्रिकेट संपुर्णतः सफेद रंगाची साधने (कपडे, पॅड, ग्लोव्ह्ज) वापरून खेळले जाते, परंतु मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळताना, खेळाडू क्लब किंवा संघाच्या रंगाचे कपडे परिधान करतात. मूलभूत साधनांच्या संचाशिवाय, काही खेळाडू चेंडू लागून होणाऱ्या दुखापतींपासून बचाव करण्यासाठी, संरक्षक साधने वापरतात, जी कॉर्क पासून बनवलेली, कातडी अच्छादन असलेली आणि अगदी टणक असतात.क्रिकेटची उत्पत्ती कधी झाली हे अनिश्चित असले तरीही, सर्वप्रथम १६व्या शतकात दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या नोंदी केल्या गेल्या. ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारामुळे क्रिकेटचा प्रसार जगभरात झाला, आणि पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १९व्या शतकाच्या मध्यावर खेळवला गेला. क्रिकेट नियामक मंडळ-आयसीसीचे १००हून अधिक सभासद आहेत, त्यापैकी १० पूर्ण सभासद आहेत जे कसोटी क्रिकेट खेळतात. ऑस्ट्रेलेशिया, ब्रिटन, भारतीय उपखंड, दक्षिणी आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमध्ये क्रिकेटचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. स्वतंत्रपणे आयोजन आणि खेळल्या जाणाऱ्या, महिला क्रिकेटनेसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त केला आहे.

व्युत्पत्ती

"क्रिकेट" ह्या संज्ञेबद्दल अनेक शब्द स्रोत म्हणून सुचवले गेले आहेत. खेळाबद्दल सर्वात आधीचा निश्चित संदर्भ मिळतो तो १५९८ मध्ये, जेव्हा खेळाला creckett म्हटले जात असे.[१] जुन्या इंग्रजी भाषेत नावाचा एक संभाव्य स्रोत आहे, cricc किंवा cryce म्हणजेच crutch किंवा काठी.[२] प्रसिद्ध लेखक सॅम्युएल जॉन्सनच्या शब्दकोशामध्ये, त्याने "cryce, Saxon, a stick" वरून क्रिकेट हा शब्द तयार केला.[३] जून्या फ्रेंच भाषेत, criquet ह्या शब्दाचा अर्थ एका प्रकारची छडी किंवा काठी असा असावा असे दिसते.[२] दक्षिण-पुर्व इंग्लंड आणि बुरुंडी किंवा बूर्गान्यच्या सरदाराच्या ताब्यातील मुलूख आणि तेव्हाचा फ्लॅंडर काऊंटी यांच्यामध्ये असलेल्या घनिष्ट मध्ययुगीन व्यापारासंबंधावरून, असे दिसते की हे नाव मिडल डच वरून घेण्यात आले असावे[४] krick(-e), म्हणजे बाक असलेली काठी.[२] आणखी एक संभाव्य स्रोत म्हणजे मिडल डच शब्द krickstoel, म्हणजे चर्चमध्ये गुडघे टेकवण्यासाठी वापरले जाणारे लांब कमी उंचीचे स्टूल किंवा बाक, ज्याचे साम्य पूवी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन यष्टी असणारी लांब खेळपट्टीशी होते.[५] बॉन विद्यापीठातील युरोपीय भाषांचे तज्ज्ञ हेनर गिलमेइस्टरच्या मते, हॉकीसाठी वापरला जाणारा वाक्प्रचार met de (krik ket)sen (अर्थात, "काठीसह पाठलाग") ह्यावरून "cricket" हा शब्द घेतला गेला असावा.[६] डॉ गिलमेइस्टर यांच्या मते फक्त नावच नाही तर हा खेळच मूळतः फ्लेमिश आहे.[७]

इतिहास

क्रिकेटची सुरुवात १३०१ च्या सुरुवातीला झाल्याचे अनेक बनावट आणि/किंवा त्याला आधार असलेल्या पुराव्यांची उणीव आहे. तरीही क्रिकेटबद्दल १६व्या शतकातील, इंग्लंडमधील ट्युडर काळापर्यंतचे पुरावे मिळतात. सर्वात आधीचे क्रिकेट खेळले गेल्याबद्दलचे नक्की संदर्भ मिळतात ते, १५९८मधील न्यायालयीन कारवाईतील पुराव्यांमध्ये, ज्यामध्ये गिल फोर्डच्या सार्वजनिक जमिनीवर १५५० च्या सुमारास creckettचा खेळ खेळला गेल्याची नोंद आहे. सोमवार, १७ जानेवारी १५९७ रोजी गिलफोर्ड कोर्टातील सुनावणी दरम्यान, ५९ वर्षीय कोरोनर, जॉन डेरिक जेव्हा ५० वर्षांपूर्वी फ्री स्कूल ऑग गिलफोर्डचा विद्यार्थी असताना दिलेल्या साक्षीमध्ये म्हणतो, "hee and diverse of his fellows did runne and play [on the common land] at creckett and other plaies."[३][८]

फ्रान्सिस कोटेस, द यंग क्रिकेटर, १७६८

क्रिकेट हा मूलतः लहान मुलांचा खेळ आहे असा समज होता, परंतु १६११ मधील काही संदर्भ[३] असे दर्शवतात की प्रौढांनी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि सर्वात जुना ज्ञात इंटर-पॅरिश किंवा व्हिलेज क्रिकेट सामना त्याकाळी खेळवला गेला.[९] 17 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्लिश वसाहतींद्वारे उत्तर अमेरिकेत क्रिकेटची ओळख झाली आणि 18 व्या शतकात ते जगातील इतर भागात आले.

१६२४ मध्ये, जॅस्पर व्हिनॉल नावाचा खेळाडू ससेक्समधील दोन रहिवासी संघांदरम्यानच्या सामन्यामध्ये डोक्याला चेंडू लागून मरण पावला होता.[१०] १७ शतकामध्ये, दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये खेळाचा प्रसार झाल्याचे अनेक संदर्भ सापडतात. शतकाच्या शेवटापर्यंत, क्रिकेट उच्च असा एक संघटित खेळ म्हणून नावारूपास आला आणि इंग्लंडच्या जीर्णोद्धारानंतर १६६० मध्ये पहिला व्यावसायिक खेळ म्हणून पाहिला जाऊ लागला असे मानले जाते. एका वर्तमानपत्रातील अहवाल सांगतो की, १६९७ मध्ये ससेक्समध्ये उच्च गटासाठी "ग्रेट क्रिकेट मॅच" म्हणून ओळखला जाणारा सामना प्रत्येकी ११ खेळाडूंच्या संघांदरम्यान खेळवला गेला. क्रिकेट सामन्याचा हा सर्वात जुना आणि महत्त्वाचा संदर्भ आहे.[११]

१८ व्या शतकात खेळामध्ये बरेच परिवर्तन झाले. स्वतःचे "निवडक XI" संघ असलेल्या श्रीमंतांनी खेळलेला जुगार (बेटिंग) हा ह्या सुधारणांचा एक महत्त्वाचा भाग होता. १७०७ पासूनच क्रिकेट हा लंडनमधील एक खूप महत्त्वाचा खेळ बनला होता आणि शतकाच्या काही मधल्या वर्षांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर फिन्सबरीच्या आर्टिलरी मैदानावर सामन्यांसाठी जात असत. खेळाच्या एक गडी प्रकाराने खूप लोकांना आणि जुगाराला आकर्षित केले, १७४८ च्या मोसमात हा प्रकार लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होता. सन १७६० च्या सुमारास गोलंदाजीच्या तंत्रामध्ये मोठी क्रांती झाली. गोलंदाजांनी चेंडू घरंगळत टाकण्याऐवजी चेंडूचा टप्पा टाकू लागले. त्यामुळे बॅटच्या रचनेमध्ये सुद्धा अमुलाग्र बदल झाले कारण, उसळणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी जुन्या "हॉकी स्टिक"च्या आकाराच्या बॅटऐवजी आधुनिक सरळ बॅटची गरज होती. १७६० मध्ये हॅम्ब्लेडॉन क्लबची स्थापना झाली आणि १७८७ मध्ये मेरीलबोन क्रिकेट क्लब (MCC)ची निर्मिती व जुने लाॅर्ड्‌ज मैदान खुले होईपर्यंत पुढची वीस वर्षे, हॅम्ब्लेडॉन क्रिकेटमधील महानतम क्लब आणि क्रिकेटचा केंद्रबिंदू होता. एमसीसी लवकरच क्रिकेटचा एक अव्वल क्लब आणि क्रिकेटच्या नियमांचा पालक बनला. १८ व्या शतकाच्या नंतरच्या काळात तीन यष्टी असलेली खेळपट्टी आणि पायचीतचा समावेश असलेले नवे नियम लागू करण्यात आले.

परदेश दौरा करणारा पहिला इंग्लिंश संघ, उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या जहाजावर, १८५९

१९व्या शतकात अंडरआर्म गोलंदाजीची जागा आधी राउंडआर्म आणि नंतर ओव्हरआर्म गोलंदाजीने घेतली. ह्या दोन्ही सुधारणा वादग्रस्त होत्या. परगणा किंवा काऊंटी स्तरावरच्या खेळ संघटना काऊंटी क्लब तयार करू लागल्या आणि १८३९मध्ये ससेक्सची स्थापना झाली, आणि अखेर १८९० मध्ये काउंटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाली. त्याचदरम्यान ब्रिटिश साम्राज्याने क्रिकेटचा खेळ परदेशात पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि १९व्या शतकाच्या मध्यावर क्रिकेट भारत, उत्तर अमेरिका, कॅरेबियन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये खूप लोकप्रिय होत गेला. १८४४ मध्ये, सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय सामना अमेरिका आणि कॅनडा ह्या संघांदरम्यान खेळवला गेला. १८५९ मध्ये, इंग्लंडचा संघ, उत्तर अमेरिकेच्या, सर्वात पहिल्या परदेशी दौऱ्यावर गेला.

परदेश दौरा करणारा पहिला ऑस्ट्रेलियाई संघ होता तो अबोरिजिनल स्टॉकमेन (Aboriginal stockmen), जो काऊंटी संघांविरुद्ध सामने खेळण्यासाठी १८६८ साली इंग्लंडला गेला होता..[१२] १८६२ मध्ये, इंग्लडचा संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. १९व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू होता विल्यम गिल्बर्ट ग्रेस, ज्याने त्याच्या दीर्घ आणि प्रभावी कारकिर्दीची सुरुवात १८६५ मध्ये केली.

कसोटी क्रिकेटमधील सर्वात जास्त ९९.९४ सरासरीचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डॉन ब्रॅडमनच्या नावावर आहे.

१८७६-७७ मध्ये, इंग्लंडचा संघ ज्या कसोटी सामन्याला पूर्वलक्षी प्रभावाने सर्वात पहिला कसोटी सामना म्हटले जाते अशा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावरील सामन्यात सहभागी झाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धेने १८८२ साली द ॲशेसला जन्म दिला आणि आजतागायत ही स्पर्धा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रसिद्ध स्पर्धा राहिली आहे. १८८८-८९ पासून जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडविरुद्ध खेळला तेव्हा पासून कसोटी क्रिकेटने हातपाय पसरायला सुरुवात केली.

पहिल्या महायुद्धाच्या आधीची दोन दशके ही "गोल्डन एज ऑफ क्रिकेट" म्हणून ओळखली जातात. युद्धामुळे झालेल्या एकंदरीत नुकसानाच्या अर्थी ते एक नाव आहे, परंतु ह्या काळात अनेक महान खेळाडू आणि अविस्मरणीय सामने झाले, मुख्यतः काऊंटी आणि कसोटी स्तरावरच्या स्पर्धांचे आयोजन झाले.

युद्धांतर्गत वर्षांवर वर्चस्व गाजवले ते एका खेळाडूने: ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन, आकडेवारीनुसार आजवरचा सर्वात महान फलंदाज. दुसऱ्या जगातिक महायुद्धाआधी वेस्ट इंडीज, भारत आणि न्यू झीलंड आणि महायुद्धानंतर पाकिस्तान, [[श्रीलंका [क्रिकेट संघ|श्रीलंका]] आणि बांगलादेश ह्या संघासोबत २०व्या शतकामध्ये कसोटी क्रिकेटची विस्तार चालूच राहिला. सरकारच्या वर्णभेदाच्या धोरणामुळे दक्षिण आफ्रिकी संघावर १९७० ते १९९२ पर्यंत बंदी घातली गेली होती.

१९६३ मध्ये क्रिकेटने जणू नव्या युगात पदार्पण केले. इंग्लंड काऊंट्यांनी मर्यादित षटकांच्या सामन्यांचा प्रकार आणला. निकाल लागण्याच्या खात्रीमुळे, मर्यादित षटकांचे क्रिकेट खूपच किफायतशीर होते आणि अशा सामन्यांमध्ये वाढ झाली. पहिला आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांचा सामना १९७१ साली खेळवला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने ह्या क्रिकेट प्रकारातील क्षमता ओळखली आणि पहिल्या मर्यादित षटकांच्या सामन्याच्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन १९७५ मध्ये केले. २१व्या शतकात मर्यादित षटकांच्या प्रकारामध्ये ट्वेंटी२० क्रिकेटची सुरुवात करण्यात आली. हा प्रकार अल्पावधीतच लोकप्रिय झाला.

हॉकी आणि फुटबॉलसारखे काही इंग्लिश खेळ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळजवळ संपूर्ण जगात खेळले जातात, परंतुक्रिकेट हा मुख्यत: एके काळी ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग असलेल्या देशांपुरताच मर्यादित राहिला आहे. उद्योगांच्या पूर्वीच्या विषमतेमुळे खेळाला बाहेरील देशांत जाण्यास अवघड गेले, त्यामुळे जेथे ब्रिटिशांनी राज्य केले तेथेच क्रिकेट मूळ धरू शकले. ह्या ठिकाणी हा खेळ एकतर तेथे असलेल्या ब्रिटिशांमुळे किंवा त्यांचे अनुकरण करणाऱ्या स्थानिक उच्चभ्रूंनी लोकप्रिय केला.

नियम आणि खेळ

क्रिकेट हा प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान बॅट आणि चेंडूने खेळला जाणारा खेळ आहे.[१३][१४] एक संघ धावा करण्याचा प्रयत्नात फलंदाजी करतो, तर दुसरा संघ गोलंदाजी आणि धावा रोखण्यासोबतच फलंदाजाला बाद करण्यासाठी चेंडू अडवतो. प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त धावा करणे हे खेळाचे उद्दीष्ट असते. क्रिकेटच्या काही प्रकारांमध्ये, सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचे सर्व खेळाडू बाद करणे गरजेचे असे, अन्यथा असा सामना अनिर्णित राहतो.

खेळाचे स्वरूप

क्रिकेट सामना ज्या कालावधीत विभागला जातो त्याला डाव (innings) असे म्हणतात. सामन्याच्या आधीच ठरवले जाते की प्रत्येक संघाला प्रत्येकी एक किंवा दोन डाव आहेत. डावा दरम्यान एक संघ क्षेत्ररक्षण करतो आणि दुसरा फलंदाजी. प्रत्येक डावामध्ये दोन्ही संघ फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अदलाबदली करतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील सर्वच्या सर्व अकरा खेळाडू मैदानावर असतात, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघातील एकावेळी फक्त दोन फलंदाज मैदानावर असतात. फलंदाजीची क्रमवारी बहुतेकदा सामना सुरू होण्याच्या अगदी सुरुवातीला जाहीर केली जाते, परंतु ती बदलली जाऊ शकते.

सामना सुरू होण्याआधी एका संघाचा कर्णधार (जो स्वतःसुद्धा त्या संघातील एक खेळाडू असतो) नाणेफेक करतो, नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला आधी फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचा अधिकार असतो.

क्रिकेटचे मैदान हे बहुधा वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असते. मैदानाच्या मधोमध आयताकृती खेळपट्टी असते. खेळाच्या मैदानाच्या कडा सीमारेषेने अंकित केलेल्या असतात. ही सीमारेषा म्हणजे कुंपण, स्टॅंडचा भाग, एक दोर किंवा रंगवलेली रेषा असते

खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना लाकडी लक्ष्य असते ज्याला यष्टी असे म्हणतात; दोन टोकांच्या यष्ट्यांमध्ये २२ यार्ड (२० मी)चे अंतर असते. खेळपट्टी रंगवलेल्या रेषांनी अंकित केलेली असते: यष्ट्यांच्या रेषेत गोलंदाजी क्रिज, आणि त्याच्यापुढे चार फुटांवर (१२२ सेंमी) फलंदाजी किंवा पॉपिंग क्रिज. यष्ट्यांच्या संचामध्ये तीन उभ्या यष्टी आणि त्यावर दोन लहान आडव्या बेल्स असतात. कमीत कमी एक बेल पडल्यानंतर किंवा एखादी यष्टी पडल्यानंतर (बहुतेकदा चेंडूमुळे, किंवा फलंदाजाचा हात, कपडे किंवा एखादी गोष्ट लागून) गडी बाद होतो. परंतु चेंडू लागूनही जर बेल किंवा यष्टी पडली नाही तर तो बाद ठरवला जात नाही.

कोणत्याही वेळेस प्रत्येक फलंदाज एका बाजूच्या विकेटचे (यष्ट्यांचे) पालकत्व करत असतो (तो ज्या यष्ट्यांच्या जवळ असेल त्या) आणि प्रत्यक्षात फलंदाजी करताना सोडून, जेव्हा फलंदाज त्याच्या जागी असतो, तेव्हा तो सुरक्षित असतो. म्हणजेच त्याच्या शरीराचा एखादा अवयव किंवा बॅट, तो पॉपिंग क्रिजच्या आत असताना मैदानाला टेकलेली असते. जर तो त्याच्या क्रिजच्या बाहेर असेल आणि चेंडू जिवंत असताना त्याच्याकडील यष्ट्या पडल्या तर तो बाद होतो, परंतु दुसरा फलंदाज सुरक्षित असतो.[१५]

पंच
यष्टी
नॉन-स्ट्रायकिंग फलंदाज
गोलंदाज
चेंडू
खेळपट्टी
क्रिज
स्ट्रायकिंग फलंदाज
यष्टी
यष्टिरक्षक
पहिली स्लिप
परतीचे क्रिज

दोन फलंदाज खेळपट्टीच्या विरोधी बाजूला आपापली जागा घेतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एक खेळाडू गोलंदाज, खेळपट्टीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या स्ट्रायकिंग फलंदाजाकडे गोलंदाजी करतो. गोलंदाजाच्या बाजूकडील फलंदाजाला नॉन-स्ट्रायकर म्हणतात, आणि तो त्याच्या बाजूच्या क्रिजच्या मागे उभा राहतो. थोडी फार जोखीम घेऊन, फलंदाजाला त्यांच्या क्रिजमधून बाहेर येण्याची परवानगी असते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एक खेळाडू, यष्टिरक्षक, स्ट्रायकरच्या यष्ट्यांमागे उभा राहतो.

क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील इतर नऊ खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर, मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. संघाचा कर्णधार डावपेचांचा भाग म्हणून वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करत राहतो.

मैदानावर नेहमी दोन पंच असतात. गोलंदाजाच्या बाजूला एक आणि पॉपिंग क्रिजच्या बाजूला स्क्वेअर लेगजवळ दुसरा.

दोन फलंदाज खेळपट्टीच्या विरोधी बाजूला आपापली जागा घेतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एक खेळाडू गोलंदाज, खेळपट्टीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या स्ट्राईकिंग फलंदाजाकडे गोलंदाजी करतो. गोलंदाजाच्या बाजूकडील फलंदाजाला नॉन-स्ट्राईकर म्हणतात, आणि तो त्याच्या बाजूच्या क्रिजच्या मागे उभा राहतो. थोडी फार जोखीम घेऊन, फलंदाजाला त्यांच्या क्रिजमधून बाहेर येण्याची परवानगी असते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एक खेळाडू, यष्टिरक्षक, स्ट्रायकरच्या यष्ट्यांमागे उभा राहतो.

क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील इतर नऊ खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर, मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. संघाचा कर्णधार डावपेचांचा भाग म्हणून वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करत राहतो.

मैदानावर नेहमी दोन पंच असतात. गोलंदाजाच्या बाजूला एक आणि पॉपिंग क्रिजच्या बाजूला स्क्वेअर लेगजवळ दुसरा.गोलंदाज बहुधा यष्ट्यांच्या काही यार्ड (मीटर) मागे जातो, पुन्हा यष्ट्यांकडे धावत येतो (ह्याला रन-अप म्हणतात) आणि गोलंदाजी क्रिजमध्ये पोहोचल्यावर हात वर करून (ओव्हर आर्म) चेंडू सोडतो. (चेंडू सोडण्याआधी जर तो क्रिजच्या पुढे गेला, किंवा कोपरातून हात जास्त वाकवला, तर तो चेंडू नो बॉल ठरवला जातो, अशा चेंडूवर फलंदाज बाद होत नाही आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला एक अतिरिक्त धाव मिळते. जर चेंडू यष्ट्यांच्या फलंदाजाच्या समोरून तो जिथे पोहोचू शकणार नाही अशा प्रकारे खूप दुरून किंवा फलंदाजाच्या अगदी मागून किंवा फलंदाजाच्या डोक्यावरून यष्ट्यांच्या पलीकडे गेल्यास त्याला वाईड म्हटले जाते, आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला एक अतिरिक्त धाव दिली जाते.) चेंडू अशा प्रकारे टाकला जातो, ज्यायोगे तो खेळपट्टीवर टप्पा घेईल किंवा अगदी क्रिजमध्ये टप्पा पडेल अशा बेताने (यॉर्कर), किंवा टप्पा न पडता क्रिजच्या पलीकडे जाईल (फुल टॉस), अशा प्रकारे चेंडू टाकला जाऊ शकतो.

नो बॉल किंवा वाईड हे चेंडू षटकातील सहा चेंडूंमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत.

फलंदाज चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून वाचवण्याचा आणि बॅटने टोलवण्याचा प्रयत्न करतो. (ह्यामध्ये बॅटचे हॅंडल किंवा दांडा आणि ग्लोव्ह्जचा समावेश असतो.) जर गोलंदाज, यष्ट्या उखडण्यात यशस्वी झाला तर फलंदाज बाद होतो आणि त्याला त्रिफळाचीत असे म्हणतात. जर फलंदाजाला बॅटने चेंडू अडवता आला नाही, परंतु जर शरीराच्या इतर कोणत्याही भागाचा अडथळा निर्माण होऊन, चेंडू यष्ट्यांवर जाण्यापासून अडवला गेला तर फलंदाज पायचीत, किंवा "एलबीडब्लू" म्हणून बाद होऊ शकतो.

जर फलंदाजाने चेंडू व्यवस्थित टोलवला आणि चेंडूचा टप्पा न पडता क्षेत्ररक्षकाने तो थेट झेलला तर फलंदाज झेलबाद होतो. जर चेंडू गोलंदाजाचेच झेलला तर त्यास कॉट ॲन्ड बोल्ड म्हणतात; तर यष्टिरक्षकाने झेलला तर, कॉट बिहाईंड किंवा यष्ट्यांमागे झेलबाद असे म्हणतात.

जर फलंदाज चेंडू टोलवण्यात यशस्वी झाला आणि त्याचा झेल घेतला गेला नाही, तर दोन्ही फलंदाज मिळून त्यांच्या संघासाठी धावा जमावण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या लांबीइतके धावून आपापल्या जागा बदलतात आणि विरुद्ध क्रिजच्या आत आपल्या बॅटी टेकवतात. दोन्ही फलंदाजांनी यशस्वीपणे आपले स्थान बदलून, क्रिजच्या आत बॅट मैदानाला टेकवल्यानंतर एक धाव मिळते. फलंदाज एक किंवा दोन धावा काढण्याचा प्रयत्न करू शकतो तसेच तो एकही धाव न काढण्याचा पर्यायही स्वीकारू शकतो. धाव काढण्याच्या प्रयत्नात बाद होण्याचा धोका असतो. जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चेंडू पकडून फलंदाजी करणारे फलंदाज क्रिजच्या आत येण्याआधी यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात यश मिळवले, तर फलंदज धावचीत होतो. काही वेळा फलंदाज धावायला सुरुवात करतात, आणि विचार बदलून पुन्हा मूळ जागी परतू शकतात.

जर फलंदाजाने टोलवलेला चेंडू टप्पा न पडता थेट सीमारेषेपार गेला तर त्याला षट्कार म्हणतात, आणि फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात सहा धावा जमा होतात. जर चेंडू मैदानाला स्पर्श करून सीमारेषेपार गेला तर त्याला चौकार म्हणतात, ज्याबद्दल फलंदाजाला चार धावा मिळतात. अशा वेळी चेंडू सीमारेषेपार जाण्याआधी फलंदाजाने धावण्यास सुरुवात केलेली असू शकते, परंतु चेंडू सीमारेषेपार गेल्याने, त्या धावा मोजल्या जात नाहीत.

फलंदाजा चेंडू टोलवू शकला नाही तरीही तो अतिरिक्त धावांसाठी प्रयत्न करू शकतो : त्याला बाय म्हणतात. जर चेंडू त्याच्या अंगाला लागून गेला तर त्याला लेग बाय म्हणतात.

गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाज टोलवू शकला नाही आणि जर तो त्याच्या क्रिजच्या बाहेर आला, तर यष्टिरक्षक चेंडू पकडून यष्टी उडवू शकतो, त्यास यष्टिचीत असे म्हणतात.

नो बॉल खेळून फलंदाज दंडापेक्षा अधिक धावा वसूल करण्याचा पर्याय निवडू शकतो. जर त्याने असे केले तर तो केवळ धावचीत बाद होऊ शकतो.

फलंदाजाने धावा मिळवणे थांबविल्यानंतर चेंडू मृत होतो, आणि तो गोलंदाजाकडे गोलंदाजीसाठी पुन्हा दिला जातो. जेव्हा तो रन अप घेण्यास चालू करतो तेव्हाच चेंडू पून्हा जिवंत झाला असे मानले जाते. फलंदाजांनी आपल्या जागा बदलल्या तरीही षटक पूर्ण होईपर्यंत गोलंदाज एकाच बाजूला गोलंदाजी करू शकतो.[१६]

फलंदाज बाद न होता, त्याच्या डावामधून स्वतःच्या इच्छेने निवृत्त होऊ शकतो.

बाद झालेल्या फलंदाज तात्काळ मैदानातून बाहेर जातो, आणि त्याची जागा त्याच्याच संघातील दुसरा फलंदाज घेतो. मात्र, यष्ट्या पडल्या किंवा झेल घेतला गेला, तरीही फलंदाज प्रत्यक्षात जोपर्यंत क्षेत्ररक्षण करणारा संघ पंचांकडे निर्णयासाठी दाद मागत नाही, तोपर्यंत बाद होत नाही . पंचांकडे दाद मागण्यासाठी गोलंदाज परंपरागत "How's that" (हाऊज दॅट) किंवा "Howzat" (हाऊझॅट) म्हणून दाद मागतात. (अनेकदा जरी फलंदाज अपीलाची गरज न वाटता मैदानातून निघून जातात). काही सामन्यांमध्ये, विशेषतः कसोटी सामन्यांमध्ये कोणताही संघ डीआरएस वापरून तिसऱ्या पंचा'कडे दाद मागण्याची विनंती करतात. तो टीव्ही रिप्ले तसेच हॉक-आय, हॉट-स्पॉट आणि स्निकोमीटर ह्यांच्या साहाय्याने निर्णय देतो.

गोलंदाजाने सहा वेळा चेंडू फेकल्यानंतर त्याचे षटक पूर्ण होते, त्याच्या जागी त्याच्या संघातील दुसरा नियुक्त गोलंदाज गोलंदाजी करतो, आणि आधीचा गोलंदाज क्षेत्ररक्षकाचे स्थान घेतो. फलंदाज आपल्याच स्थानावर राहतात, आणि नवीन गोलंदाज दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करण्यात सुररुत करतो, त्यामुळे स्ट्रायकर आणि नॉन-स्ट्रायकर यांच्या भूमिका विरुद्ध होतात. यष्टिरक्षक आणि दोन्ही पंच नेहमी आपली स्थाने बदलतात आणि अनेक क्षेत्ररक्षकसुद्धा तसे करतात आणि खेळ पुढे सुरू राहतो. एका डावात गोलंदाज एकापेक्षा जास्त षटके टाकू शकतो, परंतु त्याला दोन षटके सलग टाकण्याची मुभा नसते.

डाव तेव्हा संपतो जेव्हा फलंदाज करणाऱ्या संघाचे ११ पैकी १० फलंदाज बाद होतात (सर्वबाद – एक फलंदाज मात्र नेहमी "नाबाद" राहतो), किंवा निर्धारित षटके खेळून पूर्ण होतात, किंवा फलंदाजी करणारा संघ त्यांचा डाव पुरेशा धावा असल्याने घोषित करतो.

सामन्याच्या स्वरूपावरून डाव आणि षटकांची संख्या ठरते. मर्यादित षटके नसलेल्या सामन्यात पंच, ठराविक वेळेपर्यंत सामना चालू ठेवण्या ऐवजी (दुसऱ्या संघाने वेळ वाया घालवू नये साठी) दिवसाच्या शेवटच्या सत्रात किती षटके टाकली जावे हे ठरवतात.

सर्व डाव पूर्ण झाल्यानंतर सामना संपतो. अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे किंवा खराब वातावरणामुळे पंच एखादा सामना थांबवू शकतात. परंतु बहुधा सामना तेव्हा संपतो जेव्हा एक संघ त्याचा एक किंवा दोन्ही डाव पूर्ण करतो, आणि दुसऱ्या संघाकडे त्यांच्यापेक्षा जास्त धावा असतात. चार-डावांच्या सामन्यामध्ये शेवटच्या संघाला कधीकधी दुसरा डाव खेळण्याचीही गरज नसते, तेव्हा सदर संघाने डावाने विजय मिळवला असे म्हणतात. जर विजेत्या संघाचा डाव पूर्ण झाला नसेल, आणि अजूनही उदाहरणार्थ पाच फलंदाज नाबाद आहेत किंवा त्यांनी फलंदाजीच केलेली नाही तर असा संघ "पाच गडी राखून विजयी" मानला जातो. जर शेवटी फलंदाजी करणारा संघ सर्वबाद झाला आणि दुसऱ्या संघापेक्षा ५० धावा कमी करू शकला, तर विजेता संघ "५० धावांनी विजयी" झाला असे म्हटले जाते. दोन्ही संघांचे डाव पूर्ण झाले आणि त्यांच्या धावासुद्धा समान असतील तर अशा दुर्मिळ वेळी बरोबरी झाली असे म्हणतात.

जे सामने मर्यादित षटकांचे नसतात, ते सामने अनिर्णित राहण्याचीही शक्यता असते. बहुधा सामन्याची वेळ संपते परंतु कमी धावा असलेल्या संघाचे काही फलंदाज बाद होणे अजूनही बाकी असते तेव्हा सामना अनिर्णितावस्थेत संपतो. ह्याचा सरळ प्रभाव पडतो तो संघांच्या डावपेचांवर. जेव्हा संघाने पुरेशा धावा जमवलेल्या असतात आणि प्रतिस्पर्धी संघाला बाद करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे अशी आशा असते, तेव्हा तो संघ डाव घोषित करतो. त्यांना सामना अनिर्णित होणे टाळायचे असते. परंतु ह्यामध्ये दुसरा संघ पुरेशा धावा करून विजय मिळवण्याचा धोकासुद्धा असतो.

धावपट्टी, यष्टी आणि क्रिज

मुख्य पाने: खेळपट्टी, विकेट, व पॉपिंग क्रिज

खेळण्याची जागा

क्रिकेट मैदानाचा नमुना.

क्रिकेटचा खेळ गवताळ क्रिकेट मैदानावर खेळला जातो.[१७] क्रिकेटच्या नियमांमध्ये मैदानाचा ठराविक आकार किंवा मापाबद्दल निर्देश नाहीत,[१८] परंतु, बहुधा ते लंबगोलाकार असते. मैदानाच्या मधोमध एक आयताकार पट्टी असते, जी खेळपट्टी म्हणून ओळखली जाते.[१७]

खेळपट्टीचा सपाट पृष्ठभाग १० फूट (३.० मी) रुंद असतो. खेळपट्टीवर असलेले लहान गवत जसजसा सामना पुढे जातो तसतसे कमी होत जाते. त्याचप्रमाणे क्रिकेट मॅट सारख्या कृत्रिम पृष्ठभागावर सुद्धा खेळले जाऊ शकते. खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना, २२ यार्ड (२० मी) अंतरावर, लाकडी लक्ष्य ठेवलेले असते, ज्याला विकेट असे म्हणतात. गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी हे एक लक्ष्य असते आणि फलंदाजी करणारा संघ, धावा जमवण्यासाठी विकेटचे रक्षण करतो.

यष्टी, बेल्स आणि क्रिज

तीन यष्ट्या असलेली विकेट. ही मैदानामध्ये ठोकली जाते आणि त्याच्या वरती दोन बेल्स (विट्ट्या) ठेवल्या जातात.

खेळपट्टीवरील प्रत्येक विकेटमध्ये एका सरळ रेषेत उभ्या केलेल्या तीन लाकडी यष्ट्यांचा समावेश असतो. त्यांच्या डोक्यावरती दोन लाकडी बेल्स ठेवल्या जातात; बेल्स धरून विकेटची एकूण उंची २८.५ इंच (७२० मिमी) असते आणि तीन यष्ट्यांची, त्यांच्या मधील छोटी जागा धरून एकूण रुंदी असते ९ इंच (२३० मिमी).

दोन्ही बाजूच्या विकेटच्या सभोवती चार रेघांनी आखलेल्या क्षेत्राला क्रिज असे म्हणतात, हे फलंदाजासाठी "सुरक्षित क्षेत्र" असते आणि ते गोलंदाजीची मर्यादा निश्चित करते. ह्यांना "पॉपिंग" (किंवा फलंदाजी) क्रिज, गोलंदाजी क्रिज आणि दोन "परतीचे (रिटर्न)" क्रिज असे म्हणतात.

यष्ट्या गोलंदाजी क्रिजच्या रेषेत अशा प्रकारे ठेवलेल्या असतात ज्यायोगे दोन टोकांच्या गोलंदाजी क्रिजमधील अंतर २२ यार्ड (२० मी) असेल. गोलंदाजी क्रीज ८ फूट ८ इंच (२.६४ मी) लांब असते, आणि मधली यष्टी अगदी मधोमध उभा केलेला असतो. पॉपिंग क्रिजची लांबीसुद्धा तितकीच असते, आणि ती गोलंदजी क्रिजला समांतर आणि यष्ट्यांच्या समोर ४ फूट (१.२ मी) अंतरावर आखलेली असते. परतीची किंवा रिटर्न क्रिज इतर दोन क्रिजच्या काटकोनात असते; त्या पॉपिंग क्रिजच्या दोन्ही शेवटाला चिकटून असतात आणि गोलंदाजी क्रिजच्या टोकांना जोडून कमीत ८ फूट (२.४ मी) मापाच्या असतात.

गोलंदाजीवेळी चेंडू सोडताना गोलंदाजाचा मागचा पाय दोन क्रिजच्यामध्ये आणि पुढच्या पायाचा किमान थोडासा भाग पॉपिंग क्रिजच्या आत असणे गरजेचे असते. गोलंदाजाने हा नियम मोडल्यास पंच तो चेंडू "नो बॉल" ठरवतात, आणि फलंदाजी संघाला एक अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त चेंडू बहाल केला जातो.

फलंदाजाच्या दृष्टीने पॉपिंग क्रिजचे महत्त्व असे आहे की, त्यामुळे त्याच्या सुरक्षित क्षेत्राची मर्यादा स्पष्ट होते. तो त्याच्या "क्रिजच्या बाहेर" असल्यास यष्टिचीत किंवा धावचीत होऊ शकतो.

बॅट आणि चेंडू

तीन भिन्न प्रकारचे क्रिकेट चेंडू:
  1. वापरलेला सफेद चेंडू. सफेद चेंडू मुख्यत्वे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वापरला जातो, विशेषतः सामने प्रकाशझोतात रात्री खेळवले जातात तेव्हा. (डावीकडे).
  2. वापरलेला लाल चेंडू. लाल चेंडू कसोटी क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेट आणि इतर काही क्रिकेट प्रकारांमध्ये वापरला जातो. (मध्य).
  3. वापरलेला गुलाबी चेंडू. गुलाबी चेंडू अलीकडच्या काळात प्रकाशझोतात खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी वापरला जाऊ लागला आले. (उजवीकडे).
तीनही चेंडू सारख्याच आकाराचे आहेत.

खेळाचे मुख्य सार आहे, गोलंदाज खेळपट्टीवरील त्याच्या बाजूने दुसऱ्या बाजूला बॅट घेऊन "स्ट्राईकवर" असलेल्या फलंदाजाकडे गोलंदाजी करतो.

बॅट ही (बहुधा सफेद विलो वृक्षाच्या) लाकडापासून बनवली जाते आणि ज्याचा आकार वर गोलाकार दांडा जोडलेल्या पात्यासारखा असतो. पात्याची रुंदी कमाल ४.२५ इंच (१०८ मिमी) इतकी तर एकूण लांबी कमाल ३८ इंच (९७० मिमी) इतकी असते.

चेंडू हा शिवण असलेला जाड कातड्याचा आणि गोलाकार असतो, ज्याचा घेर ९ इंच (२३० मिमी) इतका असतो. ९० मैल प्रति तास (१४० किमी/ता) पर्यंत वेग असलेल्या चेंडूच्या टणकपणा हा चिंतेचा विषय असतो. त्यापासून बचाव करण्यासाठी फलंदाज विविध संरक्षक साधने वापरतात, जसे पॅड्स (नडगी आणि गुडघे यांच्या संरक्षणासाठी), फलंदाजी ग्लोव्हज् हातांसाठी, हेल्मेट डोक्याच्या संरक्षणासाठी आणि बॉक्स पॅंटच्या आतमध्ये (गुप्त भागाच्या संरक्षणासाठी). काही फलंदाज शर्ट आणि पॅंटच्या आतमध्ये जास्तीचे पॅड्स वापरतात जसे मांडीचे पॅड्ज, हाताचे पॅड्ज, बरगडी रक्षक आणि खांद्याचे पॅड्ज. चेंडूला "शिवण" असते: चेंडूचे कातडी आवरण, दोरी आणि आतील कॉर्कला जोडण्यासाठी टाक्यांच्या सहा ओळी असतात. नवीन चेंडूवरील शिवण ही व्यवस्थित दिसते त्यामुळे जास्त अंदाज येऊ न देता चेंडू पुढे टाकण्यास गोलंदाजाला मदत होते. क्रिकेट सामना सुरू असताता, चेंडूची गुणवत्ता इतकी खालावत जाते की एका क्षणी तो न वापरता येण्याजोगासुद्धा होतो आणि ह्या दरम्यान चेंडूची हालचाल बदलत जाते, आणि त्याचा प्रभाव सामन्यावर पडतो. त्यामुळे खेळाडू चेंडूचे भौतिक गुणधर्म बदलून त्याचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला लकाकी आणणे आणि घामाने किंवा थुंकीने तो ओला करणे वैध आहे. कधी कधी चेंडू स्विंग करण्यासाठी जाणूनबुजून एकाच बाजूला चकाकीसुद्धा आणता येते, परंतु चेंडूवर आणखी कोणती गोष्ट घासणे, चेंडूच्या आवरणावर ओरखाडणे किंवा चेंडूची शिवण उसवणे हे अवैध आहे.

पंच आणि स्कोअरकीपर

मुख्य पाने: पंच (क्रिकेट) व स्कोअरकीपर
पंच

मैदानावरील खेळाच्या नियमनाची कामगिरी दोन पंच पाहतात. त्यामधील एक गोलंदाजी टोकाकडे विकेटच्या मागे उभा राहतो, आणि दुसरा "स्क्वेअर लेग" स्थानावर उभा असतो, हे स्थान "स्ट्राईक"वर असलेल्या फलंदाजाच्या १५-२० मीटरवर असते. पंचांचे मुख्य काम असते ते विविध बाबींवर निर्णय देण्याचे. जसे चेंडू योग्य रितीने टाकला गेला आहे का (तो नो किंवा वाईड नाही), जेव्हा धाव काढली जाते, आणि फलंदाज बाद झाला आहे की नाही (ह्यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने पंचांकडे बहुधा हाऊज दॅट म्हणून अपील करणे गरजेचे असते). मध्यांतर केव्हा होईल हे सुद्धा पंच निश्चित करतात. तसेच खेळण्यासाठी परिस्थिती योग्य आहे किंवा नाही आणि खेळाडूंसाठी ओलसर खेळपट्टी किंवा अपुरा सुर्यप्रकाश ह्या सारख्या घातक परिस्थितीमध्ये खेळ थांबवणे किंवा रद्द करणे हे सुद्धा पंचांच्या हातात असते.

मैदानाबाहेर आणि ज्या सामन्याचे दूरचित्रवाणीवर प्रक्षेपण होते, त्या सामन्यामध्ये बहुधा तिसरा पंच असतो. ज्या निर्णयांसाठी ध्वनीचित्रफितीच्या (व्हीडिओ) पुराव्याची गरज असते अशा वेळी ते निर्णय घेतात. संपूर्ण आयसीसी सदस्य असलेल्या दोन संघांमधील आंतरराष्ट्रीय कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यात तिसरे पंच असणे अनिवार्य आहे. ह्या सामन्यांमध्ये सामनाधिकारीसुद्धा असतात. खेळ क्रिकेटच्या नियमांनुसार चालू आहे का हे पाहणे त्यांचे काम असते.

धावा आणि सामन्याच्या इतर तपशीलाची माहिती ठेवणे, हे दोन अधिकृत (प्रत्येक संघाचे प्रतिनिधीत्व करणारा एक) स्कोअरकीपरचे काम असते. पंचांनी हातांनी केलेल्या निर्देशांनुसार स्कोअरकीपर आपले काम करतात. जसे पंच तर्जनी वर करून फलंदाज बाद असल्याचे दर्शवतात; दोन्ही हात वर करून ते फलंदाजाने षट्कार मारल्याचे दाखवतात. क्रिकेटच्या नियमांनुसार धावांच्या नोंदणीकरता स्कोअरकीपर असणे गरजेचे आहे; धावांच्या मोजणीशिवाय ते खेळासंबंधित लक्षणीय प्रमाणात अतिरिक्त तपशीलसुद्धा नोंदवतात.

डाव

डाव (एक किंवा अनेक) ही फलंदाजी संघाच्या सामूहिक कामगिरीसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे.[१९] काहीवेळा फलंदाजी संघाचे सर्व अकरा सदस्य फलंदाजी करू शकतात, परंतु विविध कारणांमुळे ते सर्वच जण तसे करू शकत नाहीत. प्रत्येक संघ एक किंवा दोन डाव खेळेल हे सामन्याच्या प्रकारावरून ठरते.

गोलंदाजाचे मुख्य लक्ष्य हे, क्षेत्ररक्षकांच्या मदतीने फलंदाजांना बाद करणे हे असते. फलंदाज जेव्हा बाद होतो, तेव्हा "आऊट" म्हणतात, म्हणजेच त्याला मैदाना सोडावे लागते आणि त्याची जागा त्याच्या संघातील दुसरा फलंदाज घेतो. जेव्हा सर्वच्या सर्व दहा फलंदाज बाद होतात, तेव्हा सर्व संघ बाद होतो आणि डाव संपतो. शेवटच्या बाद न झालेल्या फलंदाजाला, एकट्याने फलंदाजी चालू ठेवण्यास परवानगी नसते, त्यासाठी कमीत कमी दोन फलंदाज मैदानात असणे गरजेचे असते. ह्या फलंदाजाला "नाबाद" असे म्हणतात.

डाव लवकर संपण्याची तीन कारणे असू शकतात: फलंदाजी संघाच्या कर्णधाराने डाव "घोषित" केल्यास, फलंदाजी संघाने त्यांचे लक्ष्य गाठून सामना जिंकल्यास, किंवा खराब हवामानामुळे किंवा वेळ संपल्याने सामना संपल्यास. ह्या सर्व परिस्थितीमध्ये कमीत कमी दोन फलंदाज "नाबाद" राहून डाव संपतो. ह्याला अपवाद एकच, जेव्हा एखादा गडी बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानावर येण्याआधी डाव घोषित झाल्यास.

मर्यादित षटकांच्या सामन्यात, दोन फलंदाज "नाबाद" असतील, परंतु शेवटचे निर्धारित षटक टाकून झाले असल्यास डाव संपतो.

षटके

मुख्य पान: षटक (क्रिकेट)

गोलंदाज एकामागोमाग एक असा सहा वेळा चेंडू फेकतो, सहा चेंडूंच्या ह्या संचाला षटक असे म्हणतात. इंग्रजीमध्ये षटकाला Over असे म्हणतात कारण सहा चेंडू फेकून झाल्यानंतर पंच "Over!" असे म्हणतात. एक षटक पूर्ण झाल्यानंतर खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने त्याच संघातील दुसरा गोलंदाज षटकाची सुरुवात करतो, तसेच क्षेत्ररक्षणाच्या बाजू सुद्धा बदलल्या जातात, परंतु फलंदाज आपापल्या जागीच राहतात. एकच गोलंदाज लागोपाठ दोन षटके टाकू शकत नाही, परंतु तो गोलंदाज एकाच बाजूने एक वगळून एक अशी अनेक षटके टाकू शकतो. षटक पूर्ण झाल्यानंतर फलंदाज आपली जागा बदलत नाही त्यामुळे पुढच्या षटकामध्ये स्ट्रायकर फलंदाज आपोआप नॉन-स्ट्रायकरच्या भूमिकेत जातो आणि तसेच उलटपक्षी होते. (कधीकधी दोघांपैकी एक फलंदाज दुसऱ्यापेक्षा फलंदाजीत बलशाली असतो, तेव्हा तो शेवटच्या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो पुढच्या षटकामध्ये "स्ट्राईक"वर राहू शकेल.) षटक संपल्यानंतर पंच सुद्धा आपल्या जागा बदलतात त्यामुळे स्क्वेअर लेगजवळील पंच आता नॉनस्ट्राईकरच्या टोकाला विकेटच्या मागे उभा राहतो आणि त्याची जागा नॉनस्ट्राईकरवरचा दुसरा पंच घेतो.

कसोटी क्रिकेट मध्ये एक गोलंदाज कितीही षटके टाकू शकतो तर मर्यादित षटकांच्या सामन्यात, प्रत्येक गोलंदाज टाकू शकणाऱ्या षटकांवरसुद्धा मर्यादा असते.

संघ रचना

प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात. खेळाडूच्या प्राथमिक कौशल्यावरून त्या खेळाडूला तज्ञ फलंदाज किंवा गोलंदाज म्हटले जाते. एका संतुलित संघात बहुधा पाच किंवा सहा तज्ज्ञ फलंदाज आणि चार किंवा पाच तज्ज्ञ गोलंदाज असतात. क्षेत्रक्षणाच्या विशिष्ट आणि महत्त्वाच्या जागेमुळे प्रत्येक संघात एक तज्ज्ञ यष्टिरक्षक असतो. प्रत्येक संघाचे नेतृत्व एक कर्णधार करतो. फलंदाजीची क्रमवारी निश्चित करणे, क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवणे, गोलंदाज बदलणे, खेळाची रणनीती ठरवणे ही कर्णधाराची जबाबदारी असते.

जो खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी ह्या दोन्हीत पारंगत असतो त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणतात. जो क्रिकेटपटू फलंदाजी आणि यष्टिरक्षणामध्ये पारंगत असतो त्याला "यष्टिरक्षक फलंदाज", आणि काही वेळा अष्टपैलूसुद्धा म्हटले जाते. खरे अष्टपैलू अभावानेच आढळतात कारण बहुतेक खेळाडू हे एकतर फलंदाजीवर किंवा गोलदाजीवरच लक्ष केंद्रित करतात.

गोलंदाजी

पाकिस्तानचा तेजगती गोलंदाज शोएब अख्तर, ह्याच्या नावावर सर्वात जलद ताशी १६१.३ किमी वेगाने चेंडू फेकण्याचा विक्रम आहे.[२०]
मुख्य पान: गोलंदाजी

गोलंदाज "धाव किंवा रन-अप" घेऊन आपल्या गोलंदाजी क्रीस पर्यंत पोहोचतो. काही गोलंदाज अगदी मंद गतीने गोलंदाजी करतात त्यामुळे त्यांना चेंडूफेक करण्याआधी अगदी थोडे अंतर धावावे लागते. तेज गोलंदाजांना चेंडू वेगाने टाकण्यासाठी जास्त मोठी आणि जोरात धाव घ्यावी लागते.

बहुधा गोलंदाज चेंडूचा टप्पा खेळपट्टीवर टाकतो ज्यामुळे चेंडू उसळून फलंदाजाकडे जावा. गोलंदाजी करतांना पाय नेहमी पॉपिंग क्रिझच्या आत रहाणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला नो-बॉल म्हणतात. ह्या शिवाय टाकलेला चेंडू फलंदाजाच्या आवाक्यात टाकणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला वाईड चेंडू म्हणतात. वाईड अथवानो चेंडु टाकल्या नंतर फलंदाजी करणारया संघास १ अतिरिक्त धाव मिळते व त्याच बरोबर १ अतिरिक्त चेंडू देखील टाकावा लागतो.

गोलंदाजाचा मुख्य उद्देश बळी घेणे असतो. गोलंदाजाचा दुसरा उद्देश कमीत कमी धावा देणे असतो.

तेजगती गोलंदाज ९० मैल प्रति तास (१४० किमी/ता) पेक्षा जास्त गतीने गोलंदाजी करतात आणि काही वेळा ते फलंदाजाला पराभूत करण्यासाठी केवळ वेगावर अवलंबून राहतात, कारण वेगाने आलेल्या चेंडूला प्रतिसाद देण्यासाठी फलंदाकडे फारच कमी वेळ असतो. तर काही तेजगती गोलंदाज वेळ आणि कपट या दोहोंचे मिश्रण करत गोलंदाजी करतात. काही गोलंदाज चेंडू हवेत वळविण्यासाठी (स्विंग) चेंडूच्या शिवणीचा वापर करतात. ह्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजाला फसवून चेंडू टोलवण्याच्या टायमिंग मध्ये गल्लत करण्यास भाग पाडू शकते, ज्यामुळे बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या किंवा स्लीप मधील फलंदाजाच्या हातात जावू शकतो किंवा यष्ट्यांवर आदळून फलंदाज बाद होऊ शकतो.

दुसऱ्या प्रकारच्या गोलंदाजीला "फिरकी" गोलंदाजी म्हणतात. ज्यामध्ये गोलंदाज तुलनेने कमी वेगात गोलंदाजी करतो आणि चेंडू वळवून गोलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न करतो. फलंदाजाला अशा गोलंदाजीपासून खूप सावध राहावे लागते. कारण सहसा असे चेंडू बरेचदा त्याच्या अपेक्षेप्रमाणे बॅटवर येत नाहीत आणि तो जाळ्यात अडकून बाद होण्याची शक्यता असते.

जलद आणि फिरकी गोलंदाजांच्या मध्ये असतात ते "मध्यमगती गोलंदाज" जे सक्तीने अचूकतेवर अवलंबून असतात. धावांच्या गतीला चाप बसवणे आणि फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचा ह्यांचा मुख्य हेतू असतो.

सर्व गोलंदाज त्यांच्या शैलीनुसार विभागले जातात. क्रिकेटच्या परिभाषेप्रमाणेच ही वर्गवारीसुद्धा अतिशय गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे, गोलंदाज LF म्हणजेच डावखुरा जलदगती किंवा LBG म्हणजेच उजव्या हाताने "लेग ब्रेक" आणि "गुगली" टाकणारा गोलंदाज आहे असे म्हटले जाते.

गोलंदाजीच्या शैलीमध्ये गोलंदाज कोपर कोणत्याही कोनातून वाकवू शकतो, पण अगदी सरळ ठेवू शकत नाही. जर गोलंदाजाने बेकायदेशीरपणे कोपर सरळ केले तर स्क्वेअर लेग जवळचे पंच तो चेंडू नो-बॉल ठरवू शकतात: ह्याला चेंडू "फेकणे" असे म्हणतात, आणि तो उघडकीस आणणे कठीण असते. सध्याच्या नियमांप्रमाणे गोलंदाज कोपर जास्तीत जास्त १५ अंश कोनात वाकवू शकतात.

क्षेत्ररक्षण

उजखोऱ्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षकांची स्थाने

क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील सर्वच्या सर्व अकरा खेळाडू एकत्रच मैदानावर उतरतात. त्यातील एक जण यष्टिरक्षक असतो जो स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाच्या विकेटच्या मागे उभा राहतो. यष्टिरक्षण हे बहुधा तज्ज्ञाचे काम असते आणि त्याचे तो मुख्यत्वे फलंदाजाने न टोलवलेले चेंडू पकडतो, जेणेकरून बाईजमुळे अवांतर धावा जाणार नाहीत. तो खास बनवलेले ग्लोव्ह्ज वापरतो (क्षेत्ररक्षकांपैकी फक्त यष्टिरक्षकच ग्लोव्ह्ज वापरू शकतो), गुप्त भागावर बॉक्स, आणि पायांवर पॅड्स वापरतो. तो एकमेव क्षेत्ररक्षक असा असतो जो फलंदाजाला यष्टिचीत करू शकतो.

सध्या गोलंदाजी करीत असलेल्या गोलंदाजाव्यतिरिक्त, इतर नऊ फलंदाज एका रणनीतीनुसार कर्णधार, मैदानावर विविध ठिकाणी उभे करतो.

क्षेत्ररक्षकांपैकी कर्णधार हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असतो. तो त्याने ठरवलेल्या रणनीतीनुसार कोण (आणि कशी) गोलंदाजी करेल हे ठरवतो; आणि गोलंदाजाच्या सल्ल्यानुसार क्षेत्ररक्षक योग्य ठिकाणी लावण्याची जबाबदारी त्याचीच असते.

क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये, जर क्षेत्ररक्षकाला दुखापत झाली किंवा तो आजारी पडला तर त्याच्याऐवजी बदली खेळाडू घेण्याची परवानगी असते. सदर बदली खेळाडूला गोलंदाजी किंवा यष्टिरक्षण करण्याची मुभा नसते, तसेच तो कर्णधाराची भूमिका पार पाडू शकत नाही. दुखापतग्रस्त खेळाडू मैदानावर पुन्हा उतरण्यासाठी तंदरुस्त झाल्यास बदली खेळाडूला मैदान सोडावे लागते.

फलंदाजी

मुख्य पान: फलंदाजी
इंग्लिश क्रिकेटपटू डब्लू. जी. ग्रेस १८८३ मध्ये फलंदाजीसाठी तयार होताना. त्याचे पॅड्स आणि बॅट हे आता वापरात असलेल्याशी जवळपास एकसारखे आहेत. ग्लोव्ह्जमध्ये काही सुधारणा झाल्या आहेत. बरेच नवे फलंदाज अनेक संरक्षक साधने वापरतात.

कोणत्याही एका वेळी, मैदानावर दोन फलंदाज असतात. विकेट्स सुरक्षित करण्यासाठी आणि धावा काढण्यासाठी एक फलंदाज स्ट्राईकवर असतो. त्याचा साथीदार, जेथून गोलंदाजी केली जाते तेथे नॉन-स्ट्राईकवर असतो.

अनिवार्य नसले तरीही, बहुधा प्रशिक्षकांच्या सल्ल्याने संघाचा कर्णधार फलंदाजीची क्रमवारी ठरवतो. ठरलेल्या क्रमवारीनुसर फलंदाज फलंदाजीस मैदानात उतरतात. पहिले दोन फलंदाज–"सलामीवीर"–बहुधा नव्या ताज्या दमाच्या वेगवान गोलंदाजांच्या प्रतिकूल चेंडूचा सामना करतात. संघातील सक्षम फलंदाज बहुधा वरच्या क्रमांकावर फलंदाजीस उतरतात, आणि संघातील गोलंदाज–जे विशेषतः कमी क्षमतेचे फलंदाज असतात (अपवाद वगळता)–शेवटी फलंदाजीस उतरतात. सुरुवातीला जाहीर केलेली फलंदाजी क्रमवारी अनिवार्य नसते; जेव्हा गडी बाद होतो, तेव्हा फलंदाजी न केलेला फलंदाज मैदानावर फलंदाजीसाठी उतरतो.

जर फलंदाज "निवृत्त" झाला (बहुधा दुखापतीमुळे) आणि पुन्हा फलंदाजीस उतरला नाही, तर तो "नाबाद" समजला जातो आणि बाद झालेल्या फलंदाजांमध्ये मोजला जात नाही, परंतु त्याचा डाव संपला असल्यामुळे तो बाद असतो. बदली फलंदाजाची परवानगी नसते.

एक तज्ञ फलंदाज अनेक "फटके" किंवा "स्ट्रोक" बचावात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही परिस्थितीमध्ये वापरतो. त्याचा मुख्य उद्देश असतो तो बॅटच्या सपाट पृष्ठभागाने (ब्लेड) चेंडू व्यवस्थित टोलविणे. चेंडूने बॅटची कडा घेतली तर त्याला "edge" असे म्हणतात. फलंदाज नेहमीच चेंडू जोराने टोलावण्याचा प्रयत्न करत नाही. एक चांगला फलंदाज मनगट वळवून आणि फक्त चेंडू अडवून अशा ठिकाणी दिशा देतो जेथे क्षेत्ररक्षक नसतील आणि धाव घेण्यास पुरेसा वेळ मिळेल.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज व्हिक्टर ट्रंपर, ड्राइव्ह करण्यासाठी पुढे येताना

क्रिकेटमध्ये फटक्यांची मोठी विविधता आहे. ज्या मध्ये स्विंग करण्याची शैली आणि दिशेनुसार अनेक नावे आहेत: उदा., "कट", "ड्राइव्ह", "हूक", "पुल".

जर चेंडू यष्ट्यांवर आदळणार नसेल आणि धावा करण्याची सुद्धा संधी नसेल; अशा वेळी फलंदाजाला फटका खेळण्याची गरज नासते, तो चेंडू यष्टिरक्षकाकडे जाण्यासाठी सोडून देवू शकतो. त्याच प्रमाणे, चेंडू बॅटवर लागल्यानंतर त्याने धाव काढण्याचा प्रयत्न करायलाच हवा असेही नाही. त्याप्रमाणे तो चेंडू अडविण्यासाठी त्याच्या पायाचासुद्धा वापर करू शकतो, परंतु हे धोकादायक सुद्धा होऊ शकते कारण त्यामुळे फलंदाज पायचीत होण्याची शक्यता असते.

पूर्वी, फलंदाजाला दुखापत झाल्यास आणि तो धावा धावण्यासाठी तंदुरुस्त नसल्यास, फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार फलंदाजाला धावक (रनर) घेण्यास परवानगी देवू शकत असे. क्षमता नसलेल्या फलंदाजाऐवजी धावा करणे हे धावकाचे एकमेव काम असे, आणि त्याला फलंदाजासारखाच वेश परिधान करणे आणि साधने वापरणे आवश्यक असे. ह्याचा गैरवापर होत आहे असे वाटल्या मुळे २०११ पासून आयसीसीने धावकाच्या वापरावर बंदी लादली.[२१]

धावा

मुख्य पान: धाव (क्रिकेट)
भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०००० धावा करणारा एकमेव खेळाडू आहे.[२२] कसोटी क्रिकेटमध्ये १४,००० धावांपर्यंत पोहोचण्यासाठी फटका मारताना वरील चित्रात तो दिसत आहे. २०१० मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करत होता.
उजखोरा फलंदाज, फलंदाजी करताना चेंडू ज्या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न करतो. डावखोऱ्या फलंदाजासाठी ह्याच चित्राचे प्रतिबिंब असेल.

स्ट्राईकवर असलेला फलंदाज (म्हणजेच "स्ट्रायकर") चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून वाचवतो, आणि धावा करण्यासाठी चेंडू बॅटने अशा प्रकारे टोलवतो जेणेकरून क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवून परत करण्याआधी त्याच्याकडे आणि त्याच्या साथीदाराकडे खेळपट्टीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे धावण्यासाठी पुरेसा वेळ असेल. धावेची नोंद होण्यासाठी दोन्ही फलंदाजांच्या हातातील बॅट किंवा शरीराचा एखादा भाग क्रिजमध्ये असावा लागतो. (फलंदाज धावताना त्यांची बॅट घेऊनच धावतात). प्रत्येक पूर्ण धाव धावसंख्येमध्ये भर घालते.

चेंडू एकदा टोलवून एकापेक्षा जास्त धावा करणे शक्य असते: एक ते तीन धावांइतके फटके जास्त मारले जातात, परंतु मैदानाच्या आकारामुळे चार किंवा जास्त धावा करणे अवघड असते. ही उणीव भरून काढण्यासाठी, चेंडू जमिनीला लागून किंवा टप्पे पडून सीमारेषेपर्यंत टोलवल्यास चार धावा (चौकार) दिल्या जातात आणि चेंडू बॅटला लागून जमिनीवर टप्पा न पडता सीमारेषेपार पोहोचल्यास सहा धावा (याला षट्कार म्हणतात) दिल्या जातात. ह्या वेळी फलंदाजांनी धाव घेणे गरजेचे नसते.

कसोटी आणि प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा फलंदाज, ब्रायन लाराच्या नावावर आहे.

पाच धावांचे फटके फार दुर्मिळ असतात, त्यासाठी बहुधा क्षेत्ररक्षक चेंडू परत करत असताना झालेल्या "ओव्हरथ्रो" वर अवलंबून रहावे लागते. स्ट्रायकरने विषम अंकी धावा काढल्यास दोन्ही फलंदाज आपापल्या बाजू बदलतात, त्यामुळे नॉन-स्ट्राइकर फलंदाज आता स्ट्रायकर होतो. फक्त स्ट्रायकर फलंदाज वैयक्तिक धावा करून शकतो, परंतु सर्व धावा संघाच्या धावसंख्येत मोजल्या जातात.

धाव घेण्याचा निर्णय बहुधा चेंडू कोणत्या कोठे गेला आहे हे व्यवस्थित पाहू शकणारा फलंदाज घेतो. त्यावेळी तो बहुधा, "येस", "नो" आणि "वेट" अशा अर्थाचे संदेश देतो.

धाव घेणे हा एक मोजूनमापून पत्करलेला धोकाच असतो कारण जर फलंदाज क्रिजध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर फलंदाज धावचीत होऊ शकतो.

संघाची धावसंख्येचा अहवाल ही केलेल्या धावा आणि बाद झालेले फलंदाज अशा प्रकारे दिला जातो. उदाहरणार्थ, जर पाच फलंदाज बाद झाले आणि संघाची धावसंख्या २२४ धावा असेल, तर २२४ धावांवर ५ गडी बाद असे म्हटले जाते. (ह्याचा थोडक्यात "पाच बाद २२४" असे म्हटले जाते आणि २२४/५ किंवा ५/२२४ असे लिहिले जाते).

अतिरिक्त धावा

क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांनी केलेल्या चुकांमुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला वाढीव धावा मिळतात त्यांना अवांतर धावा असे म्हणतात.खालील चार प्रकारे ह्या धावा दिल्या जातात:

  1. नो बॉल: नियम मोडण्याच्या दोन प्रसंगांमध्ये गोलंदाजाला एका अवांतर धावेचा दंड केला जातो (अ) हातांची चुकीची हालचाल करून चेंडू फेकणे; (ब) पॉपिंग क्रिजच्या पुढे जाऊन गोलंदाजी करणे (ओव्हरस्टेपिंग); (क) रिटर्न क्रिज़च्या बाहेर पाय राहणे. ह्या दंडात्मक धावेशिवाय, गोलंदाजाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये, गोलंदाजी करणाऱ्या संघाने क्षेत्ररक्षणाच्या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास तो चेंडूनो बॉल ठरवला जातो. खेळाच्या लहान प्रकारात (२०-२०, एकदिवसीय) फ्री-हिटचा नियम केला गेला आहे. पुढच्या पायाच्या नो-बॉलनंतरचा चेंडू हा फलंदाजासाठी फ्री-हिट असतो. ह्या चेंडूवर फलंदाजाला धावचीत सोडून इतर कोणत्याही प्रकाराने बाद होण्याची भीती नसते.
  2. वाईड: गोलंदाजाने फलंदाजाच्या कक्षेबाहेर चेंडू टाकल्यास एक अतिरिक्त धाव दिली जाते; नो-बॉल प्रमाणेच वाईड बॉल टाकल्यास गोलंदाजाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. वाईड चेंडू जर सीमारेषेपार गेला, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा दिल्या जातात (वाईडसाठी एक आणि सीमारेषेपार चेंडू गेल्यामुळे चार).
  3. बाय: फलंदाज चेंडू खेळू शकला नाही आणि चेंडू यष्टिरक्षकाजवळून मागे निघून गेला आणि फलंदाजाला धावा काढण्यासाठी वेळ मिळाला तर अवांतर धाव दिली जाते (बायमुळे मिळणाऱ्या धावांना प्रतिबंध करणे हा चांगल्या यष्टिरक्षकाचा एक गुण असतो).
  4. लेग बाय: चेंडू टोलावण्याचा प्रयत्न करताना, फलंदाजाच्या बॅटला न लागता शरीराच्या इतर कोणत्याही भागाला लागून फलंदाजाला धावा काढण्यासाठी वेळ मिळाल्यास अतिरिक्त धावा दिल्या जातात.

गोलंदाजानेनो किंवा वाईड बॉल टाकल्यास, त्याच्या संघाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो आणि त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला अशा जास्तीच्या चेंडूवर अधिक धावा करण्याची संधी मिळते. बाय आणि लेग बाय ह्या चेंडूंवर धावा करण्यासाठी फलंदाजाला धावावे लागते (जर, चेंडू सीमारेषेपार गेला नाही तर) परंतु ह्या धावा फलंदाजाच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये मोजल्या न जाता, संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये मोजल्या जातात.

बाद

मुख्य पान: बाद (क्रिकेट)

फलंदाज बाद होण्याचे एकूण ११ मार्ग आहेत: त्यापैकी पाच प्रकार हे सामान्य आहेत तर सहा अगदी दुर्मिळ. सामान्यतः बाद होण्याचे प्रकार आहेत "त्रिफळाचीत", "झेलबाद", "पायचीत" (lbw), "धावचीत", आणि (काहीश्या कमी वेळा) "यष्टिचीत". दुर्मिळ प्रकार आहेत "हिट विकेट", "चेंडू दोन वेळा टोलावणे", "क्षेत्ररक्षणात अडथळा", "चेंडू हाताळणे " आणि "टाईम्ड आउट" हे व्यवसायिक खेळांत जवळजवळ अज्ञात आहेत. अकरावा प्रकार – रिटायर्ड आउट – हा मैदानावरील बाद होण्यातला नसून उलट ज्यासाठी कोणत्याही क्षेत्ररक्षकाला श्रेय दिले जात नाही.

बाद होण्याची पद्धत जर स्पष्ट असेल (उदाहरणार्थ "त्रिफळाचीत" आणि बऱ्याचवेळा "झेलबाद") तर फलंदाज पंचांनी त्याला बाद देण्याची वाट न पाहता स्वेच्छेने मैदान सोडून बाहेर जातो. अन्यथा पंचांनी फलंदाजाला बाद देण्यासाठी, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने (बहुधा गोलंदाजाने), पंचांकडे "अपील" करणे गरजेचे असते. यासाठी ते "हाऊज दॅट?" किंवा संक्षिप्त स्वरूपात "हाऊझॅट?" असे विचारतात (किंवा ओरडतात). जर पंचांना अपील मान्य असेल तर पंच तर्जनी वर करून "आऊट!" असे म्हणतात. नाहीतर डोके नकारार्थी हलवून "नॉट आऊट" म्हणजेच नाबाद असे म्हणतात. जेव्हा फलंदाज बाद झाल्याचा दाव अस्पष्ट असतो तेव्हा बहुधा जोरदार अपील केले जाते. अशी वेळ बहुदा पायचीत, धावचीत किंवा यष्टिचीत प्रकारामध्ये येते.

  1. झेल: जेव्हा फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक जमिनीला लागण्याच्या आधी पकडतो तेव्हा त्या बाद होण्याच्या प्रकाराला झेलबाद म्हणतात.झेलबादाचे श्रेय गोलंदाज व क्षेत्ररक्षक दोघांनाही दिले जाते.[२३]
  2. त्रिफळाचीत: जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या टोकावरील यष्टींना लागतो आणि कमीत कमी एक बेल जागेवरून खाली पडते, तेव्हा त्याला त्रिफळाचीत म्हणतात. जर चेंडू यष्टींना लागला परंतु बेल पडल्या नाहीत तर फलंदाज नाबाद ठरतो. गोलंदाजाला ह्या बळीचे श्रेय दिले जाते.[२४]
  3. पायचीत (lbw): जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू बॅटला किंवा बॅट धरलेल्या हाताला न लागता फलंदाजाच्या पायावर, पॅड्जवर किंवा शरीरावर आदळतो तेव्हा पंच चेंडू यष्टींवर आदळला असता की नाही हे ठरवून फलंदाजाला बाद देऊ शकतो. हा नियम मुख्यतः फलंदाजाला चेंडू बॅटऐवजी पायाने किंवा शरीराने अडवण्यापासून परावृत्त करण्यासाठी आहे. पायचीत होण्यासाठी, चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या बाहेर पडणे किंवा फलंदाजाला लेग-स्टंपच्या रेषेबाहेर लागणे अपेक्षित नसते. तो ऑफ-यष्टीच्या बाहेर पडल्यास हरकत नसते.[२५]
  4. धावचीत: जेव्हा जवळचा फलंदाज त्याच्या क्रिजमध्ये नसेल, तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूने जर चेंडू मारून यष्टी उडवली तर त्याला धावचीत म्हणतात. ह्यासाठी चेंडू अचूकपणे यष्ट्यांवर मारावा लागतो, किंवा फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना, बहुधा तो यष्टिरक्षक किंवा यष्टीजवळच्या क्षेत्ररक्षकाकडे फेकावा लागतो. फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात नसताना देखील "धावचीत" होवू शकतो; तो फक्त त्याच्या क्रिजबाहेर असणे गरजेचे असते.[२६]
  5. यष्टिचीत: चेंडू खेळतांना जेव्हा फलंदाज क्रिजच्या बाहेर जातो, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि चेंडू त्याला चकवून यष्टिरक्षकाच्या हातात जातो तेव्हा यष्टिरक्षक त्याची यष्टी उडवतो तेव्हा, बाद होण्याच्या प्रकाराला यष्टिचीत म्हणतात.[२७] गोलंदाज व यष्टीरक्षकाला ह्या बळीचे श्रेय दिले जाते. नो बॉल वर फलंदाज धावचीत होवू शकतो परंतु यष्टिचीत होऊ शकत नाही.
  6. हिट विकेट: चेंडू खेळत असताना किंवा नुकत्याच टोलावलेल्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना, जर फलंदाजाने किंवा फलंदाजाने घातलेल्या कपडे, उपकरणे, बॅटने त्रिफळ्याला धक्का लागून त्यावरील बेल्स खाली पडल्या तर फलंदाज बाद होतो.[२८]
  7. चेंडू दोन वेळा टोलावणे: हा प्रकार खूप दुर्लभ असून, धोकादायक खेळ आणि क्षेत्ररक्षकांचे संरक्षण करण्याच्या हेतूने सुरक्षा उपाय म्हणून अंमलात आणला गेला. कायदेशीररित्या जर चेंडू खेळल्यानंतर, यष्ट्यांवर जात असेल तरच फलंदाज दुसऱ्यांदा चेंडू अडवू शकतो. बाकीवेळा फलंदाजाला बाद ठरवले जाते.[२९]
  8. क्षेत्ररक्षणात अडथळा: हा सुद्धा एक दुर्लभ प्रकार आहे. जर फलंदाजाने मुद्दामच क्षेत्ररक्षकास अडथळा निर्माण केला (शारिरिकदृष्ट्या किंवा तोंडी) तर फलंदाजाला बाद दिले जाऊ शकते.[३०]
  9. चेंडू हाताळणे: फलंदाज हेतुपुरस्सर विकेट वाचवण्यासाठी चेंडूला हात लावू शकत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, की जेव्हा फलंदाजाने बॅट पकडलेली असते तेव्हा त्याचे ग्लोव्हज किंवा हात हे बॅटचा भाग असतात, त्यामुळे चेंडू ग्लोव्हजला लागून थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेल्यास फलंदाज झेलबाद होतो.[३१]
  10. टाईम्ड आऊट: एक फलंदाज बाद झाल्यावर दुसऱ्या फलंदाजाला त्याची जागा घेण्यासाठी साधारण तीन मिनिटे दिली जातात. जर तीन मिनिटात पुढच्या फलंदाजाने आपली खेळी सुरू नाही केली तर त्याला टाईम्ड आउट बाद घोषित केले जाते व त्याच्या पुढील फलंदाजाला मैदानात उतरण्याची संधी देण्यात येते. ह्या बळीचे श्रेय कोणालाही दिले जात नाही..[३२]
  11. रिटायर्ड आउट: पंचांच्या परवानगीशिवाय एखादा फलंदाज बाद होण्याआधी निवृत्त होऊ शकतो, त्याला रिटायर्ड आऊट दिले जाते.[३३]

बहुतेक प्रकरणांमध्ये जेव्हा फलंदाज बाद होतो, तेव्हा तो स्ट्रायकर असतो. जर नॉन-स्ट्रायकर बाद झाला तर तो बहुधा धावचीत किंवा क्षेत्ररक्षणाला अडथळा निर्माण केल्याने, चेंडू हाताळल्याने आणि टाईम्ड आऊट होऊ शकतो.

बाद झालेला नसतानाही फलंदाज मैदान सोडून जाऊ शकतो. जर फलंदाजाला दुखापत झाली किंवा तो आजारी पडला, तर तो तात्पुरता निवृत्त होतो आणि त्याच्याऐवजी दुसरा फलंदाज फलंदाजीला येतो. हे रिटायर्ड हर्ट किंवा रिटायर्ड इल म्हणून नोंदवले जाते. निवृत्त झालेला फलंदाज नाबाद असतो आणि जर तो बरा झाला तर पुन्हा फलंदाजी करू शकतो. दुखापत झालेली नसतानाही फलंदाज निवृत्त झाल्यास त्याला रिटायर्ड आऊट म्हणून बाद दिले जाते; कोणाही खेळाडूला ह्याचे श्रेय दिले जात नाही. कोणताही फलंदाज नो बॉलवर त्रिफळाचीत, झेलबाद, पायचीत, यष्टिचीत किंवा हिट विकेट ह्या प्रकारांनी बाद होऊ शकत नाही. तसेच वाईड चेंडूवर तो त्रिफळाचीत, झेलबाद, पायचीत, किंवा चेंडू दोन वेळा टोलावणे ह्या प्रकारांनी बाद होवू शकत नाही. यापैकी काही प्रकारांमध्ये गोलंदाजाने चेंडू टाकलेला नसतानाही फलंदाज बाद होऊ शकतो. स्ट्राईकवर नसलेला फलंदाज जर चेंडू टाकण्याआधी क्रिजच्या बाहेर गेला तर, गोलंदाज त्याला धावचीत करू शकतो, आणि फलंदाज क्षेत्ररक्षणात अडथळा आणि रिटायर्ड आऊट या पद्धतीने केव्हाही बाद होऊ शकतो. टाईम्ड आऊट हा प्रकार नैसर्गिगरीत्याच चेंडू न टाकता बाद होण्याचा असतो. बाकी सर्व प्रकारांमध्ये चेंडू टाकला गेल्यानंतरच फलंदाज बाद दिला जातो.

डावाचा शेवट

मुख्य पान: डावाचा शेवट (क्रिकेट)

एखाद्या डावाचा शेवट खालील प्रसंगी होतो:

  1. अकरा पैकी दहा फलंदाज बाद झाले; ह्याला संघ "सर्वबाद" झाला असे म्हणतात
  2. संघातील फलंदाजी करू शकणारा फक्त एकच फलंदाज खेळण्यासाठी बाकी राहिला, एक किंवा जास्त फलंदाज दुखापतीमुळे खेळण्यासाठी उपलब्ध नसतील; ह्यावेळी सुद्धा, संघ "सर्वबाद" झाला असे म्हणतात
  3. शेवटी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण झाल्या
  4. निर्धारित षटके टाकून झाली (एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, बहुधा ५० आणि ट्वेंटी२० सामन्यात २० षटके)
  5. कर्णधाराने दोन किंवा जास्त फलंदाज नाबाद असतानाही डाव घोषित केला (हे सहसा एकदिवसीय सामन्यात लागू होत नाही)

निकाल

मुख्य पान: निकाल (क्रिकेट)

जर शेवटी फलंदाजी करणारा संघ त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी धावा करून सर्वबाद झाला, तर तो संघ " क्ष धावांनी पराभूत" झाला असे म्हणतात. (येथे क्ष म्हणजे दोन्ही संघांच्या धावांमधील फरक). जर शेवटी फलंदाजी करणाऱ्या संघाने विजयासाठी आवश्यक धावा केल्या, तर त्यास " क्ष गडी राखून विजयी" असे म्हणतात, जेथे क्ष म्हणजे इतके गडी बाद झाले नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या संघाने प्रतिस्पर्ध्याची धावसंख्या पार करताना फक्त सहा गडी गमावले तर तो संघ "चार गडी राखून विजयी" झाला असे म्हणतात.

प्रत्येकी दोन डावांच्या सामन्यात, एका संघाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावाच्या एकत्र धावा ह्या, दुसऱ्या संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा कमी असून शकतात. अशा वेळी जास्त धावसंख्या असणारा संघ एक डाव आणि क्ष धावांनी विजयी झाला असे म्हणतात, आणि त्या संघाला पुन्हा फलंदाजी करण्याची गरज नसते. येथे क्ष म्हणजे दोन्ही संघांच्या एकून धावांमधील फरक असतो.

जर शेवटी फलंदाजी करणारा संघ सर्वबाद झाला, आणि दोन्ही संघांच्या धावा समान असतील, तर सामना बरोबरीत सुटला असे म्हणतात; हा निकाल दोन डावांच्या सामन्यात खूपच दूर्मिळ असा आहे. खेळाच्या पारंपारिक प्रकारात, जर सामन्यासाठी नेमून दिलेली वेळ कोणत्याही एका संघाने विजय मिळविण्याआधी संपली तर तो सामना अनिर्णित म्हणून घोषित केला जातो.

जर सामना प्रत्येकी एका डावाचा असेल, तर बहुधा प्रत्येक डावात टाकली जाणारी षटके निर्धारित केली जातात. ह्या सामन्यांना "मर्यादित षटकांचे" किंवा "एकदिवसीय" सामने म्हणतात, आणि बाद झालेले गडी विचारात न घेता, जास्त धावा करणारा संघ विजयी घोषित केला जातो, त्यामुळे सामना अनिर्णित राहण्याची शक्यता नसते. जर अशा प्रकारचा सामना खराब हावामानामुळे काही काळ स्थगित झाला तर एका जटिल गणिती सूत्राने, ज्याला डकवर्थ-लुईस पद्धत असे म्हणतात, एक नवे लक्ष्य संघासमोर ठेवले जाते. जर आधीच मान्य केलेली षटके कोणत्याही संघाने पूर्ण केली नाहीत, आणि पाऊस किंवा खराब हवामानामुळे खेळ पूर्ववत सुरू होऊ शकला नाही तर असा एकदिवसीय सामनासुद्धा "निकाल नाही" म्हणून घोषित केला जाऊ शकतो.

क्रिकेट सामन्यांचे प्रकार

क्रिकेट हा एक बहुआयामी खेळ आहे, ज्यामध्ये अनेक प्रकार, खेळाचे विविध मानक आणि भूमिकांचे स्तर आणि सामना किती वेळ चालावा यासाठीची वेळ ह्यांचा समावेश होतो. व्यावसायिक क्रिकेटमध्ये दोन मुख्य प्रकार आहेत, वेळेनुसार मर्यादित ज्यामध्ये प्रत्येक संघाला एकावेळी एक ह्याप्रमाणे दोन डाव मिळतात आणि दुसरा आहे षटकांनुसार मर्यादित ज्यामध्ये प्रत्येक संघाला एक डावात मर्यादित षटके खेळावयास मिळतात. पहिल्या प्रकाराला प्रथम श्रेणी क्रिकेट असे म्हणतात, हे सामने तीन ते पाच दिवसाचे खेळवले जातात ("अमर्याद वेळेच्या" सामन्यांची उदाहरणे देखील आहेत); आणि दुसरा प्रकार आहे मर्यादित षटकांचे क्रिकेट कारण ह्या प्रकारात प्रत्येक संघाला ५० किंवा २० षटके गोलंदाजी करावी लागते, आणि ह्या सामन्यांचा कालावधी हा केवळ एका दिवसाचा असतो (खराब हवामान किंवा इतर कारणांमुळे सामन्याची वेळ वाढवली जावू शकते.).

विशेषतः, दोन-डावांच्या सामन्यांमध्ये खेळण्याची वेळ दर दिवशी कमीत कमी सहा तास इतकी असते. मर्यादित षटकांचे सामने बहुधा सहा तास किंवा जास्तवेळ चालतात. प्रत्येक दिवशी औपचारिकरित्या बहुधा काही अंतराने जेवणासाठी आणि चहासाठी, तसेच अनौपचारिकपणे लहानसा विराम पेयांसाठी घेतला जातो.नवोदित क्रिकेटपटूंना एका दिवसापेक्षा जास्त चालणाऱ्या सामन्यांमध्ये क्वचित खेळतात; ह्यांची विभागणी ढोबळमानाने दोन प्रकारांमध्ये केली जाते, डाव घोषित करता येण्याजोगे सामने, ज्यात निर्धारित जास्तीत जास्त वेळ किंवा सामन्याची निर्धारित एकूण षटके आणि फलंदाजी करणाऱ्या संघ सर्वबाद झाला किंवा त्यांनी डाव घोषित केला; आणि मर्यादित षटकांचे सामने, ज्यामध्ये प्रत्येक संघाच्या डावासाठी षटके निर्धारित केली जातात. ज्यामध्ये ३० ते ६० षटकांचे आणि लोकप्रिय अशा २० षटकांच्या प्रकाराचा समावेश होतो. क्रिकेटच्या इतर प्रकारांमध्ये इनडोअर क्रिकेट आणि गार्डन क्रिकेट हे अतिशय लोकप्रिय आहेत.

ऐतिहासिकदृष्ट्या, सिंगल विकेट क्रिकेट हा प्रकार खूपच यशस्वी ठरला आणि १८ व १९व्या शतकातील ह्यांचे सामने हे महत्त्वाचे सामने म्हणून पात्र ठरलेले आहेत. ह्या प्रकारामध्ये, प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात, आणि एका वेळी एकच फलंदाज मैदानावर असतो आणि त्याचा डाव संपेपर्यंत त्यालाच प्रत्येक चेंडूंचा सामना करावा लागतो. मर्यादित षटकांचे सामने सुरू झाल्यापासून सिंगल विकेट फारच कमी खेळला जातो.

कसोटी क्रिकेट

मुख्य लेख: कसोटी क्रिकेट
जानेवारी २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दरम्यानचा कसोटी सामना. काळ्या रंगाची विजार घातलेले पंच दिसत आहेत. कसोटी क्रिकेट, प्रथम श्रेणी क्रिकेट आणि क्लब क्रिकेट ह्या तिन्ही प्रकारांमध्ये पारंपारिकरित्या सफेद गणवेश आणि लाला चेंडू वापरला जातो.

कसोटी क्रिकेट हा प्रथम श्रेणी क्रिकेटचा सर्वोच्च स्तर आहे. कसोटी सामने हे आयसीसीसचे पूर्ण सभासद असलेल्या देशांच्या संघांदरम्यान खेळवले जाणारे आंतरराष्ट्रीय सामने असतात.

"कसोटी सामने" हा वाक्प्रचार खूप नंतर वापरात आला असला तरीही, १८७६-७७ ऑस्ट्रेलिया क्रिकेट मोसमात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्या संघांदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले गेल्याचे मानले जाते. त्यानंतर आणखी आठ संघांनी कसोटीचा दर्जा प्राप्त केला: दक्षिण आफ्रिका (१८८९), वेस्ट इंडीज (१९२८), न्यूझीलंड (१९२९), भारत (१९३२), पाकिस्तान (१९५२), श्रीलंका (१९८२), झिम्बाब्वे (१९९२-२००६, २०११-२०१९)[३४][३५], बांगलादेश (२०००), अफगाणिस्तान (२०१७) आणि आयर्लंड (२०१७)

वेल्सचे खेळाडू इंग्लंडकडून खेळण्यास पात्र आहेत, परिणामतः तो इंग्लंड आणि वेल्स संघ आहे. तसेच वेस्ट इंडीज संघात कॅरेबियन बेटांवरील अनेक राज्यांचे खेळाडू आहेत, ज्यात मुख्यत: बार्बाडोस, गुयाना, जमैका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, लीवर्ड बेटे आणि विंडवर्ड बेटे यांचा समावेश होतो.

दोन संघांदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांना "मालिका" असे म्हणतात. कसोटी सामना पाच दिवसांपर्यंत चालतो आणि एका मालिकेत साधारणत: तीन ते पाच सामने असतात. निर्धारित वेळेत जे कसोटी सामने पूर्ण होत नाहीत ते अनिर्णित म्हटले जातात. कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये सामना अनिर्णित राहण्याच्या शक्यतेमुळे शेवटी फलंदाजी करणारा आणि खूप मागे असणारा संघ बचावात्मक पावित्रा घेऊन सामना वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रतिस्पर्ध्याला जिंकण्याची लहानशी सुद्धा संधी देण्यापासून परावृत्त होतो.[३६]

१८८२ पासून, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या जास्तीत जास्त कसोटी मालिका द ॲशेस चषकासाठी खेळवल्या गेल्या. त्याशिवाय इतर चषकांसाठी खेळवल्या गेलेल्या द्विदेशीय मालिकांमध्ये पुढील मालिकांचा समावेश होतो. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दरम्यान विस्डेन चषक, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज दरम्यान फ्रॅंक वोरेल चषक, भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावसकर चषक ह्यांचा समावेश होतो.

मर्यादित षटके

वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू सर व्हिव्ह रिचर्ड्सला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाज मानले जाते.

ऱ्यारथम श्रेणी कंट्री क्लब्स दरम्यान १९६३ च्या मोसमात खेळवल्या गेलेल्या नॉकआऊट चषक स्वरूपात मर्यादित षटकांचे क्रिकेट सुरू झाले. १९६९ मध्ये राष्ट्रीय लीग स्पर्धा सुरू करण्यात आल्या. ही संकल्पना हळूहळू क्रिकेट खेळणाऱ्या इतर अग्रगणी देशांमध्ये रुजली गेली आणि पहिला मर्यादित षटकांचा आंतरराष्ट्रीय सामना १९७१ मध्ये खेळवला गेला. १९७५ साली, पहिली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली गेली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेक नवनवीन संकल्पना आणल्या गेल्या ज्यामध्ये रंगीबेरंगी किट आणि सफेद चेंडूने खेळवले जाणारे प्रकाशझोतातील सामने ह्यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्रास खेळला जाणारा प्रकार म्हणजे "एकदिवसीय सामना". हा सामना बहुधा एका दिवसात संपतो म्हणून त्याला तसे नाव दिले गेले आहे. एखाद्या सामन्यान खराब हवामानामुळे व्यत्यय आल्यास किंवा तो पुढे ढकलला गेल्यास दुसऱ्या दिवशी पुढे खेळवला जावू शकतो. मर्यादित षटकांच्या सामन्याचा मुख्य उद्देश म्हणजे परंपरागत अनिर्णितावस्थेत सामना न संपता निश्चित निकाल लावणे हा आहे. परंतु जर धावा एकसमान झाल्या तर सामना बरोबरीत सुटतो किंवा खराब हवामानामुळे सामना अनिर्णितावस्थेत संपू शकतो. प्रत्येक संघ एक डाव खेळतो आणि त्यांना निर्धारित षटकांना तोंड द्यावे लागते, बहुधा जास्तीत जास्त ५०. क्रिकेट विश्वचषक एकदिवसीय प्रकाराने खेळला जातो आणि २०१५चा मागील विश्वचषक हा सह-यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. पुढील विश्वचषक २०१९ मध्ये इंग्लंड आणि वेल्स मध्ये खेळवला जाईल.

ट्वेंटी२० हा मर्यादित षटकांचा नवीन प्रकार असून ह्याचा मुख्य उद्देश सामना अंदाजे तीन तासात पूर्ण करणे हा असून, तो बहुधा सायंकाळच्या सत्रात खेळवला जातो. २००३ मध्ये जेव्हा ही संकल्पना इंग्लंडमध्ये उदयास आली तेव्हा त्याचा उद्देश हा कामगारांची संध्याकाळच्या वेळात करमणूक व्हावी हा होता. हा प्रकार व्यावसायिकदृष्ट्या खूपच यशस्वी झाला आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरुवात झाली. पहिली ट्वेंटी२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा २००७ मध्ये सुरू झाली आणि भारतीय संघाने ह्या स्पर्धेत विजय मिळवला. त्यामागोमागच्या स्पर्धा पाकिस्तान (२००९), इंग्लंड (२०१०), वेस्ट इंडीज (२०१२), श्रीलंका (२०१४) आणि वेस्ट इंडीज (२०१६) ह्या संघांनी जिंकल्या. पहिल्या आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२० स्पर्धेनंतर अनेट स्थानिक ट्वेंटी२० स्पर्धांचा जन्म झाला. ह्यातील सर्वात पहिली होती भारतीय क्रिकेट लीग जी एक बंडखोर लीग मानली गेली कारण ह्या स्पर्धेला बीसीसीआयने मान्यता दिली नव्हती. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय प्रीमियर लीग नावाची स्वतःची एक वेगळी अधिकृत स्पर्धा सुरू केली. अधिकृत स्पर्धा खूपच यशस्वी झाली आणि ती आता दरवर्षी भरवली जाते. ज्यामध्ये जगभरातून अनेक खेळाडू आणि प्रेक्षक सहभागी होतात. याउलट भारतीय क्रिकेट लीग बंद करण्यात आली. भारतीय प्रीमियर लीगच्या यशानंतर जगभरात अनेक ठिकाणी स्थानिक स्पर्धा सुरू झाल्या. अलीकडे सुरू झालेल्या २०-२० चॅंपियन्स लीग स्पर्धेत विविध देशातील स्थानिक क्लबचे संघ सहभागी होतात. ह्या स्पर्धेत वरिष्ठ क्रिकेट संघ असलेल्या देशांतील अग्रमानांकीत स्थानिक संघ एकमेकांविरुद्ध लढतात.

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब १८७५ मध्ये. १८९३ मध्ये काउंटी चॅंपियनशीपचे पहिले विजेतेपद ह्या संघाला मिळाले.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटचा अंतर्भाव होतो. ही संज्ञा बहुधा आयसीसीचे पूर्ण सभासद असलेल्या देशांच्या सर्वात वरच्या पातळीवरील स्थानिक क्रिकेटशी संदर्भात वापरली जाते, परंतु याला अपवाद आहेत. इंग्लंडमधील प्रथम श्रेणी क्रिकेटचा बहुतांशी भाग हा काउंटी अजिंक्यपद स्पर्धा खेळणाऱ्या १८ काउंटी क्लब्जद्वारा खेळला जातो. सदर संकल्पना ही १८व्या शतकापासून अस्तित्वात आहे परंतु स्पर्धेला अधिकृत दर्जा १८९० मध्ये देण्यात आला. ह्यातील सर्वात यशस्वी क्लब यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब हा आहे. त्यांनी मार्च २०१७ पर्यंत ३० विजेतेपदे मिळवली आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये राष्ट्रीय प्रथम श्रेणी स्पर्धा १८९२-९३ मध्ये शेफील्ड शील्डच्या रूपाने सुरू झाली. ऑस्ट्रेलियामधील प्रथम-श्रेणी संघ हे विविध राज्याचे प्रतिनिधित्व करतात. न्यू साउथ वेल्स संघाने २०१४ पर्यंत एकूण ४५ विजेतेपदे मिळवली आहे.

भारतात रणजी करंडक नावाने प्रथम-श्रेणी क्रिकेट स्पर्धा १९३४ मध्ये सुरू झाली. २०१६-१७च्या स्पर्धेत एकूण २८ संघ सहभागी झाले होते. २०१६-१७ पर्यंत ४१ विजेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ मुंबईचा होता.

ह्याशिवाय इतर ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा प्लंकेट शील्ड (न्यू झीलंड), करी चषक (दक्षिण आफ्रिका) आणि शेल चषक (वेस्ट इंडीज). ह्यापैकी काही स्पर्धा ह्या अलीकडेच अद्ययावत आणि नामांतरित केल्या गेल्या आहेत.

मर्यादित षटकांच्या स्थानिक स्पर्धेची सुरुवात १९६३ साली इंग्लंडमधील जिलेट चषक ह्या नॉकआऊट स्पर्धेने झाली. देश बहुधा नॉकआऊट आणि लीग ह्या दोन्ही स्वरूपात मर्यादित षटकांच्या हंगामी स्पर्धा आयोजित करतात. अलीकडच्या काळात, राष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धांचे आयोजन सुरू झाले आहे. त्या बहुधा नॉकआऊट प्रकारे खेळवल्या जातात आणि काही ह्या लहान स्वरूपातील साखळी स्पर्धा आहेत.

क्लब क्रिकेट

इंग्लंडमधील क्लब क्रिकेट सामन्याचा एक नमुना

क्लब क्रिकेट हा क्रिकेट खेळाचा प्रामुख्याने हौशी, पण तरीही औपचारिक अशी स्पर्धा आहे, ज्यात संघ बहुधा आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या खेळतात. जरी क्रिकेटचे नियम पाळले जात असले तरी ह्या प्रकारांमध्ये अनेक विविधता आहेत.

क्लब क्रिकेटमध्ये वारंवार साखळी किंवा चषक स्वरूपात स्पर्धा आयोजित केल्या जातात. सामने वेळ किंवा षटकांच्या माध्यमातून निर्धारित केले जातात. मर्यादित षटकांचे सामने बहुधा प्रत्येक डावात २० ते ६० षटकांपर्यंत सीमित असतात. वेळेनुसार निर्धारित सामने हे पारंपरिक असले तरीही कमी प्रमाणात खेळले जातात. सामना संध्याकाळचे काही तास ते दोन दिवस इतकावेळ चालणारा असू शकतो. आधुनिक नावीन्यपूर्ण स्वरूपाची स्पर्धा ट्वेंटी२० स्वरूपाची आहे, ज्यात सध्याच्या आणि नवीन अशा दोन्ही लीग स्पर्धांचा समावेश आहे.

खेळाच्या दर्जामध्ये अर्ध-व्यावसायिक ते कधीतरी एक मनोरंजन ह्यानुसार बदल होत राहतो आणि क्लब क्रिकेटचा आनंद एक स्पर्धात्मक सामाजिक घटक म्हणून घेतला जातो. अनेक क्लबचे पॅव्हिलियन किंवा क्लब हाऊस असलेले स्वतःचे मैदान असते, ज्यावर नियमितपणे खेळ खेळले जातात. काही क्लब हे भटके असतात जे इतर मैदाने वापरतात.

व्यावसायिकतेच्या विविध पातळ्यांवर जगभरात अनेक लीग स्थापन झाल्या आहेत, ज्यापैकी सर्वात जुनी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील बर्मिंगहॅम अँड डिस्ट्रीक्ट प्रीमियर लीग ही १८८८ मध्ये स्थापन झाली.

सामन्यांचे इतर प्रकारp

मुख्य लेख: क्रिकेटचे प्रकार
जेर्व्हिस बे, ऑस्ट्रेलिया येथील सुरू असलेला एक फ्रेंच क्रिकेट सामना

जगभरात क्रिकेट ह्या खेळाचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये इनडोअर क्रिकेट, फ्रेंच क्रिकेट, बीच क्रिकेट, क्विक क्रिकेट, त्याशिवाय क्रिकेटपासून प्रेरणा घेऊन तयार केले गेलेले सर्व प्रकारचे पत्त्यांचे खेळ व बोर्ड गेम्स यांचा समावेश होतो. उपलब्ध असलेली साधने किंवा सहभागी खेळाडूंना त्याचा आनंद घेता यावा आणि सोप्या पद्धतीने खेळता यावा ह्याकरता खेळाचे नियम एकसारखे बदलत असतात.

इनडोअर क्रिकेटचा शोध पहिल्यांदा १९७० साली लागला.[३७] हा बऱ्याच अंशी मैदानावर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटसारखाच आहे, फरक इतकार की येथे प्रत्येक संघात ६ खेळाडू असतात. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आणि अनेक स्वतंत्र लीग स्पर्धा असलेला हा प्रकार युनायटेड किंग्डम मध्ये अतिशय लोकप्रिय आहे. आणखी एक कमी खेळला जाणारा इनडोअर क्रिकेटचा प्रकार हा लहान जागेत, नरम चेंडूने आणि पॅड्जशिवाय खेळला जातो. हा प्रकार काही वर्षांनंतर शोधला गेला आणि तो जास्त करून दक्षिण गोलार्धात खेळला जातो. त्याशिवाय ह्या प्रकाराच्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धासुद्धा खेळवल्या जातात, ज्यामध्ये विश्वचषक स्पर्धेचासुद्धा समावेश होतो.

युके मध्ये, क्रिकेटचा गार्डन क्रिकेट प्रकार लोकप्रिय आहे. देशभरात हा खेळ प्रौढ आणि मुले उद्याने किंवा मैदानांवर खेळतात. ह्या खेळात क्रिकेट बॅट आणि चेंडूचा जरी वापर केला जात असला तरी पॅड किंवा ग्लोव्ह्जचा वापर होत नाही. खेळाचे नियम हे संघातील खेळाडू आणि जागेचा आकार ह्यानुसार बदलतात.

उपनगरीय यार्ड किंवा वाहनांसाठीच्या रस्त्यांवर कुटुंबातील सदस्य आणि युवक बॅकयार्ड क्रिकेट (गल्ली क्रिकेट) किंवा टेनिस बॉल क्रिकेट खेळतात आणि भारत व पाकिस्तानातील शहरांमध्ये त्यांच्या लांब अरुंद रस्त्यांवर मोजदाद ठेवता येणार नाहीत इतक्या प्रमाणात "गल्ली क्रिकेट" किंवा "टेप बॉल क्रिकेट" खेळले जाते. काही वेळा सुधारित नियम वापरले जातात: उदा. एक टप्पा पडलेला चेंडू एका क्षेत्ररक्षकाने हाताने झेलल्यास फलंदाज बाद होतो; किंवा जर कमी खेळाडू असतील तर सर्वजण आळीपाळीने गोलंदाजी आणि फलंदाजी करतात व इतर क्षेत्ररक्षण करतात. टेनिस चेंडू आणि घरच्या घरी तयार केलेल्या बॅट बहुधा वापरल्या जातात, आणि यष्टी म्हणून अनेक गोष्टी वापरल्या जातात.

क्विक क्रिकेटमध्ये, गोलंदाजाला गोलंदाजी करण्याआधी फलंदाज तयार होण्याची वाट पाहण्याची गरज नसते, त्यामुळे सामना खूप वेगात खेळला जातो, त्यामुळे त्याकडे लहान मुले आकर्षित होतात. हा प्रकार यूकेमध्ये शारीरिक शिक्षणाचा धडा म्हणून वापरला जातो. खेळाचा वेग अजून वाढविण्यासाठी आणि "टिप ॲन्ड रन" किंवा "टिप्सी रन" किंवा "टिप्पी-गो" यासारखे बदल केले जातात. याचा अर्थ चेंडूचा बॅटला चुकून किंवा जरासा स्पर्श झाला तरीही फलंदाजाला धाव घेणे गरजेचे असते. हा नियम, फलंदाजाचा चेंडूला अडवून धरण्याचा अधिकार काढून घेऊन सामना वेगात पुढे जावा या हेतूने केला जातो.

सामोआमध्ये क्रिकेटचा किलीकिटी प्रकार खेळला जातो, ज्यामध्ये हॉकी स्टिकच्या आकाराची बॅट वापरली जाते. मूळ इंग्लिश क्रिकेटमध्ये, हॉकी स्टिकऐवजी आधूनिक सरळ बॅट १७६० च्या सुमारास जेव्हा गोलंदाज चेंडू रोल किंवा घरंगळत टाकण्याऐवजी टप्पा टाकू लागले तेव्हापासून वापरात आली. एस्टोनियामध्ये हिवाळ्यात आईस क्रिकेट खेळण्यासाठी संघ एकत्र येतात. तेव्हा खेळ सामान्य उन्हाळी हवामानाऐवजी असह्य हिवाळी वातावरणात खेळला जातो. याखेरीज इतर नियम हे प्रत्येकी-सहा-खेळाडूंच्या प्रकारासारखेच असतात.

आंतरराष्ट्रीय रचना

आयसीसी सभासद देश. (सर्वोच्च स्तरावरील) कसोटी खेळणारे देश नारिंगी रंगात; सहयोगी सदस्य देश पिवळ्या रंगात; संलग्न सदस्य देश जांभळ्या रंगात दाखविले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती - क्रिकेटची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना असून, त्याचे मुख्यालय दुबई मध्ये आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश संस्थापक असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती १५ जून १९०९ रोजी लॉर्ड्स येथे इंपेरियल क्रिकेट परिषद म्हणून स्थापन झाली, त्यानंतर १९६५ मध्ये तिचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे झाले, आणि सध्याचे नाव १९८९ मध्ये घेतले गेले.

आयसीसीचे एकूण १०४ सदस्य आहेत: १० संपूर्ण सदस्य जे अधिकृत कसोटी सामने खेळू शकतात, २४ सहयोगी सदस्य, आणि ६० संलग्न सदस्य.[३८] क्रिकेट विश्वचषकासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजिन आणि शासन ह्यासाठी आयसीसीस जबाबदार असते. हीच समिती सर्व अधिकृत कसोटी सामने, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० सामन्यांसाठी पंच आणि सामनाधिकारी नियुक्त करते. प्रत्येक देशाची एक राष्ट्रीय क्रिकेट मंडळ असते, जे देशात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे नियमन करते. राष्ट्रीय संघाची निवड करणे तसेच मायदेशातील आणि परदेशातील दौऱ्यांचे आयोजन करणे ही जबाबदारीसुद्धा क्रिकेट मंडळाकडे असते. वेस्ट इंडीजमध्ये ही कामे चार राष्ट्रीय आणि दोन बहुराष्ट्रीय सदस्यांनी बनलेल्या वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळातर्फे केली जातात.

सदस्य

संपूर्ण सदस्य

संपूर्ण सदस्य हे देशातील किंवा सहयोगी देशातील क्रिकेट नियामक मंडळ असते. संपूर्ण सदस्य हे एका भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधी असू शकतात. सर्व संपूर्ण सदस्यांना अधिकृत कसोटी सामने खेळण्यासाठी एक संघ पाठवण्याची मुभा असते. त्याशिवाय, संपूर्ण सदस्य असलेल्या देश हे आपोआपच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यास पात्र असतात.[३९] वेस्ट इंडीज संघ कोणत्याही एका देशाचे प्रतिनिधीत्व करत नाही तर कॅरिबियन प्रदेशातील एकूण २० देश आणि प्रदेशांचा एकत्रित संघ आहे. तसेच इंग्लंड क्रिकेट संघ हा इंग्लंड आणि वेल्सचे प्रतिनिधित्व करतो.

क्रदेशप्रशासकीय संघटनाह्या तारखेपासून सदस्य [३९]सध्याची क्रमवारी
कसोटीएकदिवसीयटी२०
 इंग्लंडइंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ१५ जुलै १९०९
 ऑस्ट्रेलियाक्रिकेट ऑस्ट्रेलिया१५ जुलै १९०९
 झिम्बाब्वेझिम्बाब्वे क्रिकेट६ जुलै १९९२१०१११३
 दक्षिण आफ्रिकाक्रिकेट दक्षिण आफ्रिका१५ जुलै १९०९
 न्यूझीलंडन्यू झीलंड क्रिकेट३१ मे १९२६
 पाकिस्तानपाकिस्तान क्रिकेट मंडळ२८ जुलै १९५२
 बांगलादेशबांगलादेश क्रिकेट मंडळ२६ जून २०००१०
 भारतभारतीय क्रिकेट नियामक मंडळ३१ मे १९२६
 वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ३१ मे १९२६
१०  श्रीलंकाश्रीलंका क्रिकेट२१ जुलै १९८१

*१९ जुलै २०१७ पर्यंत अद्ययावत[४०]

Aमे १९६१ मध्ये निवृत्त, पुन्हा दाखल १० जुलै १९९१.

अव्वल सहयोगी आणि संलग्न सदस्य

सर्व सहयोगी आणि संलग्न सदस्य कसोटी क्रिकेट खेळण्यास पात्र नासतात, परंतु विश्व क्रिकेट लीगमधील त्यांच्या यशापयशावरून आयसीसी त्यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा देते. अव्वल सहा संघांना एकदिवसीय आणि ट्वेंटी२० दर्जा मिळतो, ज्यामुळे ते पूर्ण सभासद सदस्य देशांशी एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र ठरतात.सध्या एकदिवसीय आणि ट्वेंटी२० दर्जा असलेले सहयोगी आणि संलग्न संघ खालीलप्रमाणे आहेत.:

देशप्रशासकीय संघटनाह्या तारखेपासून सदस्यसध्याची एकदिवसीय क्रमवारी
 अफगाणिस्तानअफगाणिस्तान क्रिकेट मंडळ२००१[४१]१०
 कॅनडाक्रिकेट कॅनडा१९६८[३९]१६
 आयर्लंडक्रिकेट आयर्लंड१९९३[३९]११
 केन्याक्रिकेट केन्या१९८१[३९]१३
 नेदरलँड्सकोनिंक्लिज्के नेदरलॅंड्से क्रिकेट बॉंड१९९६[३९]१२
 स्कॉटलंडक्रिकेट स्कॉटलंड१९९४[३९]१५

विविध-खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेट

अजंता मेंडीस (श्री) आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामध्ये पहिल्यांदा सहा बळी घेणारा क्रिकेटपटू

१९०० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते, तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स दरम्यान एक दोन-दिवसीय सामना खेळवला गेला.[४२] १९९८ मध्ये, राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश केला गेला, ह्यावेळी सामने प्रत्येकी ५०-षटकांचे खेळले गेले. दिल्ली येथे पार पडलेल्या २०१० राष्ट्रकुल खेळांमध्ये ट्वेंटी२० क्रिकेट समाविष्ट करण्याचे विचाराधीन होते, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेटच्या लहान प्रकाराच्या बाजूने नव्हते, म्हणून ते ह्या खेळांत समाविष्ट केले गेले नाही.[४३]

क्वांगचौ, चीन मधील २०१० आशियाई खेळांमध्ये [४४] आणि इंचॉन, दक्षिण कोरिया येथील २०१४ आशियाई खेळांमध्ये क्रिकेट खेळवले गेले.[४५] भारताने दोन्ही वेळेस स्पर्धेत भाग घेतला नाही.[४६] यानंतर राष्ट्रकुल आणि ऑलिंपिक खेळांमध्ये क्रिकेट समाविष्ट करण्याबाबद पुन्हा विचारणा केली गेली. राष्ट्रकुल खेळ परिषदेने आयसीसीला २०१४ आणि २०१८ राष्ट्रकुल खेळांमध्ये भाग घेण्यासाठी विचारणा केली परंतु आयसीसीने त्यास नकार दिला.[४७] २०१० मध्ये, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने क्रिकेटला ऑलिंपिक खेळात सामावून घेण्याची मान्यता दिली,[४८] परंतु मुख्यतः बीसीसीआयच्या विरोधामुळे, २०१३ मध्ये आयसीसीने जाहीर केले की त्यांचा असा अर्ज करण्याची कोणतीही इच्छा नाही.[४९] ईएसपीएनच्या मते हा विरोध उत्पन्नाच्या होऊ शकणाऱ्या तोट्यामुळे होता. एप्रिल २०१६ मध्ये आयसीसचे मुख्य अध्यक्ष डेव्ह रिचर्डसन म्हणाले की, ट्वेंटी२० क्रिकेटला २०२४ ऑलिंपिक खेळात सामील होण्याची संधी आहे, परंतु आयसीसीच्या सदस्यांनी आणि विशेषकरून बीसीसीआयकडून आम्हाला खेळांमध्ये समाविष्ट होण्यासाठी पाठिंबा असणे आवश्यक आहे.[५०]

आकडेवारी

मुख्य लेख: क्रिकेट आकडेवारी

आयोजित क्रिकेटमध्ये इतर खळांपेक्षा मोठ्या प्रमाणावर आकडेवारी जमा केली जाते. प्रत्येक प्रकार वेगळा आहे आणि शक्य परिणाम हे तुलनेने लहान आहेत. व्यावसायिक स्तरावर, कसोटी, एकदिवसीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटच्या वेगवेगळ्या नोंदी ठेवल्या जातात. परंतु कसोटी क्रिकेट हा प्रथम श्रेणी क्रिकेटचाच एक प्रकार असल्याने खेळाडूंच्या प्रथम-श्रेणी आकडेवारीमध्ये कसोटी क्रिकेटचे आकडे मोजलेले असतात परंतु ह्याउलट तसे होत नाही. द गाईड टू क्रिकेट हे फ्रेड लिलीव्हाईट ह्याने संपादन केलेले क्रिकेट वार्षिक १८४९ ते त्याच्या मृत्यु १८६६ पर्यंत चालू होते. त्याला स्पर्धा म्हणून १८६४ साली इंग्लिश क्रिकेटपटू जॉन विस्डेन (१८२८-१८८४) ह्याने विस्डेन क्रिकेटर्स अल्मनाक सुरू केले. ते आजतागायत खंड न पडता दर वर्षी प्रकाशित होते. त्यामुळे ते इतिहासातील सर्वात जास्त चाललेले क्रिकेट वार्षिक आहे.

काही पारंपारिक आकडेवारी ही क्रिकेट चाहत्यांच्या परिचयाची आहे. मूलभूत फलंदाजी आकडेवारीमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:

  • डाव (I): फलंदाजाने प्रत्यक्षात फलंदाजी केलेले डाव.
  • नाबाद (NO): फलंदाजी केलेल्या डावांच्या शेवटापर्यंत फलंदाज नाबाद राहिला.
  • धावा (R): कारकिर्दीत काढलेल्या धावा.
  • सर्वोत्कृष्ट धावसंख्या (HS/Best): एका डावात फलंदाजाने काढलेल्या सर्वात जास्त धावा.
  • फलंदाजीची सरासरी (Ave): एकूण धावा आणि फलंदाज किती डावांमध्ये बाद झाला आहे, ह्याचा भागाकार. Ave = R/[I-NO]
  • शतके (100): कारकिर्दीतील १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केलेले डाव.
  • अर्धशतके (50): कारकिर्दीतील ५० ते ९९ पर्यंत धावा केलेले डाव. (शतके ही अर्धशतकांमध्ये मोजली जात नाहीत).
  • खेळलेले चेंडी (BF):नो बॉल धरून खेळलेले चेंडू (वाईड चेंडू मोजले जात नाहीत).
  • स्ट्राईक रेट (SR): प्रति १०० चेंडूंतील धावा. (SR = [100 * R]/BF)
  • धावगती (RR): षटकामागे फलंदाजाने (किंवा फलंदाजी करणाऱ्या संघाने) केलेल्या धावा.

मूलभूत गोलंदाजी आकडेवारीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • षटके (O): गोलंदाजाने गोलंदाजी केलेली षटके.
  • चेंडू (B): गोलंदाजाने गोलंदाजी केलेले चेंडू. पारंपरिकरित्या षटके मोजली जात असत, परंतु पूर्वीपासून एका षटकांमधील चेंडूंची संख्या बदलत राहिली आहे, त्यामुळे चेंडू मोजणे आकडेवारीच्या दृष्टीने जास्त उपयुक्त आहे.
  • निर्धाव षटके (M): गोलंदाजाने केलेली निर्धाव षटके (ज्या षटकांमध्ये एकही धाव दिली गेली नाही).
  • धावा (R): दिलेल्या धावा.
  • बळी (W): बाद केलेले गडी.
  • नो बॉल (Nb): टाकलेलेनो बॉल.
  • वाईड (Wd): टाकलेले वाईड बॉल.
  • गोलंदाजी सरासरी (Ave): प्रति बळी दिलेल्या धावा. (Ave = R/W)
  • स्ट्राईक रेट (SR): प्रति बळी टाकलेले चेंडू. (SR = B/W)
  • इकॉनॉमी रेट (Econ): प्रति षटक सरासरी धावा. (Econ = धावा/टाकलेली षटके).

धावफलक

हेसुद्धा पाहा: स्कोअरिंग (क्रिकेट)


सामन्याच्या आकडेवारीचा सारांश धावफलकावर मांडला जातो. धावफलकाच्या प्रसाराआधी, माणसे व्यवस्थित ठिकाणी बसून टॅली स्टीक वर खाचा करून धावा मोजत असत. सर्वात आधीचा ज्ञात धावफलक प्रॅट ह्या सेव्हनोक्स वाईन क्रिकेट क्लबचा स्कोररने १७७६ मध्ये छापला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याचा हा शोध सगळीकडे वापरला जाऊ लागला.[५१] १८४६ मध्ये पहिल्यांदाच धावफलक छापून लॉर्ड्सवर विकला गेला.[५२]

धावफलकाच्या परिचयामुळे प्रेक्षकांना दिवसभराच्या खेळाचा मागोवा ठेवण्यासाठी मदत होऊन क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल झाला. १८४८मध्ये, फ्रेड लिली व्हाईटने मैदानावर पोर्टेबल प्रिंटिंग प्रेस वापरून अद्ययावर धावफलकांची छपाई केली. १८५८ मध्ये, केनिंग्टन ओव्हलने पहिला मोबाईल स्कोअरबॉक्स वापरात आणला, "अ हाऊस ऑन रोलर्स विथ फिगर्स फॉर टेलिग्राफिंग ऑन ईच साईड". १८८१मध्ये, मेलबर्न क्रिकेट मैदानावर सर्वप्रथम धावफलक बसवण्यात आला. मैदानाच्या पश्चिमेकडे असलेल्या धावफलकावर फलंदाजाचे नाव आणि तो कसा बाद झाला हे दर्शवले जाते.[५१]

संस्कृती

दैनंदिन जीवनावरील प्रभाव

इनप्रॉम्प्टु गेम ऑफ क्रिकेट इन सिडनी, ऑस्ट्रेलिया

राष्ट्रकुलातील देश आणि इतर ठिकाणींच्या लोकप्रिय संस्कृतींवर क्रिकेटचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ह्या देशांच्या शब्दकोशांवरसुद्धा क्रिकेटचा प्रभाव दिसून येतो, विशेषतः इंग्रजी भाषेच्या. जसे पुढील काही वाक्प्रचार "दॅट्स नॉट क्रिकेट" (अनफेअर (अयोग्य)), "हॅड अ गुड इनिंग्ज", "स्टिकी विकेट", आणि "बोल्ड ओव्हर". तसेच क्रिकेटवरून बरेच चित्रपट तयार झाले आहेत. "ब्रॅडमन्स्क्यू" ही डॉन ब्रॅडमन यांच्या नावावरून रूढ झालेली संज्ञा, क्रिकेट आणि बाहेरील जगात उत्कृष्टतेसाठी वापरली जाते.[५३]

कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांतील व्यक्तींमुळे ह्या खेळाचा इतर ठिकाणी हौशी लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रसार झाला आहे.

कलांमध्ये आणि लोकप्रिय संस्कृतींमध्ये

हेसुद्धा पाहा: कल्पित साहित्यामध्ये क्रिकेट


विल्यम ब्लेक आणि जॉर्ज गॉर्डन बायरन ह्यासारख्या इंग्लिश कवींच्या काव्यामध्ये क्रिकेट हा एक विषय आहे.[५४] त्रिनिदादमधील लेखक सी.एल्.आर. जेम्स यांनी लिहिलेले पुस्तक बियॉंड अ बाऊंड्री (१९६३), हे खेळाच्या क्षेत्रात लिहीले गेलेले सर्वोत्कृष्ट मानले जाते.[५५] कल्पित साहित्यामध्ये इंग्लिश लेखक पी.जी. वुडहाऊस यांची १९०९ मधील कादंबरी, माईक नावाजलेली आहे.

व्हिज्युअल आर्टमधील, क्रिकेटच्या लक्षणीय चित्रांमध्ये अल्बर्ट शेव्हालियर टेलरचे केंट व्हर्सेस लॅंकाशायर ॲट कॅंटरबरी (१९०७) आणि रसेल ड्रायसडेलचे द क्रिकेटर (१९४८), हे "२० व्या शतकातील कदाचित सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्र असावे."[५६] फ्रेंच प्रभाववादी कामीय पिसारोने १८९० मधील इंग्लंडच्या क्रिकेट दौऱ्यांची चित्रे काढली होती.[५४] फ्रान्सिस बेकन, ह्या एका उत्सुक चाहत्याने एका मोशनमधील फलंदाजाचे चित्र काढले आहे.[५४] एक कॅरेबियन कलाकार वेंडी नाननची क्रिकेटची चित्रे [५७] १-३ मार्च २००७ रोजी पार पडलेल्या लंडन क्रिकेट कॉन्फरन्समध्ये रॉयल मेलच्या "वर्ल्ड ऑफ इन्व्हेन्शन" स्टॅम्पच्या मर्यादित संस्करणामध्ये समाविष्ट केली गेली होती.[५८]

त्याशिवाय ई,ए, स्पोर्ट्‌स क्रिकेट ०७ सारखे कित्येक क्रिकेट व्हीडिओ गेम्स प्रसिद्ध आहेत.[५९]

पुस्तके

क्रिकेट विषयावरील पहिले मराठी पुस्तक र.गो. सरदेसाई यांनी लिहिले आहे.

क्रिकेट व क्रिकेट खेळाडूंवरील अन्य मराठी पुस्तके

  • अ मिलियन ब्रोकन विंडोज : मुंबई क्रिकेटची जादू आणि रहस्य (मकरंद वायंगणकर)
  • असा घडला सचिन (अजित तेंडुलकर)
  • आऊट ऑफ द बॉक्स (हर्षा भोगले)
  • कपिल देव (अनंत मनोहर)
  • कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट (आदिनाथ हरवंदे)
  • किस्से क्रिकेटचे (रमेश सहस्रबुद्धे)
  • क्रिकेट कसं खेळावं (मराठी अनुवादक : अमृत कहाते; मूळ इंग्रजी लेखक - डॉन ब्रॅडमन)
  • क्रिकेट काॅकटेल (द्वारकानाथ संझगिरी)
  • क्रिकेट वर्ल्ड कप (नवनीत प्रकाशन)
  • क्रिकेट - सूर, ताल, लय (सुहास क्षीरसागर)
  • क्रिकेटचा खेळ आणि इतर गोष्टी (बालसाहित्य, प्रा. भालबा केळकर)
  • क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर (सु.बा. भोसले)
  • क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स (द्वारकानाथ संझगिरी)
  • खेलरत्न महेंद्रसिंग धोनी (आदिनाथ हरवंदे)
  • गाजलेले जागतिक क्रिकेट सामने (विश्वास भोपटकर)
  • चला, क्रिकेट शिकू या (सुबोध मयुरे)
  • चित्तवेधक विश्वचषक २००३ (द्वारकानाथ संझगिरी
  • चिरंजीव सचिन (द्वारकानाथ संझगिरी)
  • क्रिकेटचे सुपरस्टार (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : रवी चतुर्वेदी)
  • क्रिकेट चौकार षटकार भाग१, २ (बाळ ज. पंडित)
  • ट्वेंटी 20 क्रिकेट एक नवी क्रांती (मराठी अनुवादक : रवींद्र कोल्हे, मूळ इंग्रजी लेखक - जॉन बुकानन)
  • दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी (द्वारकानाथ संझगिरी)
  • ध्रुवतारा - सचिन तेंडूलकर (प्रा. संजय दुधाणे)
  • फटकेबाजी (शिरीष कणेकर)
  • फिक्स्ड : मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश (मराठी अनुवाद, अनुवादक : मुकेश माचकर; मूळ इंग्रजी : 'Fixed! : Cash and Corruption in Cricket' लेखक : शंतनु गुहा)
  • भारतरत्न सचिन तेंडुलकर : तुम्हें याद करते करते (संपादक - प्रा. कृष्णकुमार गावंड)
  • युगकर्ता सचिन (अनंत मनोहर)
  • युगप्रवर्तक सर डोनाल्ड ब्रॅडमन (अरविंद ताटके)
  • विक्रमादित्य गावस्कर (अनंत मनोहर)
  • विश्वचषक (विजय लोणकर)
  • सचिन तेंडुलकर (वैभव पुरंदरे)
  • सचिन तेंडुलकर - प्लेईंग इट माय वे (चरित्र, आत्मचरित्र, सचिन तेंडुलकर)

क्रिकेटचा इतर खेळांवरील प्रभाव

टॉम विल्स, क्रिकेटर आणि ऑस्ट्रेलियन फुटबॉलचा सहसंस्थापक

क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन फुटबॉलचे जवळचे ऐतिहासिक संबंध आहेत आणि बरेच खेळाडू ह्या दोन्ही खेळांमध्ये वरच्या पातळीवर खेळलेले आहेत.[६०] ऑफ सीझनमध्ये क्रिकेटपटूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी, १८५८ मध्ये, एक प्रमुख ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम विल्सला "पाळावयाच्या नियमांसहित" एक "फुट-बॉल क्लब" स्थापन करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतरच्या वर्षी मेलबर्न फुटबॉल क्लब स्थापन करण्यात आला, आणि विल्स व इतर तीन सदस्यांनी मिळून खेळाचे पहिले नियम तयार केले.[६१] हा खेळ विशेषतः बदल केले गेलेल्या क्रिकेटच्या मैदानांवर खेळला जातो.

१९व्या शतकात उशीरा इंग्लंडमध्ये जन्म झालेला आणि ब्रुकलीन, न्यू यॉर्क येथील माजी क्रिकेटपटू हेनरी चाडविक हा "बॉक्स स्कोअरमधील सुधारणा, तक्त्याची स्थिती, वार्षिक बेसबॉल मार्गदर्शक, फलंदाजीची सरासरी, आणि बेसबॉलच्या वर्णनासाठी वापरले जाणारी सर्वसामान्य आकडेवारी आणि तक्ते" ह्यासाठी जबाबदार होता.[६२]

क्रिकेटमधील विक्रम

हेसुद्धा पहा

मॅच फिक्सिंग

कोणत्याही गैरमार्गाचा वापर करून मॅचचा निकाल हवा तसा करून घेण्याच्या प्रयत्नाला मॅच फिक्सिंग म्हणतात. या विषयावर शंतनु गुहा यांनी लिहिलेल्या 'Fixed! : Cash and Corruption in Cricket' या पुस्तकाचा ’फिक्स्ड : मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश’ या नावाचा मराठी अनुवाद मुकेश माचकर यांनी केला आहे.

संदर्भ आणि नोंदी

संदर्भ ग्रंथाची यादी

  • आल्थम, हॅरी. अ हिस्ट्री ऑफ क्रिकेट, व्हॉल्युम १ (ते १९१४).
  • बिर्ले, डेरेक. अ सोशल हिस्ट्री ऑफ इंग्लिश क्रिकेट.
  • बॉवेन, रोलॅंड. क्रिकेट: अ हिस्ट्री ऑफ इट्स ग्रोथ ॲंड डेव्हलपमेंट.
  • मेजर, जॉन. मोअर दॅन अ गेम.
  • मॅककॅन, टिम. ससेक्स क्रिकेट इन एटीन्थ सेंच्युरी.
  • अंडरडाऊन, डेव्हिड. स्टार्ट ऑफ प्ले.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
अर्थव्यवस्था - महाराष्ट्र
चलन{{{चलन}}}
आर्थिक वर्ष{{{आर्थिक वर्ष}}}
व्यापार संस्था{{{व्यापार संस्था}}}
सांख्यिकी
वार्षिक सकल उत्पन्न (GDP) (PPP){{{वार्षिक सकल उत्पन्न}}}
{{{क्रमांक}}} ([१])
जीडीपी विकास दर{{{विकास दर}}}
वार्षिक दरडोई उत्पन्न{{{दरडोई उत्पन्न}}}
विभागानुसार उत्पन्न{{{विभागानुसार उत्पन्न}}}
चलनवाढ (CPI){{{चलनवाढ}}}
बेरोजगारी{{{बेरोजगारी}}}
प्रमुख उद्योग{{{उद्योग}}}
व्यापार
निर्यात{{{निर्यात}}}
आयात{{{आयात}}}
सार्वजनिक अर्थव्यवहार
सार्वजनिक कर्ज{{{कर्ज}}}
महसूल{{{महसूल}}}
खर्च{{{खर्च}}}
आर्थिक मदत{{{आर्थिक मदत}}}
येथील सर्व किमती अमेरिकन डॉलरांमध्ये आहेत. (तसे नसल्यास, अपवाद दर्शविले आहेत.)

महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी आहे . [१] हे भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक आहे.

मुंबई, महाराष्ट्राची राजधानी ही भारताची आर्थिक राजधानी मानली जाते आणि जवळपास सर्व प्रमुख बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंडांची मुख्यालये या शहरात आहेत. भारतातील सर्वात मोठे आणि आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंज मुंबई रोखे बाजार देखील शहरात आहे. S&P CNX ५०० समुहांपैकी ४१% पेक्षा जास्त कॉर्पोरेट कार्यालये महाराष्ट्रात आहेत.

राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात २०% योगदान देणारे महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात औद्योगिक राज्य आहे. GSDPच्या जवळपास ४६% उद्योगांचे योगदान आहे. महाराष्ट्रात राज्यातील अनेक शहरांमध्ये सॉफ्टवेअर पार्क आहेत आणि ८०,००० कोटींहून अधिक वार्षिक निर्यातीसह सॉफ्टवेअरचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे. [२] उच्च औद्योगिकीकरण असले तरी, राज्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कार्यरत वयोगटातील २४.१४% लोकसंख्या शेती आणि संबंधित कामांमध्ये कार्यरत आहे. [३]

राजकीय आणि आर्थिक इतिहास

राजकीय इतिहास

महाराष्ट्राचे विभाग, त्यांच्या संबंधित जिल्ह्यांसह (२०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील पालघर जिल्ह्याची स्थापना)

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने १७ व्या शतकाच्या सुरुवातीस मुंबईवर नियंत्रण ठेवले आणि ते त्यांच्या मुख्य व्यापार पोस्टपैकी एक म्हणून वापरले. १८ व्या शतकात कंपनीने हळूहळू आपल्या अधिपत्याखालील क्षेत्रांचा विस्तार केला. १८१८ मध्ये तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात पेशवा बाजीराव २च्या पराभवाने त्यांचा महाराष्ट्राचा विजय पूर्ण झाला. [४]

बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग म्हणून ब्रिटिशांनी पश्चिम महाराष्ट्रावर राज्य केले. अनेक मराठा राज्ये रियासत म्हणून टिकून राहिली, त्यांनी ब्रिटिशांचे आधिपत्य मान्य करण्याच्या बदल्यात स्वायत्तता कायम ठेवली. नागपूर, सातारा आणि कोल्हापूर या प्रदेशातील सर्वात मोठी संस्थाने होती. १८४८ मध्ये सातारा बॉम्बे प्रेसीडेंसीला जोडण्यात आला आणि १८५३ मध्ये नागपूरला जोडून नागपूर प्रांत बनले, नंतर मध्य प्रांताचा भाग झाला. बेरार, जो निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता, १८५३ मध्ये ब्रिटीशांच्या ताब्यात गेला आणि १९०३ मध्ये मध्य प्रांतांना जोडण्यात आला. [५] तथापि, संपूर्ण ब्रिटिश काळात मराठवाडा नावाचा मोठा भाग निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग राहिला. इंग्रजांनी शतकाहून अधिक काळ राज्य केले आणि महाराष्ट्रातील लोकांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत मोठे बदल घडवून आणले. १९४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर, डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या रियासत आणि जहागीर, बॉम्बे स्टेटमध्ये विलीन करण्यात आले, जे १९५० मध्ये पूर्वीच्या बॉम्बे प्रेसीडेंसीपासून निर्माण झाले होते. [६] १९५६ मध्ये, राज्य पुनर्रचना कायद्याने भारतीय राज्यांची भाषिक धर्तीवर पुनर्रचना केली आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी राज्य मराठवाड्यातील (औरंगाबाद विभाग) मुख्यतः मराठी भाषिक प्रदेशांना जोडून पूर्वीचे हैदराबाद राज्य आणि मध्य प्रांत आणि बेरारमधून विदर्भ क्षेत्र वाढवले गेले. मुंबई राज्याचा दक्षिणेकडील भाग म्हैसूरला देण्यात आला. १९५० च्या दशकात मराठी लोकांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बॅनरखाली द्विभाषिक मुंबई राज्याला जोरदार विरोध केला. [७] [८] १ मे १९६० रोजी, पूर्वीच्या द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात या नवीन राज्यांमध्ये वेगळे मराठी भाषिक राज्य. [९]

आर्थिक इतिहास

ब्रिटिश राजवटीपूर्वी महाराष्ट्र प्रदेश अनेक महसूल विभागांमध्ये विभागला गेला होता. परगणा किंवा जिल्ह्याचे मध्ययुगीन समतुल्य होते. परगण्याच्या प्रमुखाला देशमुख आणि अभिलेख ठेवणाऱ्यांना देशपांडे म्हणत. [१०] [११] सर्वात कमी प्रशासकीय एकक हे गाव होते. मराठी भागातील ग्रामसमाजात पाटील किंवा गावचा प्रमुख, महसूल कलेक्टर आणि कुलकर्णी, गावातील रेकॉर्ड-कीपर यांचा समावेश होतो. ही वंशपरंपरागत पदे होती. [१२] गावात बलुतेदार नावाचे बारा वंशपरंपरागत नोकरही असत. बलुतेदार पद्धत कृषी क्षेत्राला साथ देणारी होती. या प्रणालीखालील नोकरांनी शेतकऱ्यांना आणि गावातील आर्थिक व्यवस्थेला सेवा दिली. या व्यवस्थेचा पाया जात होता. नोकर त्यांच्या जातींच्या विशिष्ट कामांसाठी जबाबदार होते. बारा बलुतेदारांच्या अधिपत्याखाली बारा प्रकारचे नोकर होते [१३] [१४] [१५] त्यांच्या सेवेच्या बदल्यात, बलुतेदारांना आनुवंशिक अधिकारांचे जटिल संच (वतन) बार्टर प्रणाली अंतर्गत गावातील कापणीमध्ये वाटा देण्यात आले. [१६] १७०० च्या दशकात, महाराष्ट्र प्रदेशातील महत्त्वाची शहरे ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील मुंबईचे व्यापारी बंदर होते, पेशव्यांच्या राजवटीत पुणे ही राजकीय आणि आर्थिक राजधानी होती, [१७] [१८] [१९] [२०] आणि भोसले यांनी नागपूरवर राज्य केले. मागील शतकात, औरंगाबाद हे मुघल गव्हर्नरांचे स्थान म्हणून या भागातील सर्वात महत्त्वाचे शहर होते.

ब्रिटीश राजवटीत (१८१८-१९४७), आजच्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या शासन पद्धतींनुसार राज्य केले जात होते, त्यांच्या आर्थिक विकासातही हा फरक दिसून आला. जरी ब्रिटिशांनी मुळात भारताला इंग्लंडमधील कारखान्यांसाठी कच्च्या मालाच्या पुरवठ्याचे ठिकाण मानले असले तरी, १९ व्या शतकाच्या अखेरीस मुंबई शहरात आधुनिक उत्पादन उद्योग विकसित होत होता. [२१] मुख्य उत्पादन कापूस होते आणि या गिरण्यांमधील बहुतांश कामगार [२२] पश्चिम महाराष्ट्रातील होते, परंतु विशेषतः किनारपट्टीच्या कोकण प्रदेशातील होते. [२३] [२४] [२५] हैदराबाद-गोदावरी व्हॅली रेल्वेचे १८९६ मध्ये पूर्णत्व, ३९१ मैल (६२९ किमी) हैदराबाद शहर ते मनमाड जंक्शन या मार्गाने निजाम शासित मराठवाडा प्रदेश उद्योगाच्या वाढीसाठी खुला केला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, हैदराबाद राज्याची सर्वात मोठी निर्यात म्हणून कापूस उद्योगाला निजामाच्या हैदराबाद सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान होते. १८८९ मध्ये, औरंगाबादमध्ये एक कापूस सूत गिरणी आणि विणकामाची गिरणी उभारण्यात आली, ज्यामध्ये एकूण ७०० लोक काम करत होते. एकट्या जालन्यातकापूस जिनिंग कारखाने आणि पाच कॉटन प्रेस असून, औरंगाबाद येथे आणखी दोन जिनिंग कारखाने आहेत. १९१४ मध्ये कापसाखाली लागवड केलेल्या जमिनीचे क्षेत्र ३ दशलक्ष एकर (१२,००० किमी 2) होते. हैदराबाद राज्यात, बहुतेक कापूस मराठवाड्यातील जिल्ह्य़ांमध्ये पिकवला जातो, जेथे माती विशेषतः अनुकूल होती. [२६] १९१४ मध्ये ६९,९४३ लोक कापूस कताई, आकारमानात आणि ५,१७,७५० लोक विणकाम, कापूस जिनिंग, साफसफाई आणि प्रेसिंगमध्ये कार्यरत होते. दिलेली मजुरी चांगली होती, पण कापूस उद्योगाचा वाढता वाढ, पावसाची अनिश्चितता आणि सावकारांकडून कर्जाची उपलब्धता यामुळे मराठवाड्यात राहण्याचा खर्च लक्षणीय वाढला. [२७]

वर्षसकल देशांतर्गत उत्पादन (लाखो INR )
1980 </img> १६६,३१०
1985 </img> २९६,१६०
१९९० </img> ६४४,३३०
1995 </img> १,५७८,१८०
2000 </img> 2,386,720
2005 </img> ३,७५९,१५० [२८]
2011 </img> 9,013,300
2014 </img> १६,८६६,९५०
2019 </img> २६,३२७,९२० [२९]

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर, राज्य सरकारने १९६२ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)ची स्थापना राज्याच्या इतर क्षेत्रांमध्ये वाढ करण्यासाठी केली. त्याच्या स्थापनेपासूनच्या दशकांमध्ये, MIDC ने महाराष्ट्र सरकारची प्राथमिक औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था म्हणून काम केले आहे. स्थापनेपासून एमआयडीसीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक औद्योगिक क्षेत्र स्थापन केले आहे. [३०] पुणे महानगर प्रदेश आणि ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा यांसारखे मुंबई जवळील क्षेत्रे सर्वाधिक औद्योगिक वाढीचे क्षेत्र आहेत. [३१]

स्वातंत्र्यानंतर कृषी सहकारी संस्थांच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर होता. किंबहुना, 'स्थानिक पुढाकाराने ग्रामीण विकास' या तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीचा तो अविभाज्य भाग होता. साखर सहकारी संस्थांना 'विशेष' दर्जा देण्यात आला आणि सरकारने भागधारक, हमीदार आणि नियामक म्हणून काम करून मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली, [३२] [३३] [३४] साखरेव्यतिरिक्त, दुग्धव्यवसायात, कापूस, आणि खत उद्योगात सहकारी संस्थांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. [३५] राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळे १९९० च्या दशकात महाराष्ट्रात २५,०००हून अधिक सहकारी संस्था स्थापन झाल्या. [३६]

१९८२ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शिक्षण क्षेत्राचे उदारीकरण केले. यामुळे राज्यात अनेक धार्मिक आणि विशेष हेतू असलेल्या संस्थांसह शेकडो खाजगी महाविद्यालये आणि विद्यापीठे स्थापन झाली. [३७] महाराष्ट्रातील मोठ्या सहकार चळवळीतील राजकारणी आणि नेत्यांनी खाजगी संस्थांच्या स्थापनेत मोलाचा वाटा उचलला होता [३८] [३९]

१९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर, महाराष्ट्राने परकीय भांडवल, विशेषतः माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी उद्योगांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. १९९० च्या उत्तरार्धात आणि २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा विकास झाला आणि पुण्यातील औंध आणि हिंजवडी भागात आयटी पार्क्सची स्थापना करण्यात आली. [४०]

सेक्टर्स

ऊर्जा उत्पादन

चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन, राज्याचे वीज उत्पादन स्त्रोत

जरी त्याची लोकसंख्या महाराष्ट्राला देशातील सर्वात मोठ्या ऊर्जा वापरकर्त्यांपैकी एक बनवते, [४१] [४२] संवर्धन आदेश, सर्वात मोठ्या लोकसंख्या केंद्रांमध्ये सौम्य हवामान आणि मजबूत पर्यावरणीय हालचालींमुळे त्याचा दरडोई ऊर्जा वापर कोणत्याही भारतीय राज्यांपैकी सर्वात लहान आहे. [४३] राज्याची उच्च विजेची मागणी भारतातील एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमतेच्या १३% आहे, जी प्रामुख्याने कोळसा आणि नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांपासून आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा उत्पादनाच्या मोठ्या सुविधा आहेत. [४४] राज्यातील विदर्भात कोळशाचे महत्त्वपूर्ण साठे आहेत. [४५] मुंबई हाय, ऑफशोअर ऑइलफिल्ड १६५ किलोमीटर (१०३ मैल) मुंबईच्या किनाऱ्याजवळ भारतातील कच्च्या तेलाच्या उत्पादनात लक्षणीय टक्केवारी आहे. [४६] [४७] [४८]

जलविद्युत, पवन, सौर आणि बायोमास यांसारखे अणुऊर्जेचे आणि नूतनीकरणीय स्रोत राज्यातील वीज निर्मिती क्षमतेत कमी योगदान देतात. [४९] अनेक साखर कारखाने गिरणीच्या वापरासाठी वीज आणि ग्रीडसाठी अधिशेष निर्माण करण्यासाठी बॅगॅस सहनिर्मितीचा वापर करतात. [५०]

महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे वीज निर्मिती करणारे राज्य आहे, ज्याची स्थापित वीज निर्मिती क्षमता ४४ हजार मेगावॅट आहे. [४२] राज्य भारताच्या पश्चिम ग्रीडचा एक प्रमुख घटक बनवते, जे आता भारताच्या उत्तर, पूर्व, पश्चिम आणि उत्तर पूर्व ग्रीड अंतर्गत येते. [४१] महाराष्ट्र पॉवर जनरेशन कंपनी थर्मल पॉवर प्लांट चालवते. [५१] राज्य सरकारच्या मालकीच्या वीज निर्मिती प्रकल्पांव्यतिरिक्त, खाजगी मालकीचे वीज निर्मिती प्रकल्प आहेत जे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत वीज प्रेषण करतात, जे राज्यातील वीज पारेषणासाठी जबाबदार आहे. [५२]

अनेक जलविद्युत प्रकल्प आहेत, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वीज निर्मितीसाठी. सातारा जिल्ह्यातील कोयना जलविद्युत प्रकल्प हा राज्यातील उत्पादन क्षमतेनुसार सर्वात मोठा प्रकल्प आहे. राज्यात पवननिर्मित विजेचीही चांगली क्षमता आहे आणि पवन ऊर्जा निर्माण करण्यात आघाडीवर असलेल्या राज्यांपैकी एक आहे.

महानिर्मिती, कॅप्टिव्ह पॉवर प्लांट, इतर राज्य वीज मंडळे आणि खाजगी क्षेत्रातील वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करून राज्यभर वीज वितरणाची जबाबदारी महावितरणकडे आहे. [४३] मुंबईतील काही भागात त्यांची वीज खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून मिळते जसे की बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड या वीज वितरक आहेत.

शेती

महाराष्ट्रातील चिनावल गावात ज्वारीचे शेत
महाराष्ट्र, भारतातील सहकारी साखर कारखान्यात ऊसाचे वजन केले जाते.
कोकण विभागातील धाकटी जुई गावाजवळील भातशेती
यवतमाळ जिल्ह्यात नांगरणी

ऐतिहासिकदृष्ट्या, भारताने आपली अर्थव्यवस्था आणि जीडीपी या तीन क्षेत्रांमध्ये वर्गीकृत केले आहे आणि त्याचा मागोवा घेतला आहे: कृषी, उद्योग आणि सेवा. शेतीमध्ये पिके, फलोत्पादन, दूध आणि पशुपालन, मत्स्यपालन, मासेमारी, रेशीम शेती, पशुपालन, वनीकरण आणि संबंधित क्रियाकलापांचा समावेश होतो.

महाराष्ट्र हे भारतातील एक उच्च औद्योगिक राज्य असले तरी, शेती हा राज्याचा मुख्य व्यवसाय आहे. [३] : बहुतेक लागवडीयोग्य जमीन अजूनही पावसावर अवलंबून असल्याने, जून ते सप्टेंबर दरम्यानचा नैऋत्य मोसमी पाऊस राज्यातील अन्नधान्य आणि जीवनमानाच्या गुणवत्तेसाठी महत्त्वपूर्ण आहे. म्हणून, महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांची कृषी दिनदर्शिका मान्सूनद्वारे नियंत्रित केली जाते. वेळेचे वितरण, स्थानिक वितरण किंवा मान्सूनच्या पावसाचे प्रमाण यातील कोणत्याही चढउतारामुळे पूर किंवा दुष्काळाची परिस्थिती उद्भवू शकते ज्यामुळे कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. याचा दुय्यम आर्थिक क्षेत्रांवर, एकूण अर्थव्यवस्थेवर, अन्नाची चलनवाढ आणि त्यामुळे सामान्य लोकांच्या जीवनमानाची एकूण गुणवत्ता आणि खर्च यावर मोठा परिणाम होतो. दख्खनच्या पठारावरील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाग जसे की पूर्व पुणे जिल्हा, सोलापूर, सांगली, सातारा आणि अहमदनगर आणि मराठवाडा प्रदेश विशेषतः दुष्काळी आहे. उर्वरित भारताप्रमाणेच, जमीनधारणा कमीच राहते आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची टक्केवारी (१.० हेक्टरपेक्षा कमी जमीन ९२.५ एकर) ४३% होती. सर्व आकार गटांवर सरासरी धारण तीन हेक्टरपेक्षा कमी होता. [५३] [५४] अलिकडच्या वर्षांत महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे कारण मान्सूनच्या अपयशामुळे, हवामानातील बदलांमुळे आणि काही वेळेला पिकांची किंमत बाजारभावापेक्षा जास्त असल्याने कर्जबाजारीपणा. [५५] [३] काही अभ्यासांमध्ये आत्महत्येचे कारण हे मुख्यतः बँका आणि NBFCs कडून महागडे बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जास असमर्थता म्हणून जोडले गेले आहे, बहुतेकदा परदेशी MNCs द्वारे विक्री केली जाते. [५६]

पावसाच्या पाण्यावर शेती कमी अवलंबून राहावी यासाठी सिंचन सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे. भारतात आतापर्यंत सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत. असे असूनही, निव्वळ सिंचित क्षेत्र केवळ ३३,५०० आहे चौरस किलोमीटर किंवा सुमारे १६% लागवडीयोग्य जमीन. [५७]

मुख्य पावसाळी पिकांमध्ये ज्वारी, बाजरी आणि फिंगर बाजरी यासारख्या बाजरींचा समावेश होतो. हे हजारो वर्षांपासून या प्रदेशात घेतले जात आहेत. [५८] कोकणातील जास्त पाऊस पडणाऱ्या भागात आणि सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील पायथ्याशी भाताच्या विविध जातींची लागवड केली जाते. इतर पिकांमध्ये गहू, कडधान्ये, भाजीपाला आणि कांदे यांचा समावेश होतो. भारतीय राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्र सर्व पिकांच्या उत्पादकतेमध्ये मागे आहे, जे युरोप आणि आशियातील इतर काही प्रगतीशील देशांच्या सरासरीपेक्षा खूप मागे आहे. [५९]

मुख्य नगदी पिकांमध्ये कापूस, ऊस, हळद, आणि भुईमूग, सूर्यफूल आणि सोयाबीन यासह अनेक तेलबियांचा समावेश होतो . राज्यात फळांच्या लागवडीखाली मोठे क्षेत्र असून त्यात आंबा, केळी, द्राक्षे, डाळिंब आणि संत्री ही प्रमुख आहेत.

राज्य हे दूध उत्पादनात लक्षणीय आहे. हे दूध प्रामुख्याने पाणथळ म्हशी, संकरित गुरे आणि देशी गुरे यांच्यापासून मिळते. भारतातील काही दक्षिणेकडील राज्यांच्या विपरीत, महाराष्ट्रात पाणथळ म्हशी आणि देशी गुरे यांचा मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होतो. पंढरपुरी ही राज्यातील लोकप्रिय म्हशीची जात आहे. झेबू आणि गीर हे लोकप्रिय दुग्धजन्य गुरे आहेत. जर्सी आणि होल्स्टीन या युरोपियन जाती आहेत ज्या देशी गुरांच्या संकरित प्रजननासाठी वापरल्या जातात. जरी निम्मे दूध मालक वापरत असले तरी उरलेले अर्धे दूध विक्रेते, खाजगी कंपन्या आणि दुग्ध सहकारी संस्था यांच्या संयोगाने विक्री आणि प्रक्रिया केली जाते. [६०] शेतीच्या कामासाठी गुरांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यात खिल्लार, देवणी, गावाओ, लाल कंधारी आणि डांगी या लोकप्रिय जातींचा समावेश होतो. या जाती चांगली मसुदा शक्ती क्षमता, उष्णता सहन करण्याची क्षमता, रोग प्रतिकारशक्ती, कठोर कृषी-हवामान परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि दुर्मिळ चारा आणि चारा यांच्यात टिकून राहण्याची क्षमता देतात. [६१]

स्वातंत्र्यानंतर कृषी सहकारी संस्थांच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर होता. किंबहुना, 'स्थानिक पुढाकाराने ग्रामीण विकास' या तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीचा तो अविभाज्य भाग होता. साखर सहकारी संस्थांना 'विशेष' दर्जा देण्यात आला आणि सरकारने भागधारक, हमीदार आणि नियामक म्हणून काम करून मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली, [६२] [३३] [३४] सहकारी संस्था दुग्धव्यवसायात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, [३५] कापूस, आणि खत उद्योग. संबंधित सोसायटीच्या सदस्यांमध्ये सर्व शेतकरी, लहान आणि मोठे, त्यांचा उत्पादन प्रक्रिया गिरणी, दुग्धव्यवसाय इत्यादींना पुरवठा करतात [६३] दुग्धव्यवसाय आणि साखरेप्रमाणेच, महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला विक्रीत सहकारी संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. १९८० पासून, सहकारी संस्थांद्वारे हाताळल्या जाणाऱ्या उत्पादनांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. सोसायट्यांद्वारे विकल्या जाणाऱ्या सामान्य फळे आणि भाज्यांमध्ये केळी, आंबा, द्राक्षे, कांदे आणि इतर अनेक उत्पादनांचा समावेश होतो. [६४] गेल्या पन्नास वर्षांत, स्थानिक साखर कारखानदार आणि इतर सहकारी संस्थांनी राजकीय सहभागाला प्रोत्साहन देण्यात आणि महत्त्वाकांक्षी राजकारण्यांसाठी एक पायरी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. [३३]

राज्यातील विविध फळे, भाजीपाला आणि इतर पिकांसाठी भौगोलिक संकेत मिळवण्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांमध्ये घोलवडची चिकू, नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्षे, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सातारा जिल्ह्यातील वाघ्या घेवडा ( फ्रेंच बीनची जात), [६५] जळगावची वांगी, आंबेमोहर तांदूळ इ., [६६] [६७]

मुंबईत मासेमारी नौका

७२० किनारपट्टी असलेला महाराष्ट्र किमी हे सागरी मत्स्य उत्पादनात भारतातील अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे. मुंबई महानगर क्षेत्रात न्यू फेरी वार्फ, ससून डॉक आणि वर्सोवा ही प्रमुख फिश लँडिंग केंद्रे आहेत आणि ते राज्यातील माशांच्या लँडिंगपैकी जवळपास ६०% आहेत. सन २०१७-१८ मध्ये, राज्याच्या किनारपट्टीलगत कोकणात अरबी समुद्रात पकडलेल्या माशांपासून ४,७५,००० मेट्रिक टन उत्पादन झाले. [६८] [६९]

शाश्वततेच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, राज्याने जट्रोफा, एक दुष्काळ प्रतिरोधक वनस्पतीसाठी योग्य वृक्षारोपण स्थळांच्या ओळखीसाठी एक प्रकल्प सुरू केला आहे. [७०] अहमदनगर जिल्ह्यातील राळेगाव सिद्धी हे गाव ग्रामविकासाचे शाश्वत मॉडेल म्हणून ओळखले जाते. [७१]

उत्पादन उद्योग

एक भरतकाम युनिट, अनेक लघु उद्योग कंपन्यांपैकी एक, धारावी, मुंबई येथे.

२०१३ मध्ये राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात १८.४% योगदान देणारे महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे औद्योगिक राज्य आहे. GSDPच्या जवळपास ४६% उद्योगांचे योगदान आहे. [७२] [७३] मुंबई आणि पुण्याच्या सभोवतालच्या महानगरांच्या आसपासच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये औद्योगिक उत्पादनाची टक्केवारी लक्षणीय आहे.

राज्यातील विविध क्षेत्रात उद्योगांना आकर्षित करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने १९६२ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)ची स्थापना केली. MIDC विशेष आर्थिक क्षेत्रे तयार करून उत्पादन व्यवसाय सुलभ करते ज्यात जमीन (खुले भूखंड किंवा बांधलेल्या जागा), रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज सुविधा इ. [७४] [७५] पायाभूत सुविधा आहेत. आजपर्यंत, उत्पादन, आयटी, फार्मास्युटिकल आणि वाइन यासारख्या विविध क्षेत्रांवर भर देऊन राज्यभर २३३ क्षेत्रे विकसित करण्यात आली आहेत.

मुंबई हे भारतातील कापड गिरण्यांचे मूळ घर असल्याने कापड उद्योगात महाराष्ट्राचा मोठा इतिहास आहे. सोलापूर, इचलकरंजी, मालेगाव आणि भिवंडी ही आज वस्त्रोद्योगासाठी ओळखली जाणारी काही शहरे आहेत. फार्मास्युटिकल्स, पेट्रोकेमिकल्स, जड रसायने, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, अभियांत्रिकी, अन्न प्रक्रिया आणि प्लास्टिक हे राज्यातील काही प्रमुख उद्योग आहेत. तीनचाकी, जीप, व्यावसायिक वाहने आणि कार, सिंथेटिक फायबर, कोल्ड रोल्ड उत्पादने आणि औद्योगिक अल्कोहोल यांच्या उत्पादनासाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. पुणे हे देशातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येत आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश ऐतिहासिकदृष्ट्या राज्यातील सर्वात औद्योगिक क्षेत्र आहे. राज्यातील औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावर पुणे महानगर क्षेत्र, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर येथे केंद्रित आहे . कापूस वस्त्र, रसायने, यंत्रसामग्री, इलेक्ट्रिकल्स, वाहतूक आणि धातूशास्त्र हे राज्यातील सहा महत्त्वाचे उद्योग आहेत.

केमिकल आणि फार्मास्युटिकल उद्योग

माहिती आणि माध्यम

शाहरुख खान, मुंबई फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठा स्टार.

जाहिरात, आर्किटेक्चर, कला, हस्तकला, डिझाईन, फॅशन, चित्रपट, संगीत, परफॉर्मिंग आर्ट्स, प्रकाशन, संशोधन आणि विकास, सॉफ्टवेअर, खेळणी आणि खेळ, टीव्ही आणि रेडिओ, आणि व्हिडिओ गेमसह अनेक सर्जनशील उद्योगांसाठी महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे राज्य आहे.

अनेक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, पुस्तके आणि इतर माध्यमांसह महाराष्ट्र हे भारतीय मनोरंजन उद्योगासाठी एक प्रमुख स्थान आहे. [७६] चित्रपट आणि दूरदर्शन निर्मितीसाठी मुंबई हे सर्वात मोठे केंद्र आहे आणि एकूण भारतीय चित्रपटांपैकी एक तृतीयांश चित्रपट राज्यात तयार होतात. 1.5 अब्ज (US$३३.३ दशलक्ष) पर्यंत सर्वात महागड्या खर्चासह, कोट्यवधी-डॉलरची बॉलिवूड निर्मिती, तेथे चित्रित केले आहेत. [७७] मराठी चित्रपट पूर्वी कोल्हापुरात बनत असत, पण आता मुंबईत तयार होतात.

दूरसंचार

बांधकाम आणि रिअल इस्टेट

सेवा क्षेत्र

मुंबईतील भारतीय राष्ट्रीय शेअर बाजार

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर सेवा क्षेत्राचे वर्चस्व आहे, ज्याचा वाटा ६१.४% मूल्यवर्धन आणि ६९.३% आहे. [७८] सेवा क्षेत्रामध्ये पारंपारिक क्षेत्र जसे की शिक्षण, आरोग्य, वाहतूक, रिअल इस्टेट, बँकिंग आणि विमा तसेच माहिती तंत्रज्ञानासारख्या नवीन क्षेत्रांचा समावेश होतो.

बँकिंग आणि वित्त

मुंबई, राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी, अनेक भारतीय कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि वित्तीय संस्थांचे कॉर्पोरेट मुख्यालय आहे. भारतातील मुख्य स्टॉक एक्स्चेंज आणि भांडवली बाजार आणि कमोडिटी एक्सचेंज मुंबई येथे आहेत. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया, सेबी यांचा समावेश आहे. राज्य देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करत आहे. राज्यातील शेअर बाजार देशाच्या जवळपास ७० टक्के शेअर्सचा व्यवहार करतात. [७९]

सहकारी शहरी आणि ग्रामीण बँकिंगमध्ये महाराष्ट्र हे एक आघाडीचे राज्य आहे. २००७ मध्ये राज्याच्या नागरी सहकारी बँकांचा भारतातील ४०% क्षेत्र आणि बहुतांश ठेवी होत्या. [८०] [८१] [८२]

घाऊक आणि किरकोळ व्यापार

कुर्ला, मुंबई येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉल

राज्यातील किरकोळ परिस्थितीमध्ये संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांचा समावेश आहे. संघटित क्षेत्रात सुपरमार्केट, हायपरमार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर्स, मॉल्स आणि इतर खाजगी मालकीच्या रिटेल चेनचा समावेश होतो. असंघटितांमध्ये प्रामुख्याने कुटुंबाच्या मालकीच्या आणि चालवल्या जाणाऱ्या स्थानिक किराणा दुकाने, सुविधांची दुकाने, भाजी मंडई आणि फेरीवाले यांचा समावेश होतो. [८३] किरकोळ व्यापारात असंघटित क्षेत्राचे वर्चस्व आहे आणि ग्राहक त्याला प्राधान्य देतात. [८४] ऑनलाइन खरेदी महाराष्ट्रासह भारतात लोकप्रिय होत आहे, आणि विशेषतः मुंबई शहर, देशामध्ये आघाडीवर आहे. [८५]

शिक्षण आणि प्रशिक्षण

२०११ मध्ये राज्यातील साक्षरता दर ८८.६९% होता. यामध्ये पुरुष साक्षरता ९२.१२% आणि महिला साक्षरता ७५.७५% आहे.

  • प्राथमिक आणि माध्यमिक स्तर
रायगड जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी.

महाराष्ट्रातील शाळा राज्य सरकार किंवा धार्मिक संस्थांसह खाजगी संस्थांद्वारे चालवल्या जातात. राज्य कायद्यानुसार स्थानिक प्राधिकरणांना प्राथमिक शिक्षण देणे बंधनकारक आहे. तथापि, माध्यमिक शिक्षण हे ऐच्छिक कर्तव्य आहे. [८६] [८७] ग्रामीण आणि शहरी भागातील सार्वजनिक प्राथमिक शाळा अनुक्रमे जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका चालवतात. खाजगी शाळा मुख्यत्वे एज्युकेशन ट्रस्टद्वारे चालवल्या जातात आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची अनिवार्य तपासणी करणे आवश्यक आहे. खासगी शाळा राज्य सरकारकडून आर्थिक मदतीसाठी पात्र आहेत.

माध्यमिक शाळा भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल (NIOS) किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहेत. १०+२+३ योजनेअंतर्गत, माध्यमिक शाळा पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थी सामान्यत: दोन वर्षांसाठी कनिष्ठ महाविद्यालयात, ज्याला प्री-युनिव्हर्सिटी असेही म्हणतात, किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न असलेल्या उच्च माध्यमिक सुविधा असलेल्या शाळांमध्ये नोंदणी केली जाते. माध्यमिक शिक्षण किंवा कोणतेही केंद्रीय मंडळ. विद्यार्थी उदारमतवादी कला, वाणिज्य किंवा विज्ञान या तीनपैकी एका प्रवाहाची निवड करतात. आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, विद्यार्थी सामान्य किंवा व्यावसायिक पदवी कार्यक्रमांमध्ये नोंदणी करू शकतात. शाळांमधील शिक्षण मुख्यतः मराठी, इंग्रजी किंवा हिंदीमध्ये दिले जाते, परंतु स्थानिक मागणी असल्यास उर्दू, गुजराती किंवा कन्नड यांसारख्या इतर भाषांमधील शिक्षण देखील दिले जाते. [८८] [८९] [९०] खाजगी शाळा त्यांच्या अभ्यासक्रमाच्या निवडीनुसार भिन्न असतात आणि त्या राज्य बोर्ड किंवा दोन केंद्रीय शिक्षण मंडळांपैकी एक, CBSE किंवा CISCEचे अनुसरण करू शकतात. [९१] [९२]

*तृतीय स्तर

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर स्थापन झालेल्या संस्थांपैकी एक होती

महाराष्ट्रात दरवर्षी १,६०,००० पदवीधर भरणारी २४ विद्यापीठे आहेत. [९३] [९४] मुंबई विद्यापीठ हे पदवीधरांच्या संख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे आणि १४१ संलग्न महाविद्यालये आहेत. [९५] प्रमुख राष्ट्रीय क्रमवारीनुसार, महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे भारतातील सर्वोच्च स्थानी आहेत. [९६] [९७] भारतीय तंत्रज्ञान संस्था बॉम्बे म्हणून महाराष्ट्रात अनेक स्वायत्त संस्था आहेत. [९८] यापैकी बहुतेक स्वायत्त संस्था भारतात सर्वोच्च स्थानावर आहेत आणि त्यांना खूप स्पर्धात्मक प्रवेश आवश्यकता आहेत. पुणे ऐतिहासिकदृष्ट्या उच्च शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखले जाते आणि भारताची शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाते. २००६ मध्ये, असे नोंदवले गेले की संपूर्ण भारतातील सुमारे २,००,००० विद्यार्थी पुण्यात नऊ विद्यापीठे आणि शंभरहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतात. राज्यात अनेक धार्मिक आणि विशेष-उद्देशीय संस्थांसह इतर शेकडो खाजगी महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. वसंतदादा पाटील यांच्या राज्य सरकारने १९८२ मध्ये शिक्षण क्षेत्राचे उदारीकरण केल्यानंतर बहुतेक खाजगी महाविद्यालये गेल्या तीस वर्षांत सुरू झाली. [३७] खाजगी असले तरी या महाविद्यालयांच्या कामकाजात शासनाची नियामक भूमिका असते. महाराष्ट्रातील मोठ्या सहकारी चळवळीतील राजकारणी आणि नेत्यांनी अनेक खाजगी संस्था स्थापन करण्यात मोलाचा वाटा उचलला [९९] [१००] राज्यात आयटी क्लस्टर्सच्या वाढीमुळे मागणी पूर्ण करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापन करण्यात त्याच प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यासारख्या क्लस्टर्स असलेल्या भागात कुशल कामगार. [१०१]

ब््ब्स्र्योब्व्स्य्ब्र्लब्द्ब द् बद्स्

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (कृषी विद्यापीठ) अकोला

राज्यात विविध प्रदेशात चार कृषी विद्यापीठे देखील आहेत. [१०२] राज्याच्या जिल्हा स्तरावर उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेली अनेक प्रादेशिक विद्यापीठे देखील आहेत. याशिवाय राज्यात अनेक डीम्ड विद्यापीठे आहेत. [१०३] सामान्यत: अधिक खुली प्रवेश धोरणे, लहान शैक्षणिक कार्यक्रम आणि कमी शिकवणी असलेली स्थानिक समुदाय महाविद्यालये देखील आहेत.

*व्यावसायिक प्रशिक्षण

एकूण ४१६ ITI आणि ३१० ITC आहेत ज्यात अंदाजे १,५०,००० (ITIs मध्ये १,१३,६४४ आणि ITC मध्ये ३५,५१२) विद्यार्थी आहेत. राज्यात ४१६ पोस्ट-सेकंडरी स्कूल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ITIs) सरकारद्वारे चालवल्या जातात आणि ३१० इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर्स (ITC) खाजगी संस्थांद्वारे चालवल्या जातात जे बांधकाम, प्लंबिंग, वेल्डिंग, ऑटोमोबाईल मेकॅनिक इत्यादीसारख्या असंख्य व्यवसायांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देतात. यशस्वी उमेदवारांना राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र मिळते. [१०४] २०१२ मध्ये अंदाजे १,५०,००० (ITIs मध्ये १,१३,६४४ आणि ITCs मध्ये ३५,५१२) विद्यार्थ्यांनी या संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नोंदणी केली होती.

वाहतूक

१७ व्या शतकापासून व्यापार आणि औद्योगिक विकासासह मुंबई हे महाराष्ट्रातील प्रमुख बंदर आहे, प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे राज्यातून जातात, ज्यामुळे माल आणि लोकांच्या जलद वाहतुकीस मदत होते. राज्याने जिल्हा ठिकाणांना प्रमुख व्यापारी बंदरे आणि शहरांशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या जाळ्यातही भर घातली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर ही राज्यातील प्रमुख विमानतळे आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळ म्हणून नोंद झाली आहे. नवी मुंबई आणि पुणे येथे प्रत्येकी एक असे दोन नवीन विमानतळ बांधण्याचे प्रस्तावित आहे.

*रस्ते वाहतूक

NH3, मुंबई आणि नाशिकला जोडणारा महामार्ग

राज्यात भारतातील सर्वात मोठे रस्ते जाळे असलेली, बहु-मोडल वाहतूक व्यवस्था आहे. [१०५] २०११ मध्ये, महाराष्ट्रातील पृष्ठभागाच्या रस्त्याची एकूण लांबी २,६७,४५२ होती किमी; [१०६] राष्ट्रीय महामार्गांमध्ये ४,१७६ होते किमी [१०७] आणि राज्य महामार्ग ३,७०० किमी [१०६] इतर जिल्हा रस्ते आणि गावातील रस्ते गावांना त्यांच्या सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच खेड्यापासून जवळच्या बाजारपेठांमध्ये कृषी उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी सुलभता प्रदान करतात. प्रमुख जिल्हा रस्ते मुख्य रस्ते आणि ग्रामीण रस्ते यांना जोडण्याचे दुय्यम कार्य प्रदान करतात. महाराष्ट्रातील जवळपास ९८% गावे महामार्ग आणि आधुनिक रस्त्यांनी जोडलेली आहेत. राज्य महामार्गावरील सरासरी वेग ५०-६० च्या दरम्यान असतो किमी/ता (३१–३७ mi/h) वाहनांच्या मोठ्या उपस्थितीमुळे; खेडे आणि शहरांमध्ये, वेग २५-३० इतका कमी आहे किमी/ता (१५-१८ mi/h). [१०८] राष्ट्रीय महामार्गांना केंद्र सरकारकडून निधी मिळतो, मात्र, राज्य महामार्ग आणि स्थानिक रस्ते राज्य सरकारवर अवलंबून असतात. निधीच्या कमतरतेमुळे महाराष्ट्र सरकारला राज्य महामार्गांसाठी निधी देण्यासाठी खाजगी क्षेत्रावर अवलंबून राहावे लागले आहे. [१०९]

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) सार्वजनिक क्षेत्रात किफायतशीर आणि विश्वासार्ह प्रवासी रस्ते वाहतूक सेवा प्रदान करते. [११०] या बसेस, ज्यांना ST (राज्य परिवहन) म्हटले जाते, बहुतेक लोकसंख्येच्या वाहतुकीचे प्राधान्य साधन आहे. भाड्याने घेतलेल्या वाहतुकीच्या प्रकारांमध्ये मीटरच्या टॅक्सी आणि ऑटो रिक्षा यांचा समावेश होतो, जे सहसा शहरांमध्ये विशिष्ट मार्गांनी चालतात.

*रेल्वे

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर एक RORO गाडी

भारत सरकारच्या मालकीची भारतीय रेल्वे महाराष्ट्रात तसेच उर्वरित देशात रेल्वे नेटवर्क चालवते. ५,९८३ च्या रेल्वे नेटवर्कसह राज्य देशाच्या इतर भागांशी चांगले जोडलेले आहे चार रेल्वे दरम्यान किमी. [१११] [११२]

मालवाहतूक आणि लोक वाहून नेण्यासाठी रेल्वे नेटवर्कचा वापर केला जातो परंतु मालवाहतूकीची मोठी टक्केवारी रेल्वेपेक्षा ट्रकद्वारे वाहून नेली जाते.

* प्रवासी रेल्वे

नागपूर - भुसावळ एसएफ एक्सप्रेस

भारतातील प्रमुख शहरांना महाराष्ट्रातील शहरांशी जोडणाऱ्या अनेक रेल्वे सेवा आहेत, उदाहरणार्थ, मुंबई राजधानी एक्सप्रेस, सर्वात वेगवान राजधानी ट्रेन, भारताची राजधानी नवी दिल्ली ते मुंबईला जोडते. [११३] महाराष्ट्रातील शहरांना जोडणाऱ्या अनेक सेवा देखील आहेत जसे की डेक्कन क्वीन मुंबई आणि पुण्याला जोडणारी. दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराला ईशान्य महाराष्ट्रातील गोंदियाशी जोडणारी महाराष्ट्र एक्सप्रेस सेवा एका राज्यात सर्वात लांब अंतर कापण्याचा सध्याचा विक्रम आहे, कारण तिचा संपूर्ण धावा १,३४६ आहे. किमी (८३६ mi) संपूर्णपणे महाराष्ट्रात आहे. ठाणे आणि सीएसटी ही भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानके आहेत, [११४] नंतरचे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि प्रवासी गाड्यांसाठी टर्मिनल म्हणून काम करतात.

महाराष्ट्रातही मुंबई आणि पुण्यात उपनगरीय रेल्वे नेटवर्क आहेत जे लांब पल्ल्याच्या प्रवासी आणि मालवाहू गाड्या वापरतात तेच ट्रॅक वापरून दररोज सुमारे 6.4 दशलक्ष प्रवासी वाहतूक करतात. [११५] *समुद्री बंदरे मुंबई पोर्ट आणि जेएनपी (ज्याला न्हावा शेवा असेही म्हणतात), ही दोन प्रमुख समुद्री बंदरे भारत सरकारच्या नियंत्रणाखाली आणि देखरेखीखाली आहेत. [११६] भारताच्या १२ सार्वजनिक बंदरांवर हाताळल्या जाणाऱ्या एकूण कंटेनरच्या प्रमाणापैकी अर्ध्याहून अधिक आणि देशाच्या एकूण कंटेनरीकृत महासागर व्यापाराच्या जवळपास ४० टक्के वाटा जेएनपीचा आहे. [११७] महाराष्ट्रात जवळपास ४८ छोटी बंदरे आहेत. [११८] यापैकी बहुतेक प्रवासी वाहतूक हाताळतात आणि त्यांची क्षमता मर्यादित असते. महाराष्ट्रातील कोणत्याही प्रमुख नद्यांना जलवाहतूक नाही आणि त्यामुळे नदी वाहतूक राज्यात अस्तित्वात नाही. *विमान वाहतूक महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये विमानतळ आहेत. CSIA (पूर्वीचे बॉम्बे आंतरराष्ट्रीय विमानतळ) आणि जुहू विमानतळ हे मुंबईतील दोन विमानतळ आहेत. इतर दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) आहेत. तर औरंगाबाद विमानतळ हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालवले जाणारे देशांतर्गत विमानतळ आहे. उड्डाणे खाजगी आणि सरकारी दोन्ही विमान कंपन्या चालवतात. नाशिक विमानतळ हे देखील एक प्रमुख विमानतळ आहे. राज्यातील बहुतेक विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) द्वारे चालवले जातात तर रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स (RADPL), सध्या ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर लातूर, नांदेड, बारामती, उस्मानाबाद आणि यवतमाळ येथे पाच बिगर मेट्रो विमानतळ चालवतात. [११९] महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC)ची स्थापना २००२ मध्ये AAI किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत नसलेल्या राज्यातील विमानतळांचा विकास करण्यासाठी करण्यात आली. नागपूर (मिहान) येथील मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळाच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये MADC प्रमुख भूमिका बजावत आहे. [१२०] अतिरिक्त छोट्या विमानतळांमध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, कराड, कोल्हापूर, नाशिक रोड, रत्‍नागिरी आणि सोलापूर यांचा समावेश आहे . [१२१]

पर्यटन

पर्यटन हा महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई आणि पुण्याच्या आसपासचा प्रमुख उद्योग आहे. प्रेक्षणीय स्थळांमध्ये अजिंठा, एलोरा, एलिफंटा आणि कार्ले -भाजे येथील प्राचीन लेणी आणि स्मारके, रायगड, सिंहगड, राजगड, शिवनेरी, पन्हाळा, ब्रिटीशकालीन हिल स्टेशन्स जसे की लोणावळा, महाबळवार, मराठा साम्राज्य काळातील असंख्य पर्वतीय किल्ले यांचा समावेश आहे आणि माथेरान, मेळघाट, नागझिरा आणि ताडोबा सारखे व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव बंध सारखी राष्ट्रीय उद्याने.

धार्मिक पर्यटनामध्ये शिर्डी (साईबाबा मंदिर), नाशिक (हिंदू पवित्र स्थान), नांदेड (गुरुद्वारा), नागपूर (दीक्षाभूमी), सिद्धिविनायक मंदिर आणि मुंबईतील हाजी अली दर्गा आणि पंढरपूर (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर) तसेच पाच ठिकाणांचा समावेश होतो. अकरापैकी ज्योतिर्लिंगे आणि कोल्हापूर (महालक्ष्मी मंदिर) सारखी शक्तीपीठे.

असंख्य समुद्रकिनारे, साहसी पर्यटन स्थळे, मनोरंजन उद्याने आणि वॉटर पार्क देखील राज्यातील पर्यटनात भर घालतात. [१२२]

राज्य सरकारचा महसूल आणि खर्च

भारतीय राज्यघटनेचे कलम २४६ [१२३], भारताची संसद आणि राज्य विधानमंडळ यांच्यात कर आकारणीसह विधायी अधिकारांचे वितरण करते.

केंद्र सरकार आणि राज्यांना एकाचवेळी कर आकारणीचे अधिकार देण्याची राज्यघटनेत तरतूद नाही. [१२४] खालील तक्त्यामध्ये केंद्र सरकारकडून आकारले जाणारे तेरा कर आणि महाराष्ट्रासह राज्यांचे एकोणीस कर आहेत. [१२४]

भारताचे केंद्र सरकार

SL. नाही.केंद्रीय यादीनुसार कर
८२आयकर : कृषी उत्पन्नाव्यतिरिक्त इतर उत्पन्नावरील कर.
८३कस्टम ड्युटी : निर्यात शुल्कासह सीमाशुल्काची कर्तव्ये
८४उत्पादन शुल्क : भारतात उत्पादित किंवा उत्पादित केलेल्या खालील वस्तूंवर अबकारी शुल्क (a) पेट्रोलियम क्रूड (b) हाय स्पीड डिझेल (c) मोटर स्पिरिट (सामान्यतः पेट्रोल म्हणून ओळखले जाते) (d) नैसर्गिक वायू (e) विमानचालन टर्बाइन इंधन आणि (f) तंबाखू आणि तंबाखू उत्पादने
८५महानगरपालिका कर
८६मालमत्तेच्या भांडवली मूल्यावरील कर, शेतजमीन वगळून, व्यक्ती आणि कंपन्या, कंपन्यांच्या भांडवलावरील कर
८७शेतजमिनीव्यतिरिक्त इतर मालमत्तेच्या संदर्भात इस्टेट ड्युटी
८८शेतजमिनीव्यतिरिक्त इतर मालमत्तेच्या उत्तराधिकाराच्या संदर्भात कर्तव्ये
८९माल किंवा प्रवाशांवर टर्मिनल कर, रेल्वे, समुद्र किंवा हवाई मार्गे; रेल्वे भाडे आणि मालवाहतुकीवर कर.
90स्टॉक एक्सचेंज आणि फ्युचर्स मार्केटमधील व्यवहारांवरील मुद्रांक शुल्काव्यतिरिक्त इतर कर
92Aआंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य दरम्यान अशी विक्री किंवा खरेदी जेथे होते तेथे वर्तमानपत्रांव्यतिरिक्त इतर वस्तूंच्या विक्री किंवा खरेदीवरील कर
92Bआंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य दरम्यान मालाच्या खेपेवर कर
९७भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीच्या तीनपैकी कोणत्याही सूचीमध्ये सर्व अवशिष्ट प्रकारचे कर सूचीबद्ध नाहीत

राज्य सरकारे

SL. नाही.राज्य यादीनुसार कर
४५जमीन महसूल, ज्यामध्ये महसुलाचे मूल्यांकन आणि संकलन, जमिनीच्या नोंदींची देखरेख, महसुलाच्या उद्देशांसाठी सर्वेक्षण आणि अधिकारांच्या नोंदी, आणि महसूलापासून दूर राहणे इ.
४६कृषी उत्पन्नावर कर
४७शेतजमिनीच्या उत्तराधिकाराच्या संदर्भात कर्तव्ये.
४८शेतजमिनीच्या संदर्भात इस्टेट ड्युटी
49जमिनी आणि इमारतींवर कर.
50खनिज अधिकारांवर कर.
५१राज्यांतर्गत उत्पादित किंवा उत्पादित केलेल्या मालासाठी उत्पादन शुल्काची कर्तव्ये (i) मानवी वापरासाठी अल्कोहोलयुक्त मद्य आणि (ii) अफू, भारतीय भांग आणि इतर अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थ.
५३वीज शुल्क : विजेच्या वापरावर किंवा विक्रीवर कर
५४पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट (सामान्यत: पेट्रोल म्हणून ओळखले जाते), नैसर्गिक वायू एव्हिएशन टर्बाइन इंधन आणि मानवी वापरासाठी अल्कोहोल मद्य यांच्या विक्रीवरील कर परंतु आंतरराज्यीय किंवा वाणिज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्त्रोतामध्ये विक्रीचा समावेश नाही अशा वस्तूंचा व्यापार किंवा वाणिज्य.
५६रस्ते किंवा अंतर्देशीय जलमार्गाने वाहून नेल्या जाणाऱ्या वस्तू आणि प्रवाशांवर कर.
५७रस्त्यावर वापरण्यासाठी योग्य असलेल्या वाहनांवर कर .
५८प्राणी आणि बोटींवर कर.
५९टोल
60व्यवसाय, व्यापार, कॉलिंग आणि रोजगार यावर कर .
६१कॅपिटेशन कर .
६२करमणूक आणि करमणूक यांवरील कर पंचायत किंवा नगरपालिका किंवा प्रादेशिक परिषद किंवा जिल्हा परिषदेद्वारे आकारले जातील आणि गोळा केले जातील.
६३मुद्रांक शुल्क

वस्तू आणि सेवा कर

हा कर 1 जुलै 2017 पासून भारत सरकारद्वारे भारताच्या संविधानाच्या शंभर आणि पहिल्या दुरुस्तीच्या अंमलबजावणीद्वारे लागू झाला. GST ने केंद्र आणि राज्य सरकारांद्वारे आकारले जाणारे विद्यमान अनेक कर बदलले. हा अप्रत्यक्ष कर (किंवा उपभोग कर ) वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर वापरला जातो. हा सर्वसमावेशक, बहुस्तरीय, गंतव्य-आधारित कर आहे: सर्वसमावेशक कारण त्यात काही राज्य कर वगळता जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष कर समाविष्ट आहेत. उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर जीएसटी लागू केला जातो, परंतु अंतिम ग्राहकाव्यतिरिक्त उत्पादनाच्या विविध टप्प्यांमध्ये सर्व पक्षांना परतावा दिला जातो आणि गंतव्य-आधारित कर म्हणून तो गोळा केला जातो. वापराच्या बिंदूपासून आणि मागील करांप्रमाणे मूळ बिंदू नाही.

कामगार शक्ती

२०१५ पर्यंत, राज्यातील ५२.७% कामगार कृषी क्षेत्रात होते. यापैकी २५.४% शेतकरी (जमीन मालक) होते, तर २७.३% शेतमजूर होते. [१२५] राज्यात लक्षणीय आंतरराज्य आणि आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार लोकसंख्या आहे. राज्यातील कामगार प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांतून येतात . स्थलांतरित कामगारांना प्रामुख्याने राज्याच्या अधिक विकसित प्रदेशात जसे की पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नाशिक महानगरे तसेच काही प्रमाणात औरंगाबाद आणि नागपूर विभागांमध्ये रोजगार मिळतो. आंतरराज्य स्थलांतरितांना देखील वर नमूद केलेल्या प्रदेशांमध्ये संधी मिळतात. [१२६]

उत्पन्न आणि गरिबी

संघटित कामगार

प्रदेशांची अर्थव्यवस्था

महाराष्ट्रातील विभाग

प्रशासकीय कारणांसाठी महाराष्ट्र सहा विभागांमध्ये विभागला गेला आहे. अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण, नाशिक आणि पुणे. हे विभाग विदर्भ (अमरावती आणि नागपूर विभाग), मराठवाडा (औरंगाबाद), पश्चिम महाराष्ट्र (पुणे आणि नाशिक विभाग), कोकण (मुंबई महानगर प्रदेश वगळून), आणि मुंबई महानगर प्रदेशाशी एकरूप होतात. मुंबई महानगर प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या सर्वात विकसित प्रदेश आहेत आणि राज्यांच्या जीडीपीचे सर्वात मोठे प्रमाण आहेत. मराठवाडा हा सर्वात कमी विकसित प्रदेश आहे कारण तो पूर्वी हैदराबाद संस्थानाचा होता.

मुंबई महानगर क्षेत्र

मुंबई महानगर प्रदेशाचा नकाशा

मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर (लोकसंख्येनुसार) आहे आणि भारताची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी आहे कारण ते एकूण GDPच्या 6.16% उत्पन्न करते. [१२७] [१२८] [१२९] हे भारताचे आर्थिक केंद्र म्हणून काम करते, 10% कारखाना रोजगार, 25% औद्योगिक उत्पादन, 33% आयकर संकलन, 60% सीमाशुल्क संकलन, 20% केंद्रीय अबकारी कर संकलन, 40% भारताच्या परकीय व्यापारात योगदान देते. आणि ४,००० कोटी (US$८८८ दशलक्ष) कॉर्पोरेट करांमध्ये . [१३०] उर्वरित भारताबरोबरच, 1991च्या उदारीकरणानंतर मुंबईने आर्थिक भरभराट, नव्वदच्या दशकाच्या मध्यात आर्थिक तेजी आणि 2000च्या दशकात आयटी, निर्यात, सेवा आणि आउटसोर्सिंग बूम पाहिली आहे. [१३१] 1990च्या दशकात मुंबई हे भारताच्या आर्थिक क्रियाकलापांचे केंद्र म्हणून ठळकपणे ओळखले जात असले तरी, मुंबई महानगर प्रदेश सध्या भारताच्या GDP मध्ये योगदान कमी करत आहे. [१३२]

2015 पर्यंत, मुंबईचे मेट्रो क्षेत्र GDP (PPP) अंदाजे $368 अब्ज होते. भारतातील अनेक समूह (लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी), टाटा ग्रुप, गोदरेज आणि रिलायन्ससह, आणि फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपन्यांपैकी पाच मुंबईत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सारख्या वित्तीय क्षेत्रातील नियामकांच्या उपस्थितीमुळे हे सुलभ होते.

१९७० च्या दशकापर्यंत, मुंबईची समृद्धी मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या आणि बंदरांवर होती, परंतु तेव्हापासून स्थानिक अर्थव्यवस्थेने वित्त, अभियांत्रिकी, डायमंड-पॉलिशिंग, आरोग्य सेवा आणि माहिती तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी वैविध्यपूर्ण केले आहे. [१३३] शहराच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारी प्रमुख क्षेत्रे आहेत: वित्त, रत्ने आणि दागिने, लेदर प्रक्रिया, IT आणि ITES, कापड आणि मनोरंजन. नरिमन पॉइंट आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ही मुंबईची प्रमुख आर्थिक केंद्रे आहेत. [१३२] बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यांच्यातील स्पर्धा असूनही, मुंबईने माहिती तंत्रज्ञान उद्योगात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (SEEPZ) आणि इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क ( नवी मुंबई ) IT कंपन्यांना उत्कृष्ट सुविधा देतात. [१३४]

शहराच्या कर्मचाऱ्यांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईत अकुशल आणि अर्ध-कुशल स्वयंरोजगार असलेली लोकसंख्याही मोठी आहे, जी प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी चालक, यांत्रिकी आणि इतर अशा ब्लू कॉलर व्यवसाय म्हणून आपली उपजीविका करतात. मुंबई बंदर हे भारतातील सर्वात जुने आणि महत्त्वपूर्ण बंदरांपैकी एक असल्याने बंदर आणि शिपिंग उद्योग सुस्थापित आहे. [१३५] धारावी, मध्य मुंबईत, शहराच्या इतर भागांतून पुनर्वापर करता येण्याजोग्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एक मोठा पुनर्वापर उद्योग आहे; जिल्ह्यात अंदाजे 15,000 एकल खोलीचे कारखाने आहेत. [१३६]

28 [१३७] आणि 46,000 लक्षाधीशांसह अब्जाधीशांच्या संख्येत मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे, एकूण संपत्ती सुमारे $820 अब्ज आहे [१३८] वर्ल्डवाइड सेंटर्स ऑफ कॉमर्स इंडेक्स 2008 मध्ये 48व्या, [१३९] यादीत सातव्या क्रमांकावर आहे. फोर्ब्स मासिक (एप्रिल 2008), [१४०] आणि त्या अब्जाधीशांच्या सरासरी संपत्तीच्या बाबतीत पहिले "अब्जाधिशांसाठी टॉप टेन शहरे" [१४१] As of 2008 , ग्लोबलायझेशन अँड वर्ल्ड सिटीज स्टडी ग्रुप (GaWC) ने मुंबईला "अल्फा वर्ल्ड सिटी" म्हणून स्थान दिले आहे, जे जागतिक शहरांच्या श्रेणींमध्ये तिसरे आहे. [१४२] मुंबई हे जगातील तिसरे सर्वात महागडे ऑफिस मार्केट आहे, आणि 2009 मध्ये व्यवसाय स्टार्टअपसाठी देशातील सर्वात वेगवान शहरांमध्ये स्थान मिळवले होते. [१४३]

पुणे विभाग

पुणे महानगर प्रदेश

भारतातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आणि अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे असलेले शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून, पुणे हे आयटी आणि उत्पादनासाठी एक प्रमुख स्थान म्हणून उदयास आले आहे. पुण्याची आठव्या क्रमांकाची महानगरीय अर्थव्यवस्था आहे [१४४] आणि देशातील सहाव्या क्रमांकाचे दरडोई उत्पन्न. [१४५]

बजाज ऑटो, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, मर्सिडीज बेंझ, फोर्स मोटर्स (फिरोदिया-ग्रुप), कायनेटिक मोटर्स, जनरल मोटर्स, लँड रोव्हर, जग्वार, रेनॉल्ट, फोक्सवॅगन आणि फियाट या ऑटोमोटिव्ह कंपन्यांनी पुण्याजवळ ग्रीनफिल्ड सुविधा उभारल्या आहेत, भारताचे "मोटर सिटी" म्हणून पुण्याचा उल्लेख करण्यासाठी इंडिपेंडंटचे नेतृत्व. [१४६]

किर्लोस्कर समूहाने 1945 मध्ये पुण्यातील किरकी येथे किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडची स्थापना करून पुण्यात उद्योग आणला. या ग्रुपची स्थापना मुळात किर्लोस्करवाडी येथे झाली होती. [१४७] किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (भारतातील पंपांचे सर्वात मोठे उत्पादक आणि निर्यातदार आणि आशियातील सर्वात मोठे इन्फ्रास्ट्रक्चर पंपिंग प्रकल्प कंत्राटदार [१४८] [१४९] ), किर्लोस्कर ऑइल इंजिन्स (भारतातील सर्वात मोठी डिझेल इंजिन कंपनी [१५०] ), किर्लोस्कर न्यूमॅटिक्स कंपनी लि., आणि इतर किर्लोस्कर कंपन्या पुण्यात आहेत.

हिंजवडी आयटी पार्क (अधिकृतपणे राजीव गांधी आयटी पार्क म्हणतात) हा MIDC ने पुण्यातील आयटी क्षेत्रासाठी सुरू केलेला प्रकल्प आहे. पूर्ण झाल्यावर, हिंजवडी आयटी पार्क सुमारे २,८०० एकर (११ चौ. किमी) . प्रकल्पातील अंदाजे गुंतवणूक  ६०० billion (US$१३.३२ अब्ज) . [१५१] आर्थिक वाढ सुलभ करण्यासाठी, सरकारने आपल्या IT आणि ITES धोरण, 2003 मध्ये उदार प्रोत्साहन दिले आणि MIDC जमिनीवरील मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्या. [१५२] आयटी क्षेत्रात ४ लाखांहून अधिक लोकांना रोजगार आहे. सॉफ्टवेअर दिग्गज मायक्रोसॉफ्ट 7 अब्ज (US$१५५.४ दशलक्ष) प्रकल्प हिंजवडीमध्ये . [१५२]

पुणे, महाराष्ट्र येथे जागतिक व्यापार केंद्र

पुणे फूड क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प हा जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्यित उपक्रम आहे. पुणे आणि आसपासच्या फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगांच्या विकासासाठी सिडबी, क्लस्टर क्राफ्टच्या मदतीने हे कार्यान्वित केले जात आहे. [१५३] [१५४] पबमॅटिक, Firstcry.com, Storypick.com, TripHobo, [१५५] TastyKhana.com (फूडपांडाने अधिग्रहित केलेले), [१५६] पुण्यात स्वाइप बेस सेटअप यांसारख्या टेक स्टार्टअपसह पुणे हे भारतातील एक नवीन स्टार्टअप हब म्हणूनही उदयास आले आहे. [१५७] NASSCOM ने MIDCच्या सहकार्याने खराडी MIDC येथे त्यांच्या '10,000 स्टार्टअप' उपक्रमांतर्गत शहर आधारित स्टार्टअप्ससाठी एक सहकारी जागा सुरू केली आहे. [१५८] ते पहिल्या बॅचमध्ये OhMyDealer कडून कांदवले सारखे स्टार्टअप उबवतील.

पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) 2017 मध्ये पूर्ण झाल्यावर मीटिंग्ज , इन्सेन्टिव्ह, कॉन्फरन्सिंग, एक्झिबिशन ट्रेडला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. 97-हेक्टर PIECC मध्ये १३,००० मी (१,३९,९३१ चौ. फूट) मजल्याच्या क्षेत्रासह 20,000 आसन क्षमता असेल. . यामध्ये सात प्रदर्शन केंद्रे, एक कन्व्हेन्शन सेंटर, एक गोल्फ कोर्स, एक पंचतारांकित हॉटेल, एक बिझनेस कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल्स आणि निवासस्थाने असतील. US$115 दशलक्ष प्रकल्प पिंपरी-चिंचवड नवीन शहर विकास प्राधिकरणाने विकसित केला आहे. [१५९] आजकाल संपूर्ण शहरात ऑटोमोटिव्ह डीलरशिपची वाढती संख्या वाढत आहे. त्यात जग्वार लँड रोव्हर, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, ऑडी सारख्या लक्झरी कार निर्मात्या आणि कावासाकी, केटीएम, बेनेली, डुकाटी, बीएमडब्ल्यू आणि हार्ले डेव्हिडसन सारख्या मोटारसायकल उत्पादकांचा समावेश आहे .

विदर्भ

विदर्भ प्रदेश

विदर्भाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीप्रधान आहे, त्यात जंगल आणि खनिज संपत्तीची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो हब प्रकल्प, नागपूर (मिहान) येथे मल्टी-मॉडल आंतरराष्ट्रीय कार्गो हब आणि विमानतळ विकसित करण्यात आला आहे. [१६०] [१६१] मिहानचा वापर दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य-पूर्व आशियामधून येणारा अवजड माल हाताळण्यासाठी केला जाईल. या प्रकल्पामध्ये  १०० billion (US$२.२२ अब्ज) देखील समाविष्ट असेल विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) [१६२] माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांसाठी. हा भारतातील सर्वात मोठा विकास प्रकल्प असेल. [१६३]

गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि नागपूर ही या प्रदेशातील प्रमुख शहरे आहेत. नागपूर हे व्यवसाय आणि आरोग्यसेवेचे मध्यवर्ती केंद्र आहे. नागपूर ही हिवाळी राजधानी, एक विस्तीर्ण महानगर आणि मुंबई आणि पुण्यानंतर राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. शहराच्या आजूबाजूच्या मोठ्या संत्रा उत्पादक क्षेत्रासाठी नागपूरला ऑरेंज सिटी देखील म्हटले जाते. आशियातील सर्वात मोठी लाकूड बाजारपेठ देखील येथे आहे. अमरावती हे चित्रपट वितरक आणि कापड बाजारासाठी ओळखले जाते. चंद्रपूरमध्ये थर्मल पॉवर स्टेशन आहे जे भारतातील सर्वात मोठे आहे आणि काही इतर अवजड उद्योग जसे की कागद ( BILT बल्लारपूर), स्टील ( स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, इ. कडून एमईएल), सिमेंट ( अल्ट्राटेक सिमेंट, अंबुजा सिमेंट्स, एसीसी लिमिटेड ), माणिकगड सिमेंट, मुरली सिमेंट) उद्योग आणि असंख्य कोळसा खाणी. [१६४]

नाशिक विभाग

नाशिक विभागाचा नकाशा ज्यामध्ये अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांचा समावेश आहे.

नाशिक हे भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे [१६५] आणि भारताच्या केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात [१६६] [१६७] इगतपुरी-नाशिक-सिन्नर गुंतवणूक क्षेत्रासह [१६८] महत्त्वाचा नोड म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे. US$90 अब्ज दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पात . [१६९] [१७०] शहराची अर्थव्यवस्था प्रामुख्याने उत्पादन आणि अभियांत्रिकी उद्योग आणि नाशिक शहराच्या आजूबाजूच्या भागातील अत्यंत प्रगतीशील शेतीवर चालते. [१७१] अॅटलस कॉप्को, रॉबर्ट बॉश जीएमबीएच, सीएटी लिमिटेड, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, ग्रेफाइट इंडिया, श्नाइडर इलेक्ट्रिक, थायसेनक्रुप, इपकोस, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, गॅब्रिएलेक्स इंडिया, ग्रेफाइट इंडिया यासारख्या कंपन्यांच्या उपस्थितीसह अनेक मोठ्या उद्योगातील दिग्गजांचे उत्पादन प्रकल्प आणि युनिट्स शहरात आहेत., हिंदुस्तान कोका-कोला, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, जिंदाल पॉलिस्टर, ज्योती स्ट्रक्चर्स, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, केएसबी पंप्स, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, महिंद्रा सोना, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड, परफेक्ट सर्कल इंडस्ट्रीज, महिंद्रा सॅमरी, शालेय, शालेय इंडस्ट्रीज, Siemens, VIP Industries, Indian Oil Corporation, XLO India Limited आणि Jindal Saw.

उत्पादनाबरोबरच नाशिक हे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी गुंतवणुकीचे ठिकाण म्हणूनही उदयास येत आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने भारत सरकारच्या बीपीओ प्रमोशन स्कीम (IBPS) अंतर्गत नाशिकमध्ये गुंतवणूक केली आहे. [१७२] तसेच, WNS, ACRES, Accenture, ICOMET technologies TCS ने डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर, किंवा DISQ, [१७३]ची स्थापना केली आहे, जे एक सामाजिक नवोपक्रम केंद्र आहे.

नाशिकमध्ये कापड उद्योग आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक [१७४] ने पैठणी क्लस्टरच्या विकासासाठी येवला ब्लॉक निवडला आहे. [१७५] निर्यात सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारकडून एमआयडीसी अंबड येथे कंटेनर फ्रेट स्टेशन सुरू करण्यात आले. शहरात मायलन, [१७६] होल्डन, [१७७] फेम आणि ग्लॅक्सो स्मिथ क्लाइन यांच्या उपस्थितीसह फार्मास्युटिकल उद्योग देखील आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) [१७८] अंतर्गत शहरात सातपूर, अंबड, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी आणि विंचूर हे मुख्य पाच औद्योगिक झोन आहेत. सिन्नर, मालेगाव आणि राजूर बहुला हे प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र आहेत. अलीकडे, नाशिक हे भारतातील वाईन कॅपिटल म्हणून उदयास आले आहे 45 स्थानिक वाईनरी आणि द्राक्ष बाग सुला विनयार्ड्स [१७९] [१८०] , यॉर्कवाइनरी, [१८१] झाम्पा [१८२] आणि सोमा ज्यांना नाशिक व्हॅली वाईन म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता आहे [१८३] या द्राक्षबागे वाइन चाचणी आणि द्राक्षबागांशी संबंधित पर्यटन देखील विकसित करत आहेत. नाशिक हे डाळिंब, द्राक्षे [१८४] आणि कांद्याचे प्रमुख निर्यातदार म्हणूनही ओळखले जाते. [१८५]

ओझर येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विमान निर्मिती प्रकल्प आणि DRDO असलेले नाशिक हे संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन केंद्र आहे. [१८६] नाशिकमधील तोफखाना केंद्र हे आशियातील सर्वात मोठे आहे [१८७] संरक्षण नवोपक्रम केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने निवडलेल्या दोन शहरांमध्ये नाशिक देखील आहे [१८८] अन्य कोईम्बतूर येथे आहे. या शहरात द करन्सी नोट प्रेस [१८९] आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसचे घर आहे, जेथे भारतीय चलन आणि सरकारी मुद्रांकपत्रे अनुक्रमे छापली जातात. [१९०] [१९१]

मराठवाडा

मराठवाड्याचा नकाशा

मराठवाडा हा शब्द निजामाच्या काळापासून वापरला जात आहे. हा प्रदेश महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागाशी एकरूप आहे. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून आणि नंतर MIDCची स्थापना झाल्यापासून, मराठवाड्यात नवीन औद्योगिक विकास झाला असला तरी तो प्रामुख्याने औरंगाबाद जिल्ह्याच्या आसपास केंद्रित आहे. या प्रदेशातील उर्वरित सहा जिल्ह्यांना औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेत फारसा फायदा झालेला नाही. अशा असमान विकासाचे मुख्य कारण म्हणजे औरंगाबाद शहरात इतर जिल्ह्यांच्या व ठिकाणांच्या तुलनेत उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. [१९२]